शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

बुलडाणा जिल्ह्यात २0 हजार शेतकरी तणावग्रस्त!

By admin | Updated: May 9, 2017 01:52 IST

भू-सेवाधारी सेवासंकल्प अभियान कागदोपत्रीच : प्राधान्य कार्ड वाटपावरच थांबले अभियान!

नितीन निमकर्डे खामगाव : जिल्ह्यात सुमारे २0 हजार शेतकरी कुटुंब तणावग्रस्त असून, त्यांना आर्थिक संकटातून सुटकेचा मार्ग सापडेनासा झाला आहे. शासनाचे भू-सेवाधारी सेवासंकल्प अभियान मात्र कागदोपत्री सुरू असून, प्राधान्य कार्ड वाटपानंतर या योजनेत कोणतीही विशेष प्रगती दिसून येत नाही. त्यामुळे २0 हजारांवर शेतकरी कुटुंब अद्यापही तणावग्रस्त असल्याचे दिसत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने तणावग्रस्त व अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात सुमारे २0 हजार शेतकरी कुटुंब तणावग्रस्त आढळून आले आहेत. या सर्व तणावग्रस्त शेतकर्‍यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ अग्रक्रमाने देऊन त्यांच्या आर्थिक, सामाजिक, कृषीविषयक व आरोग्यविषयक समस्यांचे प्राधान्याने निराकरण करण्यासाठी शासनाने भू-सेवाधारी सेवासंकल्प अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत प्राधान्य कार्डचे वाटप सर्व तणावग्रस्त शेतकरी कुटुंबांना करण्यात आले आहे. सदर कार्डधारक शेतकर्‍यांचा शासकीय योजनांचा लाभ देताना प्राधान्याने विचार करण्याचे धोरण शासनाने निश्‍चित केलेले आहे. तणावग्रस्त शेतकर्‍यांना तणावातून बाहेर काढून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे व त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करून आत्महत्येचे प्रमाण कमी करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट असून, अभियान राबविण्यासाठी त्रिस्तरीय समित्यांमार्फत कामकाज करण्याचे निश्‍चित करण्यात आलेले आहे. यामध्ये ग्राम स्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तरावर या समित्या कार्यरत राहतील, असे नियोजन करण्यात आलेले आहे. या समितीने तणावग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या तातडीच्या गरजा ओळखून त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन सदर कुटुंबांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडणेही समितीकडून अपेक्षित आहे; परंतु जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ग्राम स्तरावरील समितीकडून आपले कर्तव्य पार पाडले जात नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तणावात असलेल्या शेतकर्‍यांना शासकीय योजनांबाबत माहिती मिळत नसल्याने त्यांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या हिताचे असलेले हे अभियान कागदोपत्री सुरू असून, प्राधान्य कार्ड वाटपावरच थांबल्याचे दिसत आहे.