शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात २0 हजार शेतकरी तणावग्रस्त!

By admin | Updated: May 9, 2017 01:52 IST

भू-सेवाधारी सेवासंकल्प अभियान कागदोपत्रीच : प्राधान्य कार्ड वाटपावरच थांबले अभियान!

नितीन निमकर्डे खामगाव : जिल्ह्यात सुमारे २0 हजार शेतकरी कुटुंब तणावग्रस्त असून, त्यांना आर्थिक संकटातून सुटकेचा मार्ग सापडेनासा झाला आहे. शासनाचे भू-सेवाधारी सेवासंकल्प अभियान मात्र कागदोपत्री सुरू असून, प्राधान्य कार्ड वाटपानंतर या योजनेत कोणतीही विशेष प्रगती दिसून येत नाही. त्यामुळे २0 हजारांवर शेतकरी कुटुंब अद्यापही तणावग्रस्त असल्याचे दिसत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने तणावग्रस्त व अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात सुमारे २0 हजार शेतकरी कुटुंब तणावग्रस्त आढळून आले आहेत. या सर्व तणावग्रस्त शेतकर्‍यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ अग्रक्रमाने देऊन त्यांच्या आर्थिक, सामाजिक, कृषीविषयक व आरोग्यविषयक समस्यांचे प्राधान्याने निराकरण करण्यासाठी शासनाने भू-सेवाधारी सेवासंकल्प अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत प्राधान्य कार्डचे वाटप सर्व तणावग्रस्त शेतकरी कुटुंबांना करण्यात आले आहे. सदर कार्डधारक शेतकर्‍यांचा शासकीय योजनांचा लाभ देताना प्राधान्याने विचार करण्याचे धोरण शासनाने निश्‍चित केलेले आहे. तणावग्रस्त शेतकर्‍यांना तणावातून बाहेर काढून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे व त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करून आत्महत्येचे प्रमाण कमी करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट असून, अभियान राबविण्यासाठी त्रिस्तरीय समित्यांमार्फत कामकाज करण्याचे निश्‍चित करण्यात आलेले आहे. यामध्ये ग्राम स्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तरावर या समित्या कार्यरत राहतील, असे नियोजन करण्यात आलेले आहे. या समितीने तणावग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या तातडीच्या गरजा ओळखून त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन सदर कुटुंबांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडणेही समितीकडून अपेक्षित आहे; परंतु जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ग्राम स्तरावरील समितीकडून आपले कर्तव्य पार पाडले जात नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तणावात असलेल्या शेतकर्‍यांना शासकीय योजनांबाबत माहिती मिळत नसल्याने त्यांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या हिताचे असलेले हे अभियान कागदोपत्री सुरू असून, प्राधान्य कार्ड वाटपावरच थांबल्याचे दिसत आहे.