शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

उपवासाची भगर खाल्ल्याने २० जणांना विषबाधा; चिखली तालुक्यातील सहा, तर जाफ्राबादमधील दोन जणांचा समावेश

By ब्रह्मानंद जाधव | Updated: September 22, 2022 17:57 IST

चिखली तालुक्यातील सहा, तर जाफ्राबादमधील दोन गावातील रूग्णांचा समावेश

चिखली : एकादशीच्या उपवासाला भगर खाल्ल्याने चिखली तालुक्यातील सहा, तर शेजारील जफ्राबाद तालुक्यातील दोन गावातील २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार २२ सप्टेंबरच्या समोर आला. विविध गावातील या रूग्णांवर येथील चार खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, ऐन नवरोत्रोत्सवाच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बुधवार २१ सप्टेंबर रोजी एकादशी होती. तालुक्यातील पेठ, आमखेड, गोद्री, साकेगाव, भालगाव, सिंदी हराळी या सहा गावांसह जाफ्राबाद तालुक्यातील वरूड व कोळगाव येथील भाविकांनी फराळासाठी आपल्या गावातील विविध किराणा दुकानांतून भगर व भगरीच्या पिठाची खरेदी केली होती. दरम्यान, या भगरीचा फराळ खाल्ल्यानंतर अनेकांना मळमळ, उलटी, जुलाब, डोकेदुखी व घबराट आदी त्रास जाणवू लागला. काहींनी अॅसीडीटी असेल म्हणून सुरूवातीला दूर्लक्ष केले. मात्र, त्रास वाढल्याने नातेवाईकांची चांगलीच धांधल उडाली. नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने त्रास होणाऱ्यांना चिखलीतील विविध खासगी रूग्णालयात दाखल केले.

शहरातील विविध रूग्णालयात उपचारार्थ दाखल रूग्णांची एकूण संख्या २० आहे. यामध्ये तायडे हॉस्पिटलमध्ये आमखेड येथील वंदना प्रदीप वाघ (४०), कमलबाई गजानन वाघ (५५), अंबादास भिमराव वाघ (४५), गोद्री येथील पांडूरंग विठ्ठल भवर (७०), सुमनबाई भवर (६५), पद्माबाई भवर (४०) व गायत्री भवर (२१) या सात रूग्णांवर उपचार सुरू आहे. डॉ.मिसाळ यांच्या दवाखान्यात साकेगाव येथील एकाच कुटूंबातील प्रदुम्न जगताप, नारायण जगताप व गीता जगताप यांच्यावर उपचार सुरू आहे.

चिंचोले हॉस्पीटलमध्ये शेषराव शेळके व कुशिवर्ता शेळके (रा.कोळगाव), विजय सुरडकर, अनिता सुरडकर, ओम सुरडकर (रा.शिंदी हराळी), व शीतल सोळंकी (रा.भालगाव) हे उपचार घेत आहेत. जयस्वाल हॉस्पिटलमध्ये भागूबाई जनार्दन सावळे (रा.वरुड) व उमाबाई वसंतराव ढोणे, वसंतराव संपतराव ढोणे (रा.पेठ) दाखल झाले आहेत. पानगोळे हॉस्पिटलमध्येही काही रूग्ण दाखल असल्याची माहिती आहे. विषबाधा झाल्यानंतर उपचारार्थ दाखल रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ.सुहास तायडे यांनी दिली.

रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रूग्णांना भगर खाल्याने उलटी, डोकेदुखी, चक्कर येणे, थरकाप आदी एकसारखी लक्षणे आहेत. उपचाराअंती सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्यासारखे काही नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणा