शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

उपवासाची भगर खाल्ल्याने २० जणांना विषबाधा; चिखली तालुक्यातील सहा, तर जाफ्राबादमधील दोन जणांचा समावेश

By ब्रह्मानंद जाधव | Updated: September 22, 2022 17:57 IST

चिखली तालुक्यातील सहा, तर जाफ्राबादमधील दोन गावातील रूग्णांचा समावेश

चिखली : एकादशीच्या उपवासाला भगर खाल्ल्याने चिखली तालुक्यातील सहा, तर शेजारील जफ्राबाद तालुक्यातील दोन गावातील २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार २२ सप्टेंबरच्या समोर आला. विविध गावातील या रूग्णांवर येथील चार खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, ऐन नवरोत्रोत्सवाच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बुधवार २१ सप्टेंबर रोजी एकादशी होती. तालुक्यातील पेठ, आमखेड, गोद्री, साकेगाव, भालगाव, सिंदी हराळी या सहा गावांसह जाफ्राबाद तालुक्यातील वरूड व कोळगाव येथील भाविकांनी फराळासाठी आपल्या गावातील विविध किराणा दुकानांतून भगर व भगरीच्या पिठाची खरेदी केली होती. दरम्यान, या भगरीचा फराळ खाल्ल्यानंतर अनेकांना मळमळ, उलटी, जुलाब, डोकेदुखी व घबराट आदी त्रास जाणवू लागला. काहींनी अॅसीडीटी असेल म्हणून सुरूवातीला दूर्लक्ष केले. मात्र, त्रास वाढल्याने नातेवाईकांची चांगलीच धांधल उडाली. नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने त्रास होणाऱ्यांना चिखलीतील विविध खासगी रूग्णालयात दाखल केले.

शहरातील विविध रूग्णालयात उपचारार्थ दाखल रूग्णांची एकूण संख्या २० आहे. यामध्ये तायडे हॉस्पिटलमध्ये आमखेड येथील वंदना प्रदीप वाघ (४०), कमलबाई गजानन वाघ (५५), अंबादास भिमराव वाघ (४५), गोद्री येथील पांडूरंग विठ्ठल भवर (७०), सुमनबाई भवर (६५), पद्माबाई भवर (४०) व गायत्री भवर (२१) या सात रूग्णांवर उपचार सुरू आहे. डॉ.मिसाळ यांच्या दवाखान्यात साकेगाव येथील एकाच कुटूंबातील प्रदुम्न जगताप, नारायण जगताप व गीता जगताप यांच्यावर उपचार सुरू आहे.

चिंचोले हॉस्पीटलमध्ये शेषराव शेळके व कुशिवर्ता शेळके (रा.कोळगाव), विजय सुरडकर, अनिता सुरडकर, ओम सुरडकर (रा.शिंदी हराळी), व शीतल सोळंकी (रा.भालगाव) हे उपचार घेत आहेत. जयस्वाल हॉस्पिटलमध्ये भागूबाई जनार्दन सावळे (रा.वरुड) व उमाबाई वसंतराव ढोणे, वसंतराव संपतराव ढोणे (रा.पेठ) दाखल झाले आहेत. पानगोळे हॉस्पिटलमध्येही काही रूग्ण दाखल असल्याची माहिती आहे. विषबाधा झाल्यानंतर उपचारार्थ दाखल रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ.सुहास तायडे यांनी दिली.

रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रूग्णांना भगर खाल्याने उलटी, डोकेदुखी, चक्कर येणे, थरकाप आदी एकसारखी लक्षणे आहेत. उपचाराअंती सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्यासारखे काही नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणा