शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बाजारात मिरची २०, तर घराजवळ ४५ रु. किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : येथील आठवडी बाजारात भरणाऱ्या हर्रासीत ठोक दराच्या दुप्पट भावांत घराजवळील हातगाडीवर भाजीपाला विक्री केली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : येथील आठवडी बाजारात भरणाऱ्या हर्रासीत ठोक दराच्या दुप्पट भावांत घराजवळील हातगाडीवर भाजीपाला विक्री केली जात आहे. ही तर सर्वसामान्यांची लूटच आहे. पाव-अर्धा किलो भाजीपाला आणण्यास बाजारात जाणे शक्य नसल्याने हा सर्व प्रकार ग्राहकांना सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मागणीच्या तुलनेत स्थानिक क्षेत्रातील उत्पादन कमी पडत असल्याने बुलडाणा शहरातील भाजीपाल्याच्या हर्रासीमध्ये दूरदुरून भाजीपाला, फळे विक्रीला येतात; मात्र पावसामुळे कुठे दरड कोसळल्याने वा रस्ते खरडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. डिझेलचा वाढता खर्च पाहता चढ्या दराने भाजीपाला विकला जात असला तरी चिल्लर विक्रेते या भागात त्याच्या दुप्पट दराने विक्री करीत आहेत. शहरातील काही भागांत हिरवी मिरची तब्बल ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो अशी विकली जात असल्याचे किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले.

पिकवतात शेतकरी; जास्तीचा पैसा तिसऱ्याच्या हातात

शेतकरी राब-राब राबून ऊन-वारा सहन करीत, जिवाचा आटापिटा करून भाजीपाला पिकवितो. त्याकरिता तीन ते चार महिने त्याला कष्ट करावे लागतात, तसेच खर्चही बराच करावा लागतो. त्यात निसर्गाच्या लहरीपणाचाही फटका बसतो. फवारणीचे औषध महाग झाले आहे. त्याचाही खर्च करावा लागतो. त्यानंतर भाजीपाला निघाल्यावर सायंकाळी भरून तो पहाटे बाजारात आणतो. उत्पादन खर्चासह वाहतूक खर्च पाहता त्याला तोकडे उत्पन्न मिळते; मात्र बाजारातून ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहोचविण्याचा मोबदला त्यापेक्षा अधिक विक्रेता मिळवितो.

एवढा फरक कसा?

भाजीपाला बाजारात येतो तेव्हा त्याची बोली लावतो दलाल. खरेदी करतो अडत्या आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवितो चिल्लर विक्रेता, अशी ही साखळी निर्माण झाली आहे; मात्र शेतकरी वगळता सर्वांना भाव ठरविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बाजारात पोहोचलेल्या मालाची विक्री आपला नफा पाहून हे विक्रेते ठरवीत असल्याने दरांत इतका फरक दिसून येतो, असे दलालांचे म्हणणे आहे.

हा बघा दरांतील फरक (प्रतिकिलो दर)

ठोक दर चिल्लर दर

कांदा २० ३०

बटाटा १५ २०

लसूण ८० १२०

टोमॅटो १५ ३०

वांगी १५ ४०

फूलकोबी ३० ४०

पानकोबी ३० ४०

पालक २५ ४०

कारले २० ४०

दोडके ३० ६०

भोपळा २० ४०

सध्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे़ त्यामुळे, भाव वाढलेले आहेत़ ठाेकचे आणि चिल्लरचे भाव यांच्यामध्ये तफावत असते़ १० ते १५ रुपयांचा फरक त्यामध्ये पडू शकताे़

सचिन गडाख, व्यापारी

अर्धा किलाे, पावभरासाठी हाेलसेल बाजारात जाणे परवडत नाही

राेज लागणारा भाजीपाला कमी लागताे़ रस्त्यावर महाग मिळत असला तरी अर्धा किलाे, पावभरासाठी हाेलसेल बाजारात जाणे परवडत नाही़ त्याचा फायदा काही भाजीविक्रेते घेतात़

सरला पाखरे, गृहिणी

घराजवळ असलेल्या बाजारातूनच भाजीपाला खरेदी करताे़ घरापासून आठवडी बाजार दूर असल्याने पर्याय नाही़ आठवडाभरासाठी लागणारा भाजीपाला खरेदी करून ठेवायला परवडत नाही़ त्यामुळे, महाग मिळत असला तरी तो खरेदी करताे़

- सुवर्णा वाघ, गृहिणी