शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

वृक्ष लागवडीतील १८ टक्के झाडे कोमेजली!

By admin | Updated: May 30, 2017 00:25 IST

झाडे लावा, झाडे जगवा : प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा परिणाम

हर्षनंदन वाघ ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाच्या तीन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील वर्षी ३ लाख ५३ हजार ६३३ वृक्षरोपणाचे उद्दिष्ट होते; त्यापैकी २ लाख ९६ हजार १२७ वृक्ष जगले आहेत. त्याची टक्केवारी ८२.६१ टक्के असून, १८ टक्के झाडे कोमेजली आहेत. त्यात सर्वाधिक सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या वृक्षांची संख्या आहे. यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यात यश मिळणार आहे.झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. त्यामुळे दरवर्षी कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडतो. यासाठी शासन विविध योजनेंतर्गत ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा नारा देते. विविध योजनांच्या माध्यमातून झाडे जगविण्यासाठी प्रोत्साहन देते. याचा सकारात्मक परिणाम होत असून, मागील वर्षी शासनाच्या तीन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत विविध विभागाने केलेल्या वृक्षरोपणातील असंख्य वृक्ष जिवंत असून, पर्यावरण संतुलन राखण्यात यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.बुलडाणा जिल्ह्याला मागील वर्षी तीन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ३ लाख ५३ हजार ६३३ वृक्षरोपणाचे उद्दिष्ट होते, त्यापैकी २ लाख ९६ हजार १२७ वृक्ष जिवंत आहेत. त्यात सर्वाधिक वृक्ष सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या वृक्षांचा समावेश आहे. सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या वृक्षांपैकी जिवंत वृक्षांची टक्केवारी ९४.५६, वन विभागाने लावलेल्या वृक्षापैकी जिवंत वृक्षांची टक्केवारी ७५.१५, परिवहन व क्रीडा विभागाने लावलेल्या वृक्षापैकी जिवंत वृक्षांची टक्केवारी ५६ व पशुसंवर्धन विभागाने लावलेल्या वृक्षांपैकी जिवंत वृक्षांची टक्केवारी ५० टक्के आहे.यावर्षी ग्रामपंचायतींना सर्वाधिक उद्दिष्टराज्यात सन २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, यावर्षी चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी ८ लाख ५२ हजार वृक्ष लागवड करावी लागणार आहे. यासाठी विविध विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सर्वात जास्त उद्दिष्ट जिल्ह्यातील ८५९ ग्रामपंचायतींना ३ लाख १५ हजार वृक्षांचे देण्यात आले आहे.असे राहणार वृक्ष लागवडीचे नियोजन!यावर्षी हवामान विभागाने पावसाचे चांगले संकेत दिले असून, बुलडाणा जिल्ह्यात २ जूननंतर पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार वृक्ष लागवडीसाठी प्रशासनाने विविध कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्यात ५ ते १५ जूनदरम्यान वृक्षारोपणासाठी खड्डे खोदणे, २३ ते २७ जूनपर्यंत वृक्षरोपाची वाहतूक करणे, २९ ते ३० जूनपर्यंत वृक्ष खड्ड्यापर्यंत पोहचविणे व १ ते ७ जुलैपर्यंत रोपे लागवड करण्याचे नियोजन केले असून, सहभागी विभागांना जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले आहे.