शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यासाठी १७ लाख क्विंटल बियाणे!

By admin | Updated: May 6, 2015 00:52 IST

राज्यातील १४९.४३ लाख हेक्टर क्षेत्रासाठी पेरणीचे नियोजन केले

अकोला : येत्या खरीप हंगामात कृषी विभागाने राज्यातील १४९.४३ लाख हेक्टर क्षेत्रासाठी पेरणीचे नियोजन केले आहे. बियाणे बदल दरानुसार १६ लाख ६४ हजार ११४ क्विंटल बियाण्यांची गरज असताना, प्रत्यक्षात या एकूण क्षेत्रासाठी लागणार्‍या विविध बियाण्यांच्या मागणीपैकी १७ लाख १0 हजार ९२0 क्विंटल बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), राष्ट्रीय बियाणे महामंडळ तसेच खासगी कंपन्या आणि शेतकर्‍यांजवळील बियाण्यांचा समावेश आहे. त्यामुळे यावर्षी बियाण्यांचा तुटवडा भासणार नसल्याचा दावा कृषी अधिकार्‍यांनी केला. यावर्षी १४९.४३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ४0 लाख हेक्टर बीटी कापूस आणि ३९ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता एकूण ८६,0१७ क्विंटल बीटी कापूस, तर १0,३६,५१५ क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. या नगदी पिकांनंतर धान हे राज्यातील तिसर्‍या क्रमाकांचे पीक असूून, कोकण आणि विदर्भातील १४.९२ लाख हेक्टर क्षेत्रासाठी २,११,५१३ क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. खरिपात तूर या पिकाचे क्षेत्र ११.४३ लाख हेक्टर आहे. या तुरीसाठी ६३,३३८ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. संकरित ज्वारीचे क्षेत्र नऊ लाख हेक्टर आहे. या क्षेत्रासाठी ६८,३२५ क्विंटल बियाणे लागणार असल्याने ज्वारीचे बियाणे शेतकर्‍यांना मिळणार आहे. संकरित बाजरीचे क्षेत्रही राज्यात नऊ लाख हेक्टर आहे. या बाजरीच्या क्षेत्रासाठी २३,२४0 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होईल. याचसोबत खरिपात मूग, उडीद या डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घेतले जाते. राज्यात मूग ५.३४ लाख, तर उडिदाचे क्षेत्र ४.४७ लाख हेक्टर आहे. याकरिता २६,0७१ हजार मूग, तर उडिदाचे ३४,८८२ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. मका या पिकाचे क्षेत्र राज्यात ७.८७ लाख हेक्टर आहे. या पिकाकरिता १,२९,१00 लाख क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. सुधारित ज्वारी राज्यात १.३९ लाख हेक्टरवर घेण्यात येणार आहे. यासाठी २६५0 क्विंटल बियाणे लागणार असून, सुधारित बाजरीचे क्षेत्र २.४५ लाख हेक्टर आहे. याकरिता ७,९३0 क्विंटल बियाणे लागेल. खरिपात २.९८ लाख हेक्टर क्षेत्रावर भुईमूग घेतला जातो. त्यासाठी १८,६२५ क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. तिळाचेही क्षेत्र 0.७0 हेक्टर असून, सुधारित कापसाचे क्षेत्र हे 0.५0 हेक्टर आहे. तिळाचे १,११४ क्विंटल, तर संकरित कपाशीचे १६00 क्विंटल बियाणे लागणार आहे.