शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

१७ टरबूज उत्पादक शेतक-यांना नुकसान भरपाई

By admin | Updated: May 6, 2016 02:23 IST

शेतक-यांच्या लढय़ाचा ‘लोकमत’ने प्रभावी पाठपुरावा केला.

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : बोगस टरबूज बियाण्यांमुळे संग्रामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. आधीच दुष्काळाने शेतकर्‍यांचे बेहाल असताना टरबुजाचे पीकही हातचे गेले. त्यामुळे शेतकर्‍यांनी बियाणे कंपनीविरोधात एल्गार पुकारला होता. शेतकर्‍यांचा हा लढा यशस्वी ठरला असून, कंपनीने त्यांना नुकसान भरपाई दिली आहे. शेतकर्‍यांच्या या लढय़ाचा ह्यलोकमतह्णने प्रभावी पाठपुरावा केला होता. जानेवारी महिन्यामध्ये नामधारी ७५0 कंपनीचे टरबूज बियाण्याची लागवड केली होती. मात्र हे बियाणे निकृष्ट निघाल्याने चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर ही या टरबुजाच्या वेलाला लागलेले फळेही पूर्णपणे भरले नाही. तसेच त्यांची वाढही खुंटली होती. या प्रकाराबाबत संबंधित शेतकर्‍यांनी ही बाब सदर कंपनीच्या डिस्ट्रीब्युटरकडे सांगितली. परंतु कंपनी डिस्ट्रीब्युटरने टोलवा टोलवीचे उत्तरे दिली. शेतकर्‍यांनी या प्रकाराबाबत जिल्हाधिकार्‍यांकडेही तक्रार केली. मात्र, त्याची दखल न घेतल्याने शेतकर्‍यांनी वेळोवेळी आंदोलने केली व या आंदोलनाचर्ी ह्यलोकमतह्णने वृत्त मालिका प्रकाशित केल्यामुळे अखेर कंपनीने या शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दखल घेऊन ४ एप्रिल रोजी या १७ शेतकर्‍यांना ५ हजार प्रतिएकरप्रमाणे बियाण्यांची नुकसानभरपाई दिली. लागवड करून ४ महिन्यांचा कालावधी झाल्यानंतरही या टरबुजाच्या वेलाला टरबूज न लागल्याने तसेच वेलाला लागलेल्या फळांचा दर्जा व आकारमानावर फरक पडल्यामुळे या फळाचे वजन २00 ते ४00 ग्रॅमच भरत होते व या फळाचा आकार गोल नसल्यामुळे संबंधित शेतकर्‍यांनी नामधारी ७५0 कंपनीकडून नुकसानभरपाई द्यावी, याकरिता रिजनल मॅनेजरकडे मागणी केली होती. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सुध्दा टरबूज बियाणे बोगस निघाल्याची तक्रार केली होती. यानंतर शेतकरी तक्रार निवारण समितीने बियाणे बोगस व सदोष असल्याचा अहवालही दिला होता. परंतु कंपनीकडून नुकसानभरपाई मिळत नव्हती.