शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

१७ टरबूज उत्पादक शेतक-यांना नुकसान भरपाई

By admin | Updated: May 6, 2016 02:23 IST

शेतक-यांच्या लढय़ाचा ‘लोकमत’ने प्रभावी पाठपुरावा केला.

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : बोगस टरबूज बियाण्यांमुळे संग्रामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. आधीच दुष्काळाने शेतकर्‍यांचे बेहाल असताना टरबुजाचे पीकही हातचे गेले. त्यामुळे शेतकर्‍यांनी बियाणे कंपनीविरोधात एल्गार पुकारला होता. शेतकर्‍यांचा हा लढा यशस्वी ठरला असून, कंपनीने त्यांना नुकसान भरपाई दिली आहे. शेतकर्‍यांच्या या लढय़ाचा ह्यलोकमतह्णने प्रभावी पाठपुरावा केला होता. जानेवारी महिन्यामध्ये नामधारी ७५0 कंपनीचे टरबूज बियाण्याची लागवड केली होती. मात्र हे बियाणे निकृष्ट निघाल्याने चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर ही या टरबुजाच्या वेलाला लागलेले फळेही पूर्णपणे भरले नाही. तसेच त्यांची वाढही खुंटली होती. या प्रकाराबाबत संबंधित शेतकर्‍यांनी ही बाब सदर कंपनीच्या डिस्ट्रीब्युटरकडे सांगितली. परंतु कंपनी डिस्ट्रीब्युटरने टोलवा टोलवीचे उत्तरे दिली. शेतकर्‍यांनी या प्रकाराबाबत जिल्हाधिकार्‍यांकडेही तक्रार केली. मात्र, त्याची दखल न घेतल्याने शेतकर्‍यांनी वेळोवेळी आंदोलने केली व या आंदोलनाचर्ी ह्यलोकमतह्णने वृत्त मालिका प्रकाशित केल्यामुळे अखेर कंपनीने या शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दखल घेऊन ४ एप्रिल रोजी या १७ शेतकर्‍यांना ५ हजार प्रतिएकरप्रमाणे बियाण्यांची नुकसानभरपाई दिली. लागवड करून ४ महिन्यांचा कालावधी झाल्यानंतरही या टरबुजाच्या वेलाला टरबूज न लागल्याने तसेच वेलाला लागलेल्या फळांचा दर्जा व आकारमानावर फरक पडल्यामुळे या फळाचे वजन २00 ते ४00 ग्रॅमच भरत होते व या फळाचा आकार गोल नसल्यामुळे संबंधित शेतकर्‍यांनी नामधारी ७५0 कंपनीकडून नुकसानभरपाई द्यावी, याकरिता रिजनल मॅनेजरकडे मागणी केली होती. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सुध्दा टरबूज बियाणे बोगस निघाल्याची तक्रार केली होती. यानंतर शेतकरी तक्रार निवारण समितीने बियाणे बोगस व सदोष असल्याचा अहवालही दिला होता. परंतु कंपनीकडून नुकसानभरपाई मिळत नव्हती.