शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

१७ टरबूज उत्पादक शेतक-यांना नुकसान भरपाई

By admin | Updated: May 6, 2016 02:23 IST

शेतक-यांच्या लढय़ाचा ‘लोकमत’ने प्रभावी पाठपुरावा केला.

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : बोगस टरबूज बियाण्यांमुळे संग्रामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. आधीच दुष्काळाने शेतकर्‍यांचे बेहाल असताना टरबुजाचे पीकही हातचे गेले. त्यामुळे शेतकर्‍यांनी बियाणे कंपनीविरोधात एल्गार पुकारला होता. शेतकर्‍यांचा हा लढा यशस्वी ठरला असून, कंपनीने त्यांना नुकसान भरपाई दिली आहे. शेतकर्‍यांच्या या लढय़ाचा ह्यलोकमतह्णने प्रभावी पाठपुरावा केला होता. जानेवारी महिन्यामध्ये नामधारी ७५0 कंपनीचे टरबूज बियाण्याची लागवड केली होती. मात्र हे बियाणे निकृष्ट निघाल्याने चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर ही या टरबुजाच्या वेलाला लागलेले फळेही पूर्णपणे भरले नाही. तसेच त्यांची वाढही खुंटली होती. या प्रकाराबाबत संबंधित शेतकर्‍यांनी ही बाब सदर कंपनीच्या डिस्ट्रीब्युटरकडे सांगितली. परंतु कंपनी डिस्ट्रीब्युटरने टोलवा टोलवीचे उत्तरे दिली. शेतकर्‍यांनी या प्रकाराबाबत जिल्हाधिकार्‍यांकडेही तक्रार केली. मात्र, त्याची दखल न घेतल्याने शेतकर्‍यांनी वेळोवेळी आंदोलने केली व या आंदोलनाचर्ी ह्यलोकमतह्णने वृत्त मालिका प्रकाशित केल्यामुळे अखेर कंपनीने या शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दखल घेऊन ४ एप्रिल रोजी या १७ शेतकर्‍यांना ५ हजार प्रतिएकरप्रमाणे बियाण्यांची नुकसानभरपाई दिली. लागवड करून ४ महिन्यांचा कालावधी झाल्यानंतरही या टरबुजाच्या वेलाला टरबूज न लागल्याने तसेच वेलाला लागलेल्या फळांचा दर्जा व आकारमानावर फरक पडल्यामुळे या फळाचे वजन २00 ते ४00 ग्रॅमच भरत होते व या फळाचा आकार गोल नसल्यामुळे संबंधित शेतकर्‍यांनी नामधारी ७५0 कंपनीकडून नुकसानभरपाई द्यावी, याकरिता रिजनल मॅनेजरकडे मागणी केली होती. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सुध्दा टरबूज बियाणे बोगस निघाल्याची तक्रार केली होती. यानंतर शेतकरी तक्रार निवारण समितीने बियाणे बोगस व सदोष असल्याचा अहवालही दिला होता. परंतु कंपनीकडून नुकसानभरपाई मिळत नव्हती.