शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

पावसाळ्यातही १५ गावात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:14 IST

यावर्षी अत्यल्प झालेला पाऊस, विविध प्रकल्पात  असलेला अल्प जलसाठा, दिवसागणिक भूगर्भातील खोल  जात असलेली पाणी पातळी यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यां तील १५ गावांमध्ये पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण  झाली आहे. परिणामी या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्या त येत आहे. 

ठळक मुद्देटंचाईग्रस्त गावात टँकरने पाणीपुरवठाविविध प्रकल्पात अल्प जलसाठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: यावर्षी अत्यल्प झालेला पाऊस, विविध प्रकल्पात  असलेला अल्प जलसाठा, दिवसागणिक भूगर्भातील खोल  जात असलेली पाणी पातळी यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यां तील १५ गावांमध्ये पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण  झाली आहे. परिणामी या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्या त येत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी  पावसाचे अत्यल्प असल्यामुळे  अर्धेअधिक प्रकल्प तहानलेले होते; परंतु नोव्हेंबर ते डिसेंबर  महिन्यात परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम लघू  प्रकल्पात बर्‍यापैकी जलसाठा उपलब्ध झाला होता. अनेक  शेतकर्‍यांनी या प्रकल्पातील पाण्याचा सिंचनासाठी वापर  केला होता. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात हे प्रकल्प अध्र्यावर  आले होते. दाहकत्या उन्हामुळे झालेले पाण्याचे बाष्पीभवन,  सिंचनासाठी पाण्याचा भरमसाट वापर या कारणामुळे  जिल्ह्यातील ५५ लघू प्रकल्प कोरडेठाक पडले तर अद्यापही  तोरणा, मन हे दोन मध्यम प्रकल्प शेवटच्या घटका मोजत  आहेत. पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून  गेला आहे; परंतु अद्यापही जिल्ह्यातील एकाही नदी- नाल्यांना पूर गेला नाही. त्यामुळे आजही जिल्ह्यातील  मोठय़ा, मध्यम लघू प्रकल्पाची स्थिती चिंताजनक आहे.  तीन महिन्यात जो काही पाऊस पडला तो फक्त पिकासाठीच  पोषक ठरला आहे. सध्या स्थितीत प्रकल्पात पाणीसाठा उ पलब्ध नसल्यामुळे अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना  प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्याचे दिवस अस ताना जिल्ह्यातील १५ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा  लागत आहे. पाणीटंचाईग्रस्त गावातील नागरिकांची  पाण्यासाठी हेळसांड होऊ नये, यासाठी या गावांना १५  टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर पाणीटंचाईवर  उपाययोजना म्हणून प्रशासनाने विंधन विहिरी, नळ योजनेची  विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, टँकरने पाणी पुरवठा खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. येत्या  काही दिवसात पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यास  पाणीटंचाईग्रस्त गावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.   

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असलेली गावेबुलडाणा तालुक्यातील गोंधनखेड, पिंपरखेड या गावाला प्र त्येकी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर चिखली  तालुक्यातील मेरा बुद्रुक एक टँकर, देऊळगावराजा तालु क्यातील पाडळी शिंदे, नागणगाव, धोत्रा नंदई प्रत्येकी एक  टँकर, मेहकर तालुक्यतील दुर्गबोरी, पारडी, बोथा, वरवंड  घुटी या गावासाठी प्रत्येकी एक टँकर, सिंदखेड राजा तालु क्यातील सोनोशी, सावरगाव, माळ, सुजलगाव प्रत्येकी एक  टँकर खामगाव तालुक्यातील जळका तेली या गावासाठी  एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.