शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षात १४७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

By admin | Updated: May 19, 2017 00:33 IST

सततची नापिकी, बँकांचे कर्ज, सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या

अमोल ठाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: पावसाची अनियमितता, सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून १७ वर्षात संग्रामपूर तालुक्यातील १४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आत्महत्येचा आलेख चढताच असून, यावर शासनाकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना होत नसल्यामुळे तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच असल्याचे चित्र शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.दरवर्षी शेतकरी हा पावसाळ्याला सुरुवात झाली की मोठ्या आशेने संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन करून महागडे बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करतो. हे महागडे बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्याकरिता तो बँकांकडून पीक कर्ज तसेच बँकांकडून शेतीवर कर्ज काढतो. या महागड्या बियाण्याची पावसाच्या आशेवर पेरणी ही करतो; मात्र पेरणी आटोपल्यानंतर पावसाचे पाणीच महिना दीड महिना हजेरी लावत नाही. परिणामी शेतीत टाकलेले महागडे बी-बियाणे कोमेजून जाते व शेतकऱ्यांची निराशा होते. मात्र तरीही शेतकरी निराश न होता घरातील आपल्या अर्धांगिनीचे दागदागिने व घरातील सोने तसेच सावकाराकडून कर्ज काढून परत नव्या जोमाने शेतात पेरणी करतो; परंतु दुबार पेरणी झाल्यानंतर पिकांना अपेक्षित असलेला पाऊस होत नाही. त्यामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटते व त्यामुळे शेतकऱ्याला शेतीमधून अपेक्षित उत्पन्न होत नाही. शेतीतून मिळालेले उत्पन्न हे अल्प असल्यामुळे व पिकांपासून मिळालेले उत्पादन हे कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून जाते. शेतीमधून मिळालेल्या तोकड्या उत्पन्नामधून त्याला घरातील मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, बँकाचे कर्ज, सावकारीचे कर्ज व घरातील गहान ठेवलेले दागदागिने तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करणे होत नाही परिणामी शेतकऱ्यांना निराश व्हावे लागते. तसेच या दुष्काळी काळात शासनाकडूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे शेवटी शेतकऱ्याला मृत्यूच्या दारात उभे राहून आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत आहे.संग्रामपूर तालुक्यात सन २००३ पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. तालुक्यात सन २००१ पासून ते एप्रिल २०१७ पर्यंत या १७ वर्षात एकूण १४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असून, यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सन २०१५ मध्ये झालेल्या आहेत. २०१५ मध्ये २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद तहसील कार्यालयातील आपत्ती विभागामध्ये आहे. दरम्यान, या १४७ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांपैकी फक्त ६९ शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीस पात्र ठरल्या आहेत. शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण बघता शासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.