शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पूरग्रस्तांसाठी आज रवाना होणार मदत १३०० क्विंटल धान्य व किराणा पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:34 IST

कोकणात महापुराचे पाणी गावागावांत आणि गल्लीबोळांत घुसले आणि मोठी हानी झाली. अनेकांनी आप्तस्वकीय गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी मदतीचा ...

कोकणात महापुराचे पाणी गावागावांत आणि गल्लीबोळांत घुसले आणि मोठी हानी झाली. अनेकांनी आप्तस्वकीय गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी मदतीचा हात म्हणून बुलडाणा शिवसेनेेने पुढाकार घेत त्वरेने हे धान्य पाठविण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार ही मदत पाठविण्यात येत आहे. यासंदर्भातील संकल्पना खा. प्रतापराव जाधव यांनी मांडली होती. त्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील शिवसेना आ.डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, माजी आमदार शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शांताराम दाणे, बळीराम मापारी, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, नरेंद्र खेडेकर, भास्करराव मोरे यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख, शहरप्रमुखांनी तथा इतर लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातून हे १३०० क्विंटल धान्य व किराणा गोळा करत ते पाठविण्याची व्यवस्था केली आहे. दरम्यान, २९ जुलै रोजी सकाळी धान्य व किराणा साहित्य असलेला ट्रक कोकणाकडे रवाना होणार आहे.

--आर्थिक मदतीसाठी पुढे यावे--

संकटकाळी मदतीसाठी धावून जाण्याची आपली संस्कृती आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रधर्माचे पालन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमेल ती मदत करावी, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्हा शिवसेनेच्या वतीने संपर्क साधून शिवसैनिकांच्या वतीने धान्य व किराणा माल जमा करण्यात आला आहे. सोबतच ज्यांना आणखी मदत द्यावयाची आहे, त्यांनीही स्थानिक जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच आर्थिक मदतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या बँक खात्यात जमा करण्याचे आवाहन केले आहे.