शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

१२६५ पालकांनी केली पुस्तके परत; आपण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

बुलडाणा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची ...

बुलडाणा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची पुस्तके परत करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले आहे़ या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १२६५ पालकांनी पुस्तके परत केली आहेत. वितरित झालेल्या पुस्तकांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे़ त्यामुळे इतर पालकांनीही पुस्तके परत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे़

पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याबाबत राज्याच्या झालेय शिक्षण विभागाने ८ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित केला. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची जपणूक योग्यरितीने करतात. त्यांना सुस्थितीत ठेवतात. अशा पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्याचा पुनर्वापर केल्यामुळे पुढील वर्षी फेरवाटप करणे शक्‍य होते. शिवाय पुनर्वापरामुळे काही प्रमाणात कागदाची बचत होते. हा उद्देश ठेवून शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार शाळा व गटसाधन केंद्राच्या वतीने कार्यवाही सुरू आहे.

कागदाच्या बचतीतून हाेणार झाडांचे संवर्धन

बुलडाणा जिल्ह्याप्रमाणेच महाराष्ट्रात वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी २० टक्के जमा करून वापरण्याचे नियाेजन आहे़ शासनाचे तसे आदेशही आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जि.प., न.प. व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण २ लाख ७६ हजार ८९५ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली आहेत.

पुढील वर्षासाठी २० टक्के पुस्तकांचा पुनर्वापर हाेणार आहे़ तसेच २ लाख ६१ हजार ४३६ विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे़. शाळा बंद असल्याने पुस्तके परत घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे़

पालक म्हणतात

गेल्या वर्षभरापासून शाळा बंदच आहेत़ त्यामुळे पाठ्यपुस्तके परत करता आली नाही़ शाळा सुरू झाल्यानंतर सर्वच पुस्तके परत करू़ तसेच इतर पालकांनीही पुस्तके परत करण्याची गरज आहे़

गाैतम इंगळे, पालक

शासनाने पुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा घेतलेला निर्णय याेग्य आहे़ या निर्णयाचे स्वागतच आहे़ शाळा बंद असल्याने पुस्तके परत करता आली नाहीत़ शाळा सुरू झाल्यानंतर पुस्तके परत करु़

अमाेल पहुरकर, पालक

शासनाने २० टक्के पुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयानुसार शिक्षकांना पुस्तके परत घेण्याच्या सूचना केल्या आहेत़ आतापर्यंत १२६५ पालकांनी पुस्तके परत केली आहेत़ इतर पालकांनीही पुस्तके परत करण्याची गरज आहे़ शाळा बंद असल्याने पुस्तके जमा करुन घेण्यात अडचणी येत आहेत़

सचिन जगताप, प्रभारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प़ बुलडाणा