शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

विहीर अधिग्रहणाचे १.२५ कोटी थकले!

By admin | Updated: March 7, 2016 02:30 IST

शेतकरी अडचणीत; पाणीटंचाईत निधीची टंचाई.

बुलडाणा : जिल्ह्यात मागील वर्षी निर्माण झालेल्या पाणीटंचाईत नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील २६९ गावांतील शेतकर्‍यांच्या ३३६ विहिरी अधिग्रहीत केल्या होत्या. पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाने १ कोटी ९१ लाख ५0 हजार रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी फक्त ७१ लाख रुपये मिळाले आहेत. तर एक वर्षापासून शासनाकडे १ कोटी २0 लाख ५0 हजार रुपये थकीत आहेत. त्यातच यंदा ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. त्यामुळे पाणीटंचाईतच निधीची टंचाई निर्माण झाल्यामुळे प्रशासनासह शेतकरी अडचणीत आहेत. यावर्षीही पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली असल्यामुळे सिंचन व पाणीपुरवठा करणार्‍या प्रकल्पात जेमतेम ३४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर अनेक लघू प्रकल्प शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटक जाणवू लागले आहेत. मागील वर्षी जिल्ह्यात पाचशेहून अधिक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. शहरासह ग्रामीण भागातील नागिरकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने टँकर, विहिरी अधिग्रहण, हातपंप दुरुस्ती, विशेष पाइपलाइन यासह अनेक उपाययोजना करून तहानलेल्या नागरिकांची तहान भागविली होती. तसेच पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाने जिल्ह्यातील २६९ गावांतील शेतकर्‍यांच्या ३३६ विहिरी ४00 रुपये दिवस या प्रमाणे अधिग्रहीत केल्या होत्या. बुलडाणा तालुक्यात २0 गावांत २३ विहिरी, चिखली ४३ गावांत ४४ विहिरी, देऊळगाव राजा १८ गावांत २२ विहिरी, मेहकर ३३ गावांत ३३ विहिरी, लोणार २९ गावांत ३६ विहिरी, सिंदखेड राजा ४९ गावांत ८८ विहिरी, खामगाव सहा गावात सहा विहिरी, शेगाव सात गावांत आठ विहिरी, जळगाव जामोद १३ गावांत १३ विहिरी, संग्रामपूर २५ गावांत ३४ विहिरी, मलकापूर तीन गावात तीन विहिरी व मोताळा तालुक्यातील तीन गावांतील शेतकर्‍यांच्या तीन विहिरीचे अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. यासाठी प्रशासनाने १ कोटी ९१ लाख ५0 हजार १६७ रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी शासनाने फक्त डिसेंबरअखेर ७१ लाख रुपये देऊन जिल्ह्याची बोळवण केली. तर अद्यापही शासनाकडे विहीर अधिग्रहणाचे १ कोटी २0 लाख रुपये थकीत आहेत. त्यातच ऐन हिवाळयात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. यंदा प्रशासनाने ८४५ गावांत संभाव्य पाणीटंचाई जाहीर केली आहे. अशा कठीण परिस्थितीत अधिग्रहीत विहिरीचे पैसे मिळतील, या आशेने शेतकरी पंचायत समितीत जात आहेत. परंतु, शासनाकडून निधीच आला नसल्याचे सांगून त्यांना आल्या पावली परत यावे लागत आहे. त्यातच आतापासून काही गावात टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीत टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाची कसरत होणार आहे.