शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

बुलडाणा जिल्ह्यातील १२ मोर्चेकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2015 02:39 IST

नागपुरात संगणक परिचालकांच्या मोर्चावर लाठीहल्ला; दोघे गंभीर जखमी.

बुलडाणा : संगणक परिचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात शेकडो युवक जखमी झालेत. जिल्ह्यातील १२ युवकांचा यामध्ये समावेश आहे. संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात असतानाही त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे संपूर्ण राज्यभरातील संगणक परिचालकांनी हिवाळी अधिवेशनावर धाव घेतली. मंगळवारी मोर्चा झाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकार्‍यांची प्रशासनाशी चर्चा सुरू झाली; मात्र चर्चा सकारात्मक झाली नाही. चर्चेच्या प्रतीक्षेत संगणक परिचालक रात्रभर महाल टेकडी परिसरात ठाण मांडून बसले होते. बुधवारी सकाळी पुन्हा चर्चा सुरू असतानाच अचानक लाठीहल्ला झाला, अशी माहिती संघटनेचे बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्ष विजय वाशिमकर यांनी ह्यलोकमतह्णला दिली. या लाठीहल्ल्यामध्ये ५00 ते ७00 संगणक परिचालक जखमी झाले असून, बुलडाण्यातील १२ युवकांचा त्यामध्ये समावेश आहे. नांदुर्‍यातील प्रकाश रणित हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्या पायाला जबर मार लागला आहे. जखमींमध्ये विठ्ठल खरात, प्रदीप साबे, हरीश घुमरे हे लोणारचे संगणक परिचालक तसेच जळगाव जामोद येथील अमोल भटकर, नीलेश खुपसे, शेगावचे विनायक देशमुख, कृष्णा जवंजाळ, मोताळाचे बंडू देशमुख, संदीप घोती, विजय वाशिमकर, संग्रामपूरचे दीपक पहूरकर यांचा समावेश आहे. जखमींना नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यापैकी प्रकाश रणित व विठ्ठल खरात यांना सर्वाधिक मार लागला असून, इतरांना पायावर तसेच कमरेवर जबर मुका मार लागला आहे. दरम्यान, संगणक परिचालक नागपुरातच ठाण मांडून बसले असून, संघटनेची भूमिका समोर आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे वाशिमकर यांनी सांगितले.