शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

संग्रामपूरात १२ बालके कुपोषित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:28 IST

संग्रामपूर तालुक्यात १२ बालके कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे.

- नारायण सावतकर लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात १२ बालके कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी राज्य शासन नानाविध प्रयत्न करीत असले तरी कुपोषणाचे प्रमाण कमी होईना ही गंभीर बाब आहे.कुपोषण हा केवळ आदिवासी भागामधील महत्वाचा प्रश्न बनला आहे. प्रशासनातर्फे अद्याप मे महिन्याचा अहवाल तयार झालेला नाही. कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी आधी सकस आहार खायला दिला जायचा. यामध्ये सुकळी, लापशी, शिरा आदीचा समावेश होता.आता मात्र मटकी, बरबटी, मसूर दाळ, गहू, तेल, मीठ, हळद हा आहार दिला जात आहे. पूर्वी हा आहार अंगणवाडी मध्ये शिजून दिला जात होता. परंतु आता घरपोच सेवा सुरू करण्यात आली. बालकांना घरी दिल्या जाणाऱ्या या अन्न आहारामध्ये घरातील सदस्य या आहार मध्ये सहभागी होतात. त्यामुळे ज्या बाळासाठी आहार दिला जातो. त्यास पुरेसा सकस आहार मिळत नाही. याबाबत पालकामध्ये जनजागृतीची गरज आहे. आदीवासी भागात तरी किमान घरपोच आहार देण्यापेक्षा त्यांना अंगणवाडीत अन्न शिजून देणे योग्य राहील अशाप्रकारच्या प्रतिक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळत आहेत.याशिवाय संग्रामपूर येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयामधील तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी हे पद गेल्या चार वर्षा पासून प्रभारीवरच आहे.१५ सप्टेंबर २०१५ रोजी तत्कालीन अधिकारी शेवाळे यांची बदली झाली. तेव्हापासून हे पद कायमस्वरुपी भरण्यात आले नाही. त्यामुळे कामकाज प्रभावित झालेले दिसून येत आहे. आतापर्यंत चार अधिकाऱ्यांनी या पदाचा भार सांभाळला. सध्या हे पद शेगाव येथे कार्यरत असलेल्या कर्मचाºयाकडे आहे. शेगाव वरून संग्रामपूर येथील कारभार पाहणे जाधव यांना जिकरीचे ठरत आहे. शेगावचाच व्याप जाास्त असलयाने त्यांना संग्रामपूर तालुक्यासाठी वेळ मिळत नसल्याचे वास्तव आहे.कुपोषीत बालकांना सुद्ढ होण्यासाठी शासन स्तरावर चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध योजना राबविल्या गेल्या पाहिजेत. सोबत रिक्त असलेली पदे, कुपोषित बालके असणे ही शोकांतिका आहे. प्रकल्प विभागाने बालकांना वेळोवेळी आहार देणे गरजेचे आहे.- मीनाक्षी हागेजिल्हा परिषद सदस्या, बावनबीर

टॅग्स :khamgaonखामगावSangrampurसंग्रामपूर