शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

१२९ गावांवर जलसंकट!

By admin | Updated: May 1, 2017 01:13 IST

बुलडाणा : तापमान वाढीसह जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहे. या तापमानाच्या वाढ होणार असून, सध्या १२९ गावांत जलसंकट वाढले आहे.

२० टँकरद्वारे पाणीपुरवठा : १२५ खासगी विहिरींचा आधारबुलडाणा : दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागल्याने तापमानात वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहे. या तापमानाच्या तीव्रतेत मे हिटमुळे वाढ होणार असून, सध्या १२९ गावांत जलसंकट वाढले आहे. सदर जलसंकट दूर करण्यासाठी प्रशासनाद्वारे १८ गावांची २० टँकरद्वारे, तर १११ गावांची तहान १२५ खासगी विहिरींद्वारे भागविली जात आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पावसाची नोंद झाल्याने यंदा पाणीटंचाईने उशिरा डोके वर काढले. मात्र, विक्रमी तापमान, भूजल पातळीत होणारी वेगवान घट, पाण्याचे जलद गतीने होणारे बाष्पीभवन, कोरडे होणारे जलस्रोत यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मार्चमध्ये एकही गावात टँकर नसताना एप्रिल महिन्याच्या शेवटी १८ गावांची तहान २० टँकरद्वारे भागविली जात आहे. बुलडाणा व मेहकर तालुक्यात टँकरग्रस्त गावांची संख्या जास्त आहे. बुलडाणा तालुक्यातील चौथा, माळविहीर, हनवतखेड, गिरडा, गोंधनखेड, जांब या गावांना प्रत्येकी एका तर देऊळघाटात तीन टँकर सुरू असून रायपूर, शिरपूर या गावांना प्रत्येकी दोन टँकरद्वारे पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. देऊळघाट येथील नेहमीची पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणखी तीन टँकरची आवश्यकता आहे. मेहकर तालुक्यातील दुर्गबोरी, हिवरा साबळे, पारडी, अकोला ठाकरे, बोथा, वरवंड येथे प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दुसरीकडे चिखली तालुक्यातील सैलानीनगर, भोगावती, देऊळगाव राजा तालुक्यातील पाडळी शिंदे, नागणगाव, खामगाव तालुक्यातील निरोड, शिराळा येथे प्रत्येकी एक टँकर सुरू आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी येथे दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १११ गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण जिल्ह्यातील पाणीटंचाई ग्रस्त १११ गावासाठी १२५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या गावात पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसल्यामुळे अधिग्रहण विहिरींव्दारे या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात चिखली तालुक्यातील ३९ गावांना ४३, संग्रामपूर तालुक्यातील १६ गावांना २४ विहिरींव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. बुलडाणा तालुक्यातील १४ गावांना १५ तर मेहकर तालुक्यातील ४२ गावांना ४३ विहिरींव्दारे पाणीपुरवठा होत आहे. तर मलकापूर, देऊळगावराजा व मोताळा तालुक्यातील एकही विहीर अधिग्रहीत करण्यात आली नाही.