शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

१२९ गावांवर जलसंकट!

By admin | Updated: May 1, 2017 01:13 IST

बुलडाणा : तापमान वाढीसह जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहे. या तापमानाच्या वाढ होणार असून, सध्या १२९ गावांत जलसंकट वाढले आहे.

२० टँकरद्वारे पाणीपुरवठा : १२५ खासगी विहिरींचा आधारबुलडाणा : दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागल्याने तापमानात वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहे. या तापमानाच्या तीव्रतेत मे हिटमुळे वाढ होणार असून, सध्या १२९ गावांत जलसंकट वाढले आहे. सदर जलसंकट दूर करण्यासाठी प्रशासनाद्वारे १८ गावांची २० टँकरद्वारे, तर १११ गावांची तहान १२५ खासगी विहिरींद्वारे भागविली जात आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पावसाची नोंद झाल्याने यंदा पाणीटंचाईने उशिरा डोके वर काढले. मात्र, विक्रमी तापमान, भूजल पातळीत होणारी वेगवान घट, पाण्याचे जलद गतीने होणारे बाष्पीभवन, कोरडे होणारे जलस्रोत यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मार्चमध्ये एकही गावात टँकर नसताना एप्रिल महिन्याच्या शेवटी १८ गावांची तहान २० टँकरद्वारे भागविली जात आहे. बुलडाणा व मेहकर तालुक्यात टँकरग्रस्त गावांची संख्या जास्त आहे. बुलडाणा तालुक्यातील चौथा, माळविहीर, हनवतखेड, गिरडा, गोंधनखेड, जांब या गावांना प्रत्येकी एका तर देऊळघाटात तीन टँकर सुरू असून रायपूर, शिरपूर या गावांना प्रत्येकी दोन टँकरद्वारे पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. देऊळघाट येथील नेहमीची पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणखी तीन टँकरची आवश्यकता आहे. मेहकर तालुक्यातील दुर्गबोरी, हिवरा साबळे, पारडी, अकोला ठाकरे, बोथा, वरवंड येथे प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दुसरीकडे चिखली तालुक्यातील सैलानीनगर, भोगावती, देऊळगाव राजा तालुक्यातील पाडळी शिंदे, नागणगाव, खामगाव तालुक्यातील निरोड, शिराळा येथे प्रत्येकी एक टँकर सुरू आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी येथे दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १११ गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण जिल्ह्यातील पाणीटंचाई ग्रस्त १११ गावासाठी १२५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या गावात पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसल्यामुळे अधिग्रहण विहिरींव्दारे या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात चिखली तालुक्यातील ३९ गावांना ४३, संग्रामपूर तालुक्यातील १६ गावांना २४ विहिरींव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. बुलडाणा तालुक्यातील १४ गावांना १५ तर मेहकर तालुक्यातील ४२ गावांना ४३ विहिरींव्दारे पाणीपुरवठा होत आहे. तर मलकापूर, देऊळगावराजा व मोताळा तालुक्यातील एकही विहीर अधिग्रहीत करण्यात आली नाही.