शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बुलडाणा जिल्ह्यात १८१ शाळांचा १०० टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 10:46 IST

जिल्ह्यातील १८१ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : फेब्रुवारी- मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील १८१ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त बुलडाणा तालुक्यातील ३९ तर सर्वात कमी संग्रामपूर तालुक्यातील ६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.जिल्ह्यात ३० हजार ८४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३० हजार ७३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २८ हजार ९६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ४५७७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, १४ १८१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ९७९९ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ४११ विद्यार्थी पास ग्रेसमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. खामगाव तालुक्यातील १२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, नांदुरा तालुक्यातील ८, संग्रामपूर तालुक्यातील ६, मलकापूर तालुक्यातील ७, बुलडाणा तालुक्यातील सर्वात जास्त ३९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच चिखली तालुक्यातील २७, मेहकर तालुक्यातील १३, लोणार तालुक्यातील १२, शेगाव तालुक्यातील १२, जळगाव जामोद तालुक्यातीाल १३, सिंदखेड राजा तालुक्यातील १८, देऊळगाव राजा तालुक्यातील ४ तसेच मोताळा तालुक्यातील १३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.यावर्षी बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांना कोरोनामुळे दबावाखाली द्यावी लागली. परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मास्क लावून बसविण्यात आले. यावर्षी बारावीचा निकाल लागला असला तरी पुढील प्रवेशप्रक्रिया केव्हा सुरू होणार, याबाबत अनिश्चितता आहे. महाविद्यालयांमध्ये सत्र केव्हा सुरू होणार याविषयी कोरोनामुळे गोंधळाचे वातावरण आहे.साडेचार हजार विद्यार्थी प्राविण्य श्रेणीतजिल्ह्यात परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी ४५७७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर केवळ ४११ विद्यार्थी पास ग्रेसमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात एकूण २८ हजार ९६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १४१८१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ९७९९ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालbuldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव