शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

१़ लाख २६ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:38 IST

संदीप वानखडे, बुलडाणा जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले हाेते़. त्यामुळे बॅंकांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले ...

संदीप वानखडे, बुलडाणा

जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले हाेते़. त्यामुळे बॅंकांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले हाेते़. त्याचा परिणाम पीक कर्ज वाटपावरही झाला आहे़. खरीप हंगामास सुरुवात हाेण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना ९० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे़. जिल्ह्यातील १३ हजार ७३१ शेतकऱ्यांना १८ मे पर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आले असून. १ लाख २६ हजार २६९ शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत़

खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़. या नुकसानीतून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली़. रब्बीतही शेतकऱ्यांना फारसे उत्पादन झाले नाही़. अनेक शेतकऱ्यांना कडक निर्बंधामुळे शेतमालाची विक्री करता आली नाही़. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा माेठा आधार असताे़; मात्र, मार्च महिन्यापासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने निर्बंध लागू केले हाेते़. दहा दिवस बॅंकाही बंद ठेवण्यात आल्याने पीक कर्ज वाटप रखडले आहे़. गतवर्षी एक लाख ५३ हजार ३४० शेतकऱ्यांना १हजार २५५ काेटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले़. गत वर्षीपासून लक्ष्यांकाच्या अर्धेही कर्जवाटप हाेत नसल्याने तीन वर्षाआधी केलेल्या कर्जवाटपाचा आधार घेऊन लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे़. यावर्षी जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० काेटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे़; मात्र, १८ मे पर्यंत बॅंकांनी १० टक्के शेतकऱ्यांना ९ टक्केच रकमेचे वितरण केले आहे़. याच गतीने कर्ज वाटप झाल्यानंतर खरीप हंगामाच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहण्याची भीती आहे़.

बॅंकांच्या कामकाजाची वेळ वाढवा

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बॅंकांच्या कामकाजाची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत केली आहे़. यादरम्यान नियमित ग्राहकांची माेठी गर्दी हाेत असल्याने शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहत आहेत़. वेळ कमी असल्याने शेतकऱ्यांसह ग्राहकांची माेठी गर्दी हाेत असून, रांगा लागत आहे़त. त्यामुळे, काेराेना संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त आहे़. त्यामुळे, प्रशासनाने बॅंकांचे कामकाज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवागनी देण्याची मागणी हाेत आहे़. तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची कामे प्राधान्याने करण्याचे आदेश देण्याची गरज आहे़.

गावपातळीवर शिबिरे घेण्याची गरज

पीक कर्ज वाटपाची गती माेठ्या प्रमाणात मंदावल्याचे चित्र आहे़. त्यामुळे गावपातळीवर विशेष शिबिरे घेउन पीक कर्जाचे वाटप करण्याची गरज आहे़. तसेच पीक कर्जाची प्रकरणे तातडीने निपटवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी हाेत आहे़.

खरीप हंगाम काही दिवसांवर आला असल्याने सर्वच बॅंकांना पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत़. १८ मे पर्यंत १३ हजार ७३१ शेतकऱ्यांना ११६ काेटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे़. येत्या काही दिवसांत पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्यात येणार आहे़.

नरेश हेडाउ, व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, बुलडाणा