शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

१़ लाख २६ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:38 IST

संदीप वानखडे, बुलडाणा जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले हाेते़. त्यामुळे बॅंकांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले ...

संदीप वानखडे, बुलडाणा

जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले हाेते़. त्यामुळे बॅंकांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले हाेते़. त्याचा परिणाम पीक कर्ज वाटपावरही झाला आहे़. खरीप हंगामास सुरुवात हाेण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना ९० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे़. जिल्ह्यातील १३ हजार ७३१ शेतकऱ्यांना १८ मे पर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आले असून. १ लाख २६ हजार २६९ शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत़

खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़. या नुकसानीतून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली़. रब्बीतही शेतकऱ्यांना फारसे उत्पादन झाले नाही़. अनेक शेतकऱ्यांना कडक निर्बंधामुळे शेतमालाची विक्री करता आली नाही़. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा माेठा आधार असताे़; मात्र, मार्च महिन्यापासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने निर्बंध लागू केले हाेते़. दहा दिवस बॅंकाही बंद ठेवण्यात आल्याने पीक कर्ज वाटप रखडले आहे़. गतवर्षी एक लाख ५३ हजार ३४० शेतकऱ्यांना १हजार २५५ काेटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले़. गत वर्षीपासून लक्ष्यांकाच्या अर्धेही कर्जवाटप हाेत नसल्याने तीन वर्षाआधी केलेल्या कर्जवाटपाचा आधार घेऊन लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे़. यावर्षी जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० काेटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे़; मात्र, १८ मे पर्यंत बॅंकांनी १० टक्के शेतकऱ्यांना ९ टक्केच रकमेचे वितरण केले आहे़. याच गतीने कर्ज वाटप झाल्यानंतर खरीप हंगामाच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहण्याची भीती आहे़.

बॅंकांच्या कामकाजाची वेळ वाढवा

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बॅंकांच्या कामकाजाची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत केली आहे़. यादरम्यान नियमित ग्राहकांची माेठी गर्दी हाेत असल्याने शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहत आहेत़. वेळ कमी असल्याने शेतकऱ्यांसह ग्राहकांची माेठी गर्दी हाेत असून, रांगा लागत आहे़त. त्यामुळे, काेराेना संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त आहे़. त्यामुळे, प्रशासनाने बॅंकांचे कामकाज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवागनी देण्याची मागणी हाेत आहे़. तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची कामे प्राधान्याने करण्याचे आदेश देण्याची गरज आहे़.

गावपातळीवर शिबिरे घेण्याची गरज

पीक कर्ज वाटपाची गती माेठ्या प्रमाणात मंदावल्याचे चित्र आहे़. त्यामुळे गावपातळीवर विशेष शिबिरे घेउन पीक कर्जाचे वाटप करण्याची गरज आहे़. तसेच पीक कर्जाची प्रकरणे तातडीने निपटवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी हाेत आहे़.

खरीप हंगाम काही दिवसांवर आला असल्याने सर्वच बॅंकांना पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत़. १८ मे पर्यंत १३ हजार ७३१ शेतकऱ्यांना ११६ काेटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे़. येत्या काही दिवसांत पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्यात येणार आहे़.

नरेश हेडाउ, व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, बुलडाणा