शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

१़ लाख २६ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:38 IST

संदीप वानखडे, बुलडाणा जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले हाेते़. त्यामुळे बॅंकांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले ...

संदीप वानखडे, बुलडाणा

जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले हाेते़. त्यामुळे बॅंकांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले हाेते़. त्याचा परिणाम पीक कर्ज वाटपावरही झाला आहे़. खरीप हंगामास सुरुवात हाेण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना ९० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे़. जिल्ह्यातील १३ हजार ७३१ शेतकऱ्यांना १८ मे पर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आले असून. १ लाख २६ हजार २६९ शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत़

खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़. या नुकसानीतून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली़. रब्बीतही शेतकऱ्यांना फारसे उत्पादन झाले नाही़. अनेक शेतकऱ्यांना कडक निर्बंधामुळे शेतमालाची विक्री करता आली नाही़. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा माेठा आधार असताे़; मात्र, मार्च महिन्यापासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने निर्बंध लागू केले हाेते़. दहा दिवस बॅंकाही बंद ठेवण्यात आल्याने पीक कर्ज वाटप रखडले आहे़. गतवर्षी एक लाख ५३ हजार ३४० शेतकऱ्यांना १हजार २५५ काेटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले़. गत वर्षीपासून लक्ष्यांकाच्या अर्धेही कर्जवाटप हाेत नसल्याने तीन वर्षाआधी केलेल्या कर्जवाटपाचा आधार घेऊन लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे़. यावर्षी जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० काेटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे़; मात्र, १८ मे पर्यंत बॅंकांनी १० टक्के शेतकऱ्यांना ९ टक्केच रकमेचे वितरण केले आहे़. याच गतीने कर्ज वाटप झाल्यानंतर खरीप हंगामाच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहण्याची भीती आहे़.

बॅंकांच्या कामकाजाची वेळ वाढवा

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बॅंकांच्या कामकाजाची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत केली आहे़. यादरम्यान नियमित ग्राहकांची माेठी गर्दी हाेत असल्याने शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहत आहेत़. वेळ कमी असल्याने शेतकऱ्यांसह ग्राहकांची माेठी गर्दी हाेत असून, रांगा लागत आहे़त. त्यामुळे, काेराेना संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त आहे़. त्यामुळे, प्रशासनाने बॅंकांचे कामकाज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवागनी देण्याची मागणी हाेत आहे़. तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची कामे प्राधान्याने करण्याचे आदेश देण्याची गरज आहे़.

गावपातळीवर शिबिरे घेण्याची गरज

पीक कर्ज वाटपाची गती माेठ्या प्रमाणात मंदावल्याचे चित्र आहे़. त्यामुळे गावपातळीवर विशेष शिबिरे घेउन पीक कर्जाचे वाटप करण्याची गरज आहे़. तसेच पीक कर्जाची प्रकरणे तातडीने निपटवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी हाेत आहे़.

खरीप हंगाम काही दिवसांवर आला असल्याने सर्वच बॅंकांना पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत़. १८ मे पर्यंत १३ हजार ७३१ शेतकऱ्यांना ११६ काेटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे़. येत्या काही दिवसांत पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्यात येणार आहे़.

नरेश हेडाउ, व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, बुलडाणा