शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीने घेतली कोरोनाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST

गोंदिया : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्हा परिषदेचे सात ते आठ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह ...

गोंदिया : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्हा परिषदेचे सात ते आठ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले, तर शासनानेसुद्धा ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित कामे करण्याचे व कार्यालयांमधील गर्दी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. याची अंमलबजावणी करीत सोमवारपासून (दि.५) जिल्हा परिषदेमध्ये कामासाठी येणाऱ्यांना प्रवेशव्दारावर ‘नो एन्ट्री’ करण्यात आली. त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना याचा पहिल्याच दिवशी फटका बसला.

जिल्हा परिषदेच्या तीन-चार विभागात ७ ते ८ कर्मचारी कोराेनाबाधित आले तर जिल्ह्यातसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत गर्दी कमी करण्यासाठी सोमवारपासून बाहेरून कामासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेशबंदी केली.

महत्त्वाचे काम असेल तरच आणि प्रत्यक्षात येण्याची आवश्यकता असेल तरच यावे अन्यथा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधून आपली कामे करून घ्यावी, असे आदेश दिले. मात्र जिल्हा परिषदेने हा निर्णय कुठलीही पूर्वसूचना न देता घेतल्याने याचा कामासाठी आलेल्या नागरिकांना याचा फटका बसला. गोंदिया जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणापासून सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनीसारखे तालुके ६० किलोमीटर अंतरावर आहेत तर तिरोडा, आमगाव तालुक्याचे अंतर हे ३० किलोमीटरचे आहे. त्यातच चिचगड, केशोरी, दरेकसासारखा भाग हा १०० किलोमीटरच्या जवळपासचा असून, येथील नागरिक, कर्मचारी हे महत्त्वाचे काम असले तरच येतात. मात्र आज सीईओंच्या अचानक घेतलेल्या या ‘नो एन्ट्री’ निर्णयाचा चांगलाच आर्थिक व मानसिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला.

यावेळी अनेकांनी खरोखरच जिल्हा परिषदेत पदाधिकारी असते तर अधिकारी एवढी मनमर्जी करण्यापासून थांबले असते अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.

यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रवेशव्दारावर नो एन्ट्री केली नसल्याचे सांगत काही निर्बंध लागू केले असल्याचे सांगितले.

सरपंचांना बसला फटका

गोरेगाव तालुक्यातील काही सरपंच ग्रामपंचायतीचे काही बांधकामांचे प्रस्ताव घेऊन आले होते. त्यांनाही परत जावे लागले. अधिकारी मात्र वाढता कोरोना संसर्ग बघून मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत लोकांसाठीही ‘नो एंट्री’ करण्यात आल्याचे सांगत आहेत. विशेष म्हणजे प्रवेशव्दारावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कुणीही आत जाणार नाही याची काळजी घेण्याची ताकीद दिली असल्याची माहिती आहे.