शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीने घेतली कोरोनाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST

गोंदिया : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्हा परिषदेचे सात ते आठ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह ...

गोंदिया : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्हा परिषदेचे सात ते आठ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले, तर शासनानेसुद्धा ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित कामे करण्याचे व कार्यालयांमधील गर्दी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. याची अंमलबजावणी करीत सोमवारपासून (दि.५) जिल्हा परिषदेमध्ये कामासाठी येणाऱ्यांना प्रवेशव्दारावर ‘नो एन्ट्री’ करण्यात आली. त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना याचा पहिल्याच दिवशी फटका बसला.

जिल्हा परिषदेच्या तीन-चार विभागात ७ ते ८ कर्मचारी कोराेनाबाधित आले तर जिल्ह्यातसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत गर्दी कमी करण्यासाठी सोमवारपासून बाहेरून कामासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेशबंदी केली.

महत्त्वाचे काम असेल तरच आणि प्रत्यक्षात येण्याची आवश्यकता असेल तरच यावे अन्यथा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधून आपली कामे करून घ्यावी, असे आदेश दिले. मात्र जिल्हा परिषदेने हा निर्णय कुठलीही पूर्वसूचना न देता घेतल्याने याचा कामासाठी आलेल्या नागरिकांना याचा फटका बसला. गोंदिया जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणापासून सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनीसारखे तालुके ६० किलोमीटर अंतरावर आहेत तर तिरोडा, आमगाव तालुक्याचे अंतर हे ३० किलोमीटरचे आहे. त्यातच चिचगड, केशोरी, दरेकसासारखा भाग हा १०० किलोमीटरच्या जवळपासचा असून, येथील नागरिक, कर्मचारी हे महत्त्वाचे काम असले तरच येतात. मात्र आज सीईओंच्या अचानक घेतलेल्या या ‘नो एन्ट्री’ निर्णयाचा चांगलाच आर्थिक व मानसिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला.

यावेळी अनेकांनी खरोखरच जिल्हा परिषदेत पदाधिकारी असते तर अधिकारी एवढी मनमर्जी करण्यापासून थांबले असते अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.

यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रवेशव्दारावर नो एन्ट्री केली नसल्याचे सांगत काही निर्बंध लागू केले असल्याचे सांगितले.

सरपंचांना बसला फटका

गोरेगाव तालुक्यातील काही सरपंच ग्रामपंचायतीचे काही बांधकामांचे प्रस्ताव घेऊन आले होते. त्यांनाही परत जावे लागले. अधिकारी मात्र वाढता कोरोना संसर्ग बघून मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत लोकांसाठीही ‘नो एंट्री’ करण्यात आल्याचे सांगत आहेत. विशेष म्हणजे प्रवेशव्दारावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कुणीही आत जाणार नाही याची काळजी घेण्याची ताकीद दिली असल्याची माहिती आहे.