शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणा केल्याच्या संशयावरून जबर मारहाण

By admin | Updated: July 10, 2016 00:24 IST

जादुटोणा केल्याच्या संशयावरुन एका संतप्त जमावाने दोघांच्या घरात शिरून जबर मारहाण करण्यात आले.

गंगाझरी पोलिसांचे दुर्लक्ष : जीवे मारण्याची धमकीएकोडी : जादुटोणा केल्याच्या संशयावरुन एका संतप्त जमावाने दोघांच्या घरात शिरून जबर मारहाण करण्यात आले. ही घटना गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एकोडी येथे १ जुलैच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लोकांमध्ये आजच्या वैज्ञानिक काळातही किती मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे, याची प्रचिती येते.एकोडी येथील रहिवासी मुरलीधर गोमा सांगोडे (५९) आणि चुन्नीलाल शिवलाल बिसेन (६०) या दोघांनी ‘माझ्या बायकोला भूत भरविले’ असे म्हणत आरोपी ४० ते ५० लोकांच्या जमावासह मुरलीधर सांगोळेच्या यांच्या घराकडे गेले. घराचे दार आतून बंद होते. त्यामुळे जमावापैकी श्रीराम बन्सीलाल खजरिया, अंगलाल बन्सीलाल खमरीया, सुनिता श्रीराम खजरिया, सीमा अंबालाल खजरिया व अशोक उके सर्व रा. एकोडी यांनी दाराला लात मारून उघडले. यानंतर घरात शिरुन कपडे फाटतेपर्यंत मुरलीदासला मारहाण करण्यात आली. जातीवाचक शिवीगाळ देवून तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून तुझ्याच चौकात फेकून देवू, अशी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. आई-बहिण व नाना प्रकारची शिवीगाळ करण्यात आली. त्यावेळी सांगोळे यांच्या नातीनने माझ्या आजोबाला का मारता, असे विचारले असता तिला अशोक उके याने धक्का मारत खाली पाडले, असा आरोप आहे.एकाएकी झालेला हल्ला पाहून मोठ्याने आरडाओरड सुरू झाली. त्यामुळे शेजारी लोकांनी धाव घेतली. त्यामुळे मारहाण करणारे व सोबत असलेला ४०-५० लोकांचा जमाव निघून गेला. यानंतर या जमावाने आपला मोर्चा चुन्नीलाल शिवलाल बिसेन यांच्या घराकडे वळला. त्यात चुन्नीलाल बिसेन यांना जातीवाचक शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी सदर आरोपींनी दिली. या प्रकरणाची तक्रार मुरलीधर गोमा सांगोळे यांनी त्याच रात्री १० वाजताच्या सुमारास गंगाझरी पोलीस ठाण्यात केली. मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा (कलम ५०४, ५०६) नोंद केला. तर चुन्नीलाल बिसेन यांनी २ जुलै रोजी या प्रकरणाची तक्रार दाखल केली. यामुळे मुरलीधर सांगोळे व चुन्नीलाल बिसेन यांनी ज्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्याकडून जिवाला धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्चचिन्हया प्रकरणाची गंगाझरी पोलीस ठाण्यात तक्रार देवून एक आठवड्याचा कालावधी लोटत आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अर्जदारांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला असून पोलिसांशी गैरअर्जदारांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रकरण थंडबस्त्यात घालून कारवाई न करता तडजोड करून मार्ग काढण्याचा सल्ला पोलीसच देत आहेत. त्यामुळे गावातही पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली जात आहे.