शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले 'झिरी' देवस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:23 IST

आयुध निर्माणी कंपनी परिसरालगत शहापूर मंडळ वनपरिक्षेत्र परिसरात असलेल्या सह्यांद्री भिमसेन पहाडीच्या पर्वतरांगामध्ये हिरव्या शालुने नटलेल्या कुशीत झिरी येथे भोळ्या शंकराच्या वास्तव्यामुळे धार्मिक महत्व प्राप्त झालेले आहे.

ठळक मुद्देआज महाशिवरात्री : भाविकांची उसळणार गर्दी

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : आयुध निर्माणी कंपनी परिसरालगत शहापूर मंडळ वनपरिक्षेत्र परिसरात असलेल्या सह्यांद्री भिमसेन पहाडीच्या पर्वतरांगामध्ये हिरव्या शालुने नटलेल्या कुशीत झिरी येथे भोळ्या शंकराच्या वास्तव्यामुळे धार्मिक महत्व प्राप्त झालेले आहे. येथे दरवर्षी विदर्भातील हजारो भाविक दर्शनाकरिता मुक्कामाने या ठिकाणी येतात.भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गापासून शहापूरच्या दक्षिणेस चार किलोमीटर तर ठाणा पेट्रोलपंप याठिकाणाहून दक्षिणेस सहा किलोमिटर अंतरावर नांदोरा गावाशेजारी शहापूर मंडळ वन परिक्षेत्रामध्ये सह्यांद्री भिमसेन पहाडीच्या मतधोमध झिरी हे स्थान आहे. या परिसरात छोट्या छोट्या पहाडीच्या रांगा आहेत. पहाडीच्या रांगामध्ये भोले शंकर यांचे देवस्थान आहे. अलिकडेच घोषित जिल्हा पर्यटन यादीत या ठिकाणची नोंदी केली आहे.महाशिवरात्री निमित्त पाच दिवसापर्यंत येथे जत्रेचे स्वरूप असतो. पुर्वी याठिकाणी भंडाºयाहून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान आता भंडारा, शहापूर, ठाणा, जवाहरनगरहून खासगी वाहनांची वाहतूक वाढली आहे. ही वाहतूक यंत्रणा सांभाळण्यासाठी जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेवारे यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.या ठिकाणचे एक वैशीष्ट आहे की जमिनीपासून १०० मीटर उंच अंतरावर पहाडीवरील दगड चिंपांमधून एक निर्मल पाण्याचा झरा सदैव बाराही महिने वाहन असतो. म्हणून या ठिकाणाला झिरी असे शब्द प्रयोग लावण्यात आले. या ठिकाणी दोन पाण्याचे कुंड आहेत. एकाचा वापर पिण्याकरिता तर दुसºया कुंडांचा वापर बाह्यवापराकरिता करण्यात येतो.निसर्गाची अदभुत किमया दगडातून पाणी पहाडीच्या खालच्या नळाला पुरातन काळातील विहिर आहे, जी बाहुली नावाने प्रसिद्ध आहे. या पहाडीच्या कुशीमध्ये शिवमंदिर, राधाकृष्ण, अम्बादेवी, चवरागड, राम-लक्ष्मण, शिवपीड, गोरखनाथ, हनुमान, गणेश, शिवाजी आणि दर्शनालू करिता विशालकाय या वृक्षाखाली एक सभा मंडप आहे. या ठिकाणी शिवरात्रीच्या पर्वावर १३ फेब्रुवारी पासून पाच दिवसाची यात्रा आयोजित केली आहे.यात्रेकरू करीत सुलभ शौचालयाची सार्वजनिक व्यवस्था करण्यात आलेली नाही. याकरिता शासनाने याकडे जातीने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.