शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

जि.प. पदाधिकाºयांच्या दौºयावर आचारसंहितेचा ‘लगाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:37 IST

जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता १ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. या आचारसंहितेतही जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी त्यांच्या शासकीय वाहनाने दौरे सुरुच ठेवले होते.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : जिल्हाधिकाºयांनी बजावले आदेश

प्रशांत देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता १ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. या आचारसंहितेतही जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी त्यांच्या शासकीय वाहनाने दौरे सुरुच ठेवले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आज जिल्हा परिषद प्रशासनाला पत्र बजावून पदाधिकाºयांच्या दौºयांवर ‘लगाम’ लावला आहे.ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्हा परिषद ही ग्रामपंचायतचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने १ सप्टेंबर पासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. असे असताना येथील पदाधिकाºयांनी त्यांचे शासकीय वाहन प्रशासनाकडे जमा न करता या वाहनातून शासकीय दौरे सुरुच ठेवले. यामुळे निवडणुकीच्या काळात सदर पदाधिकाºयांकडून वाहनाच्या माध्यमातून दौरा करून निवडणूक असलेल्या गावात किंवा लगतच्या गावात आदर्श आचार संहितेचा भंग होण्याची शक्यता नाकारता येण्याजोगी नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदर्श आचारसंहितेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम, अर्थ व बांधकाम सभापती विनायक बुरडे व महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले हे जिल्हा परिषदेची धुरा सांभाळीत आहेत.या पदाधिकाºयांना जिल्ह्याचा दौरा करण्याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने सर्वांना वाहन दिलेले आहे. मात्र जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागली असताना त्या पदाधिकाºयांनी वाहन शासनाकडे जमा न करता त्या वाहनातून अद्यापही दौरे सुरु आहेत.जिल्ह्यात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला आज सायंकाळी पत्र बजावले. या पत्रात त्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाºयांना जिल्हा परिषद ते त्यांचे भंडारा येथील शासकीय निवासस्थान या दरम्यान सदर वाहनाचा वापर करण्याची त्यांचा मुभा दिली आहे. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या पत्रामुळे जिल्हा परिषद पदाधिकाºयांचे नियोजित शासकीय दौºयांवर अंकुश येणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आज सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाला पत्र प्राप्त झाले. या पत्राच्या अनुषंगाने जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून १४ सप्टेंबरला शासकीय वाहन परत करतील.-भाग्यश्री गिलोरकर, अध्यक्ष जि.प.भंडारा.