शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जिंदगीभर एहसान नही भुलेंगे साहब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

जवळपास १५ ते २० दिवस व्यवसाय केला अन् देशात कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव दिसून आला. शासनाने जमावबंदी व संचारबंदीचे आदेश निर्गमीत करताच यांचा व्यवसायही बंद पडला. चप्राड येथील समाजमंदिरात वास्तव्य करु लागले. सुरुवातीच्या दिवसात जमा असलेल्या पैशातून संसाराचा गाडा चालविला. मात्र हाताला कामच नसल्याने अल्पावधीच उपासमारीची वेळ त्यावर आली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये गाडी लोहार कुटुंबांची व्यथा : आपबिती सांगताना अनेकांचे डोळे पाणावले

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : लोखंडी हत्यारे बनवून विक्री करणे हा त्यांचा मुळचा व्यवसाय. मुळचे मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील असून दरवर्षी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करुन संसाराचा गाडा चालवित होते. मात्र यावर्षी कोरोना विषाणुच्या थैमानाने होत्याचे नव्हते झाले. काम तर बंदच पण पोटाचाही प्रश्न सुटेना. अशातच गावकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीने भारावून जात जाता जाता 'जिंदगीभर एहसान नही भुलेंगे साहब' म्हणत रवाना झाले. गाडी लोहार कुटुंब आपली आपबिती सांगाताना अनेकांचे डोळे पाणावले.वाचकांना कथानक वाटावे अशी ही वास्तवदर्शी चित्र आहे. लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथील चार महिन्यापुर्वी जवळपास होळीच्या सणाच्या दरम्यान मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील जवळपास १५ नागरीक बैलगाडीतून भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात दाखल झाले. तालुक्याच्या ठिकाणाहून लोखंड विकत घेऊन आणणे व त्यापासून शेतीसाठी लागणारी अवजारे तयार करुन विकणे हा त्यांचा मुळचा व्यवसाय.जवळपास १५ ते २० दिवस व्यवसाय केला अन् देशात कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव दिसून आला. शासनाने जमावबंदी व संचारबंदीचे आदेश निर्गमीत करताच यांचा व्यवसायही बंद पडला. चप्राड येथील समाजमंदिरात वास्तव्य करु लागले. सुरुवातीच्या दिवसात जमा असलेल्या पैशातून संसाराचा गाडा चालविला. मात्र हाताला कामच नसल्याने अल्पावधीच उपासमारीची वेळ त्यावर आली. त्यांनी बैलगाडीला असलेले बैल विकुन आपल्या संसाराचा गाडा चालविला. नंतर आपली समस्या गावातील पदाधिकाऱ्यांना सांगुन मदतीची विनवणी केली. गावातील नागरिकांनी जमेल ती मदत करुन त्यांच्या संसाराचा गाडा चालविण्यात हातभार लावला.संसार सुरु असतांनाच लॉकडाऊन वाढतच असतानाचे पाहुन त्यांनी स्वगावी जाण्याचा निर्धार करीत मदतिला धावणाºया पदाधिकाºयांना सांगितले. पदाधिकाºयांनी त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून त्यांना स्वगावी जाण्याची परवानगी दिली. स्वगावी जात असतांना उपस्थीत नागरिकांचे डोळे पाणावले असतांना प्रत्येकाच्या तोंडातुन एकच शब्द बाहेर पडत होते 'जिंदगीभर एहसान नही भुलेंगे साहब....' याप्रमाणे अनेक मजूर कोरोनाच्या संकटात अडकले असून त्यांच्या मदतीसाठी हात सरसावत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या