शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

शिष्यवृती परीक्षेत जिल्हा परिषद हायस्कूल अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST

लाखांदूर : केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून, लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद ...

लाखांदूर : केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून, लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर येथील तब्बल १६ विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले. या शाळेने तालुक्यात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे.

केंद्र शासनामार्फत इयत्ता ८वीच्या विद्यार्थ्यांकरीता पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांना दरमहा हजार रुपये असे वार्षिक १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती सलग ४ वर्षे म्हणजेच पात्र विद्यार्थ्याच्या इयत्ता १२वीपर्यंत दिली जाते. सदरची परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची होत असून, यात एकाच दिवशी दोन पेपर घेतले जात असल्याची माहिती आहे.

या परीक्षेत लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रगती हेमराज धोटे, धनश्री खुशाल मेंढे, प्रांजली यशवंत जांभुळकर, ऋचिता राजकुमार बुरडे, अनिकेत अमृत केळझरकर, क्रिस्ती भाग्यवान मोटघरे, पूजा सचिन सोनटक्के, साक्षी उमेश दिवठे, पल्लवी गिरीधर दिवठे, कुंजल शैलेश रामटेेके, निशांत नागेश्वर वकेकार, दुश्यंत शैलेश शिंगाडे, हसिना गौतम जांभूळकर, केतन देविदास उके, शुभांगिनी विश्वनाथ निमजे व पायल प्रदीप निमजे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन भरल्यानंतर, येथील मुख्याध्यापक रवि मेश्राम यांच्या नेतृत्वात व विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनात त्यांना संबंधित परीक्षेच्या अभासक्रमाची अद्ययावत माहिती देण्यात आली. त्यानंतर, जवळपास ३ महिने दर रविवारी सराव परीक्षा घेऊन, परीक्षा झाल्यानंतर त्यातील प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे सांगीतली जात असून, नियमित गृहपाठ व प्रत्येक विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष दिले जात असल्याची माहिती यातील उत्तीर्ण विद्यार्थ्याने दिली.

विद्यार्थ्यांच्या यशस्वितेसाठी जि.प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक रवि मेश्राम यांच्या नेतृत्वात वर्गशिक्षक अरुण पारधी, चेतना वझाडे, विषय शिक्षक प्रतिभा पडोळे, प्रेमलाल गावडकर, नितीन पारधी, गोवर्धन वाघधरे, प्रमोद जांभुळकर, शुभांगी खोटेले, नितेश नाकतोडे व दीक्षा जनबंधू यांनी अथक परिश्रम घेतले.