शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

शिष्यवृती परीक्षेत जिल्हा परिषद हायस्कूल अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST

लाखांदूर : केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून, लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद ...

लाखांदूर : केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून, लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर येथील तब्बल १६ विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले. या शाळेने तालुक्यात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे.

केंद्र शासनामार्फत इयत्ता ८वीच्या विद्यार्थ्यांकरीता पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांना दरमहा हजार रुपये असे वार्षिक १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती सलग ४ वर्षे म्हणजेच पात्र विद्यार्थ्याच्या इयत्ता १२वीपर्यंत दिली जाते. सदरची परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची होत असून, यात एकाच दिवशी दोन पेपर घेतले जात असल्याची माहिती आहे.

या परीक्षेत लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रगती हेमराज धोटे, धनश्री खुशाल मेंढे, प्रांजली यशवंत जांभुळकर, ऋचिता राजकुमार बुरडे, अनिकेत अमृत केळझरकर, क्रिस्ती भाग्यवान मोटघरे, पूजा सचिन सोनटक्के, साक्षी उमेश दिवठे, पल्लवी गिरीधर दिवठे, कुंजल शैलेश रामटेेके, निशांत नागेश्वर वकेकार, दुश्यंत शैलेश शिंगाडे, हसिना गौतम जांभूळकर, केतन देविदास उके, शुभांगिनी विश्वनाथ निमजे व पायल प्रदीप निमजे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन भरल्यानंतर, येथील मुख्याध्यापक रवि मेश्राम यांच्या नेतृत्वात व विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनात त्यांना संबंधित परीक्षेच्या अभासक्रमाची अद्ययावत माहिती देण्यात आली. त्यानंतर, जवळपास ३ महिने दर रविवारी सराव परीक्षा घेऊन, परीक्षा झाल्यानंतर त्यातील प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे सांगीतली जात असून, नियमित गृहपाठ व प्रत्येक विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष दिले जात असल्याची माहिती यातील उत्तीर्ण विद्यार्थ्याने दिली.

विद्यार्थ्यांच्या यशस्वितेसाठी जि.प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक रवि मेश्राम यांच्या नेतृत्वात वर्गशिक्षक अरुण पारधी, चेतना वझाडे, विषय शिक्षक प्रतिभा पडोळे, प्रेमलाल गावडकर, नितीन पारधी, गोवर्धन वाघधरे, प्रमोद जांभुळकर, शुभांगी खोटेले, नितेश नाकतोडे व दीक्षा जनबंधू यांनी अथक परिश्रम घेतले.