शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

जिल्हा परिषद निवडणूक सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST

कोरोना महामारीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त आहेत. आता कोरोना महामारीचे संकटही कमी ...

कोरोना महामारीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त आहेत. आता कोरोना महामारीचे संकटही कमी झाले आहे. जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. भंडारा जिल्हा परिषदेत ५२ गट आणि ७ पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. गत काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, युती-आघाडी होणार की, स्वतंत्र लढावे लागणार याबाबत कोणताच निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला नाही. त्यामुळे प्रत्येकच पक्षाने जिल्हा परिषदांच्या सर्वच ५२ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, अशी आघाडी होऊन निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, स्थानिक कार्यकर्ते युती- आघाडी करा; परंतु ती निवडणुकीनंतर, अशी आग्रही भूमिका घेत आहेत. काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी चालविली आहे. राष्ट्रवादीनेही स्वतंत्र लढण्याचीच मानसिकता केली आहे. शिवसेना तर पूर्ण ताकतीने या निवडणुकीत उतरू आणि भाजपला जागा दाखवू, असे सांगत आहे, तर भाजप सध्या राज्यात विरोधी पक्षात असल्याने स्वतंत्र निवडणूक लढवून आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीत आहे.

बाॅक्स

मतांचे विभाजन टाळण्यासाठी एकत्र लढणे गरजेचे

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वतंत्र लढले, तर मत विभाजनाचा फायदा भाजपला मिळेल, अशी काही जणांची भावना आहे. या तीन पक्षांनी गत विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात एकत्र येऊन निवडणूक लढली आणि भाजपचा गड असलेला मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे खेचून आणला. असाच प्रयोग जिल्हा परिषदेत करावा, अशी भूमिका आहे, तर दुसरीकडे तीन पक्ष एकत्र लढल्यास स्थानिक पातळीवर बंडखोरी होऊन विरोधकांना त्याचा फायदा होईल, अशीही चर्चा आहे. त्यामुळे आता वरिष्ठ काय निर्णय घेतात आणि निवडणूक स्वतंत्र लढतात की एकत्र, याची उत्सुकता सर्वांना आहे.

बाॅक्स

स्थानिक आघाड्या उतरणार मैदानात

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत चार प्रमुख पक्षांसह इतर पक्ष आणि स्थानिक आघाड्याही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. माजी आमदार सेवक वाघाये यांनी अशी तयारी चालविली आहे. इतर गटही आघाड्या स्थापन करून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत, तसेच वेळेवर तिकीट न मिळालेले अनेक बंडखोरही रिंगणात राहतील. त्यामुळे तिकीट वाटप करणे सर्वच पक्षांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

कोट

राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक स्वतंत्र लढण्याचे नियोजन केले आहे. कार्यकर्त्यांची तशीच भावना आहे; परंतु आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल योग्य निर्णय घेतील. वरिष्ठांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.

-नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी

काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना स्वतंत्र आणि स्वबळावर निवडणूक लढण्याची आहे. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, त्यानंतरच योग्य निर्णय घेतला जाईल; परंतु निवडणुकीनंतर युती करावी, अशी सर्वांची भूमिका आहे.

-मोहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

शिवसेना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत संपूर्ण ताकदीने लढणार आहे. आम्हाला भाजपला या निवडणुकीत जागा दाखवायची आहे. भाजप सोडून कुणाशीही आम्ही आघाडी करू शकतो, तसेच वरिष्ठ जो आदेश देतील त्या आदेशाचे पालन केले जाईल.

-ॲड. रवी वाढई, जिल्हा शिवसेनाप्रमुख