शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

जिल्हा परिषद प्रशासनाला २२ दिवसांचा अल्टिमेटम

By admin | Updated: April 8, 2017 00:24 IST

ग्रामपंचायतीने दिव्यांग (अपंग) बांधवांवर तीन टक्के निधी खर्च करण्याचे शासन अध्यादेश आहे. मात्र, जिल्ह्यातील अपंगांना या निधीचा लाख दिला नसल्याने लाखोंचा निधी अखर्चित आहे.

दिव्यांगांचे आक्रोश आंदोलन : बच्चू कडूंचा इशारा, सीईओ-समाजकल्याण अधिकाऱ्यांची कानउघाडणीभंडारा : ग्रामपंचायतीने दिव्यांग (अपंग) बांधवांवर तीन टक्के निधी खर्च करण्याचे शासन अध्यादेश आहे. मात्र, जिल्ह्यातील अपंगांना या निधीचा लाख दिला नसल्याने लाखोंचा निधी अखर्चित आहे. हा निधी जिल्हा परिषद प्रशासनाने अपंग बांधवांवर खर्च करावा, अशा सुचना आमदार बच्चू कडू यांनी दिल्या. दरम्यान त्यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून शुक्रवारला अपंग बांधवांचा जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आलेल्या आमदार बच्चू कडूंच्या ‘फैसला आॅन दी स्पॉट’ कार्यक्रमात त्यांनी अधिकाऱ्यांना सुचना वजा इशारा दिला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांच्यासह समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून अपंग बांधवांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो अपंग बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार बच्चू कडू यांनी केले. (शहर प्रतिनिधी)अपंग बांधवांना मिळणार न्यायभंडारा : अपंग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी हनुमंत झोटींग, गजू कुबडे, विजय पाखमोडे, रवि मने, धनराज घुमे, रमेश खेडकर, उमेश राऊत, प्रशांत शिवणकर, योगेश घाटबांधे, विनायक पुडके यांच्यासह शेकडो बांधव उपस्थित होते. मार्चा जिल्हा परिषदमध्ये दाखल झाल्यावर सभागृहात त्यावर चर्चा झाली.यात आमदार बच्चू कडू यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी व समाजकल्याण अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अपंग बांधवांनी त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची कैफियत अनेकांनी मांडली. यावर आमदार कडू उद्वीग्द झाले. त्यांनी जिल्ह्यातील सर्व अपंग बांधवांची नोंदणी करण्याच्यादृष्टिने पंधरवाडा राबवा व त्याचा आढावा दर महिन्याला घेण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. यासाठी जनजागृती करण्याच्या सुचनाही यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, भंडाराचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (शहर प्रतिनिधी)अनेक समस्या निकाली काढल्याअपंगांच्या अनेक समस्या आवासून आहेत. यात घरकुल हा प्रमुख मुद्दा होता. तर अनेकांना विवाहानंतरही त्यांचा शासकीय निधी मिळाला नसल्याची बाब समोर आली. अपंग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अ, ब, क, ड या प्रक्रियेनुसार वर्गवारी करून सर्वांना शासकीय योजनांचा लाभ देण्याच्य सुचना यावेळी आमदार कडू यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. एका अधिकाऱ्याने तर अपंग बांधवांना योजनांचा लाभ दिल्याचे सांगितले. यावर त्यांना लाभार्थ्यांची यादी मागितली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. तर एका अधिकाऱ्याने तर शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करण्यात येत असतानाही निधी मिळाला नाही, असे सांगून वेळमारून नेण्याचा प्रयत्न केला. यावर आमदार कडू यांनी संबंधीत अधिकाऱ्यांनी शासनाकडे केलेल्या पाठपूराव्याचे कागदपत्राची मागणी केली असता, त्यांनीही ते देण्याचे टाळले. एकंदरितच आमदार बच्चू कडू यांच्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.-तर ग्रामसेवकांवर कारवाईग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीपैकी किंवा उत्पन्नापैकी तीन टक्के निधी अपंग बांधवांवर खर्च करावयाचा आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये याचा लाभ अद्याप कुणालाही मिळाला नसल्याची गंभीर बाब समोर आली. यामुळे आमदार कडू यांनी ३० एप्रिलपर्यंत प्रत्येक ग्रामसेवकाने हा निधी खर्च करावा, अन्यथा त्याच्यात हयगय करणाऱ्या ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अपंगांची हेळसांड किंवा त्यांना शिविगाळ केल्यास अ‍ॅक्ट्रासिटीअंतर्गत गुन्हा नोंदविण्याची दरतूद असल्याचेही कडू यांनी सांगितले. सर्व अधिकाऱ्यांनी योजनांचा लाभ देण्यासाठी यादी अद्यावत करण्याच्या सुचनाही दिल्या.समाजकल्याण अधिकाऱ्यांची पळापळीजिल्ह्यातील अपंगबांधवांना लघू उद्योगासाठी निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती यावेळी समाजकल्याण अधिकारी यांनी सभागृहात सांगितली. यावेळी उपस्थित बांधवांनी आक्रोश करून निधी मिळालाच नसल्याची तक्रार लावून धरली. यावर आमदार कडू यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तर ग्रामपंचायत तीन टक्के निधी अपंगांवर खर्च करण्यात नसल्याची बाब समोर आल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनाही चांगलेच खडेबोल सुनावले. ही निधी ३० एप्रिलपर्यंत खर्च करण्याच्या सुचना देण्यात आल्या. अपंगांच्या प्रलंबीत समस्यांना घेऊन आमदार कडू यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने अपंग बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले तर अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळी झाली.