लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीचे पात्रातून रेतीचा अवैध उपसा करण्यात आल्यानंतर सिहोरा परिसरातील सितेपार, खैरलांजी, डोंगरला गावाचे मार्ग लगत माफियांनी डम्पिंग तयार केले आहे. यात रेती माफियावर अंकुश घालण्यात प्रशासनाला अपयश आल्याने गावकऱ्यात रोष व्याप्त आहे. वाहनाचे वर्दळीने नागरिकांमध्ये अपघाताची भीती आहे.वैनगंगा नदीचे काठावरील तामसवाडी गाव रेती चोरीने चर्चेत आला आहे. या गावाचे नदी पात्रातून राजरोसपणे रेतीचा उपसा करण्यात येत आहे. गावकरी रेती चोरी थांबविण्याकरिता अनेक निवेदन देत आहेत. वाहनाच्या भरधाव वेगाने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा करण्यात आल्यानंतर माफियांनी सितेपार, खैरलांजी, डोंगरला गावाचे मार्गावर डम्पिंग यॉर्ड तयार केले आहेत.या डम्पिंग यॉर्डमधून रात्री जेसीबी मशीनने ट्रकमध्ये रेतीचा उपसा करण्यात येत आहे. गाव आणि गावाचे शिवारात रेती माफियांनी धुमाकूळ घातले असतांना प्रशासन अंकुश घालत नाही. या गावातून रेतीचा अवैध उपसा थांबविण्याकरिता आठवडाभर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतु नंतर पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला आहे. गावकरी शेती माफियापासून सुरक्षीत उपाय योजना करिता प्रशासनाला विनंती करीत आहेत. परंतु साटेलोटे प्रकाशने गावकऱ्यांना यंत्रणेचा सहकार्य मिळत नाही. या गावाचे घाटातून उपसा करण्यात आलेली रेती डम्पिंग यार्ड मध्ये साठवणुक आहे. डोंगरला गावात महसूल विभागाचे तलाठी कार्यालय आहे. याच गावाचे काही अंतरावर पांढºया रेतीचा काळाबाजार सुरु असतांना आलबेल सुरु असल्याचे चित्र आहे.परिसरात रोज रात्री ५० ते ६० ट्रक रेतीची वाहतुक करण्यात येत आहे. याशिवाय हैद्राबाद शहरात रेती विक्री केली जात आहे. मुख्य मार्गावरुन ट्रकची वाहतुक करण्यात येत नाही. याशिवाय प्रशासन धडक मोहीम राबवित नाही.डम्पिंग यार्डची जागा वारंवार बदलविण्यात येत आहे. विशेष म्हणजे शासकीय जागा शोधून माफिया रेतीचे डम्पिंग करीत आहेत. यामुळे जागेचा खाजगी मालक राहत नसल्याने कारवाईची भीती राहत नाही. रेती माफियाचे समोर प्रशासन हतबल असल्याचे चित्र आहे. यामुळे गावकºयात असंतोष आहे. प्रशासन सहकार्य करीत नसल्याने गावकºयांनी आता माफियांचे विरोधात बोलने बंद केल्याने दिसून येत आहे.जनसुनावणी लांबणीवरया परिसरातील तामसवाडी, रेंगेपार (पांजरा), वारपिंडकेपार, सोंड्या घाटाचे लिलाव प्रक्रियेसाठी जनसुनावणी करिता १२ आणि १६ मार्च तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु ही तारीख तांत्रिक कारणाने पुढे ढकलण्यात आली आहे. रेती घाटाचे लिलाव प्रक्रिया नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात राबविण्यात येत नाही. तीन महिन्यानंतर पावसाळा लागणार असल्याने घाटाचे लिलाव प्रक्रिया थांबणार आहे. जनसुनावणी पे जनसुनावणी असे चित्र असल्याने रेती माफियांना रान मोकडे झाले आहे.रेतीची वाहतूक बंद करण्याकरिता जानेवारी महिन्यात निवेदन दिले होते. परंतु आश्वासन पूर्ण केले नाही.- बेबी ठाकरे,सरपंच तामसवाडी
रेती माफियांवर कारवाई शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST
या डम्पिंग यॉर्डमधून रात्री जेसीबी मशीनने ट्रकमध्ये रेतीचा उपसा करण्यात येत आहे. गाव आणि गावाचे शिवारात रेती माफियांनी धुमाकूळ घातले असतांना प्रशासन अंकुश घालत नाही. या गावातून रेतीचा अवैध उपसा थांबविण्याकरिता आठवडाभर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतु नंतर पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला आहे
रेती माफियांवर कारवाई शून्य
ठळक मुद्देसीतेपार, खैरलांजी, डोंगरला येथे डम्पिंग : गावकरी म्हणतात, जाणार कुठून?