शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

युवा दिनी तरूण करणार सदभावना जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:29 IST

भंडारा : आदर्श राष्ट्रवादाची प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून काही युवक सद्भावना जागर करणार आहेत. यात ...

भंडारा : आदर्श राष्ट्रवादाची प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून काही युवक सद्भावना जागर करणार आहेत. यात जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन प्रमुख तीन समस्यांचे निवेदनही ते देणार आहेत. यासंदर्भात शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्था खराशीने पुढाकार घेतला आहे. संस्थापक डमदेव कहालकर यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविला जाणार आहे.

भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दिघोरी (मोठी) ते भंडारा हे ५०किलोमीटर अंतर दिनांक १२ जानेवारी रोजी पायी चालून तरुण सद्भावना जागर करणार आहेत. यात सद्भावना ज्योत घेऊन ते भंडारा येथील त्रिमूर्ती चौकापर्यंत प्रवास करणार आहेत. आदर्श राष्ट्र निर्माणाचा संदेश देत युवक भंडारा येथे पोहोचल्यानंतर ते विविध नागरिकांनाही याबाबतीत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही त्यांचे स्वागत करतील. यासंदर्भात शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेचे संस्थापक डमदेव कहालकर यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली. तसेच आतापर्यंत संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व्यसनमुक्ती, स्वच्छता, योग व प्राणायाम व मानव कल्याण या बाबतचा वृत्तांतही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला. जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबतीत त्यांचे म्हणणे ऐकून घेत केलेल्या उपक्रमाला दाद दिली. भंडाऱ्यात तरुण दाखल झाल्यावर सदर तरुण जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करणार आहेत. यात प्रत्येक खेडेगावात नागपूर शहराच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान किंवा बगिचा निर्माण करावा, शहरांप्रमाणे झोनवाईज किंवा गावांप्रमाणे त्याच गावात आधुनिक व्यायामाची साधने किंवा व्यायामशाळा निर्माण करावीत, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडतील अशी पुस्तके उपलब्ध असणारे ग्रंथालय निर्माण करावे, अशा आदर्श मागण्यांचा समावेश यामध्ये राहणार आहे. स्वामी विवेकानंद यांची जयंती व राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या जयंतीनिमित्त सदर कार्यक्रम पार पडणार आहे, हे येथे उल्लेखनीय.

बॉक्स

जिल्हाधिकाऱ्यांची अशीही सहृदयता

संस्थेचे संस्थापक डमदेव कहालकर या संदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांची भेट घेतली तसेच विविध उपक्रम राबवण्यात संदर्भात विश्रामगृह येथे राहण्याची परवानगी त्यांनी संबंधित विभागाकडे मागितली होती. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण सांगून संबंधित विभागाने त्यांना विश्रामगृहात राहण्यास मनाई केली. यासंदर्भात कहालकर यांनी जिल्हाधिकारी यांना ही बाब सांगितली. यावर जिल्हाधिकारी कदम यांनी तात्काळ कहालकर यांची राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या सहृदयतेबद्दल आदर्श शिक्षक कहालकर यांनी त्यांचे आभार मानले.