शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार सेवा केंद्र ठरली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:15 IST

पवनी तालुक्यातील अनेक गावातील नागरीक तहसील कार्यालयात महाआॅनलाईनद्वारे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी येत असतात. मात्र येथे गत पंधरा दिवसांपासून इंटरनेट सेवेत बिघाड तर, कधी मुंबईहून महाआॅनलाईन सेवेत बिघाड येत असल्याने उशिरा दाखले मिळणे सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना कधी कधी आल्या मार्गाने परतावे लागत आहे.

ठळक मुद्देप्रमाणपत्रांसाठी पायपीट : चार दिवसांपासून पवनी केंद्रात बिघाड, इंटरनेट प्रणालीचा अनेकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी/कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील अनेक गावातील नागरीक तहसील कार्यालयात महाआॅनलाईनद्वारे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी येत असतात. मात्र येथे गत पंधरा दिवसांपासून इंटरनेट सेवेत बिघाड तर, कधी मुंबईहून महाआॅनलाईन सेवेत बिघाड येत असल्याने उशिरा दाखले मिळणे सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना कधी कधी आल्या मार्गाने परतावे लागत आहे.सध्याच्या सरकारने सर्व कामे डिजीटल सेवेच्या इंटरनेटद्वारे करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना सर्व कामे संगणकाच्याद्वारे करावे लागते. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना तसेच घरकुल योजना, कर्जमुक्ती यासह सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करावे लागते. हीच डोकेदुखी नागरिकांना ठरली आहे. पवनी तालुक्यात महाआॅनलाईन सेवा बीएसएनएल या सरकारी कंपनीची सेवा घेऊन केले जाते. या सेवेत नेहमी बिघाड राहत असल्याने नागरिकांचे कामे वेळेवर होत नाही.दिवाळीनंतर सोमवारपासून तहसील पवनी येथील कार्यालयात महाआॅनलाईन सेवेत बिघाड आल्याने सामान्य लोकांना त्यांच्या पाल्याकरिता प्रमाणपत्र मिळणे त्रासदायक झाले आहे. महिला, पुरुष तालुक्यातून २५ ते ३० किमी अंतरावरुन उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेअर, जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी येतात. येथे दिवसभर प्रतिक्षा करुन खाली हाताने त्यांना परतावे लागत आहे. त्यामुळे आॅनलाईन सेवा ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.तहसील कार्यालय पवनी येथे नागरिकांच्या सेवेसाठी नायब तहसीलदार देशभ्रतार, चौधरी, तहसीलदार गजानन कोकडे तत्परतेने कामे करतात. प्रमाणपत्र लोकांना वेळेवर मिळावे म्हणून 'थम्बस' वेळेवर मारतात. परंतु कधी इंटरनेट सेवेत बिघाड, तर कधी मुंबई येथून महाआॅनलाईन सेवेत बिघाड दाखवत असल्याने प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही.सामान्य नागरिक प्रमाणपत्र काढण्यासाठी येथे येत असतात. पण सेवेत बिघाड दाखवित असल्याने दाखल्यासाठी वाट पाहत बसावे लागत आहे.बीएसनएल कंपनीने आपल्या सेवेत दुरुस्ती करावी. बीएसएनएलची इंटरनेटसेवा स्लोस्पीडमध्ये असल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये सरकारी कंपनीने दुरुस्ती करावी आणि सामान्य नागरिकांना होत असलेला त्रास कमी करावा, अशी मागणी प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी केली आहे.नागरिकांचे प्रमाणपत्र वेळेवर मिळावे, यासाठी दररोज प्रमाणपत्र 'पास' केले जाते. इंटरनेट सेवा व महाआॅनलाईन सेवेत बिघाड असल्याने लोकांना त्रास होत आहे. यामध्ये लक्ष दिले जाईल.- गजानन कोक्कडे,तहसीलदार, पवनी