शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार सेवा केंद्र ठरली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:15 IST

पवनी तालुक्यातील अनेक गावातील नागरीक तहसील कार्यालयात महाआॅनलाईनद्वारे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी येत असतात. मात्र येथे गत पंधरा दिवसांपासून इंटरनेट सेवेत बिघाड तर, कधी मुंबईहून महाआॅनलाईन सेवेत बिघाड येत असल्याने उशिरा दाखले मिळणे सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना कधी कधी आल्या मार्गाने परतावे लागत आहे.

ठळक मुद्देप्रमाणपत्रांसाठी पायपीट : चार दिवसांपासून पवनी केंद्रात बिघाड, इंटरनेट प्रणालीचा अनेकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी/कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील अनेक गावातील नागरीक तहसील कार्यालयात महाआॅनलाईनद्वारे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी येत असतात. मात्र येथे गत पंधरा दिवसांपासून इंटरनेट सेवेत बिघाड तर, कधी मुंबईहून महाआॅनलाईन सेवेत बिघाड येत असल्याने उशिरा दाखले मिळणे सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना कधी कधी आल्या मार्गाने परतावे लागत आहे.सध्याच्या सरकारने सर्व कामे डिजीटल सेवेच्या इंटरनेटद्वारे करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना सर्व कामे संगणकाच्याद्वारे करावे लागते. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना तसेच घरकुल योजना, कर्जमुक्ती यासह सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करावे लागते. हीच डोकेदुखी नागरिकांना ठरली आहे. पवनी तालुक्यात महाआॅनलाईन सेवा बीएसएनएल या सरकारी कंपनीची सेवा घेऊन केले जाते. या सेवेत नेहमी बिघाड राहत असल्याने नागरिकांचे कामे वेळेवर होत नाही.दिवाळीनंतर सोमवारपासून तहसील पवनी येथील कार्यालयात महाआॅनलाईन सेवेत बिघाड आल्याने सामान्य लोकांना त्यांच्या पाल्याकरिता प्रमाणपत्र मिळणे त्रासदायक झाले आहे. महिला, पुरुष तालुक्यातून २५ ते ३० किमी अंतरावरुन उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेअर, जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी येतात. येथे दिवसभर प्रतिक्षा करुन खाली हाताने त्यांना परतावे लागत आहे. त्यामुळे आॅनलाईन सेवा ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.तहसील कार्यालय पवनी येथे नागरिकांच्या सेवेसाठी नायब तहसीलदार देशभ्रतार, चौधरी, तहसीलदार गजानन कोकडे तत्परतेने कामे करतात. प्रमाणपत्र लोकांना वेळेवर मिळावे म्हणून 'थम्बस' वेळेवर मारतात. परंतु कधी इंटरनेट सेवेत बिघाड, तर कधी मुंबई येथून महाआॅनलाईन सेवेत बिघाड दाखवत असल्याने प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही.सामान्य नागरिक प्रमाणपत्र काढण्यासाठी येथे येत असतात. पण सेवेत बिघाड दाखवित असल्याने दाखल्यासाठी वाट पाहत बसावे लागत आहे.बीएसनएल कंपनीने आपल्या सेवेत दुरुस्ती करावी. बीएसएनएलची इंटरनेटसेवा स्लोस्पीडमध्ये असल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये सरकारी कंपनीने दुरुस्ती करावी आणि सामान्य नागरिकांना होत असलेला त्रास कमी करावा, अशी मागणी प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी केली आहे.नागरिकांचे प्रमाणपत्र वेळेवर मिळावे, यासाठी दररोज प्रमाणपत्र 'पास' केले जाते. इंटरनेट सेवा व महाआॅनलाईन सेवेत बिघाड असल्याने लोकांना त्रास होत आहे. यामध्ये लक्ष दिले जाईल.- गजानन कोक्कडे,तहसीलदार, पवनी