शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

यंदाचा पावसाळा शुभ संकेत घेऊन येण्याचे चिन्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : शेतकरी आजही निसर्गाच्या संकेताचा अभ्यास परंपरागत पद्धतीने करताना पावसाचा अंदाज बांधतात. आधुनिक तंत्रज्ञानातही त्यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पालांदूर : शेतकरी आजही निसर्गाच्या संकेताचा अभ्यास परंपरागत पद्धतीने करताना पावसाचा अंदाज बांधतात. आधुनिक तंत्रज्ञानातही त्यांचे अंदाज तंतोतंत नाही पण जवळपास खरे ठरतात, हा आजवरचा अनुभव आहे. चैत्र नवरात्रीत नऊ दिवसात वातावरणात झालेल्या बदलांवरून पावसाचा अंदाज बांधला जातो. त्यावरून यंदा पावसाळा चांगला राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाळ्याच्या आरंभी व शेवटी पावसाचा जोर अधिक असण्याचे शुभ संकेत आहेत. कोरोना महामारीच्या काळात ही एक दिलासादायक बाब होय.

गतवर्षी पाऊस समाधानकारक बरसला. १०९ टक्के पावसाची जिल्ह्यात नोंद झाली. पावसावर शेतीचे सर्व गणित अवलंबून असते. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजासोबतच परंपरागत पद्धतीने काढण्यात येणाऱ्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. शेतकरी चैत्र नवरात्रीच्या पर्वात नऊ दिवसांचा अभ्यास करून पावसाचा अंदाज बांधतात. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात होणारा वातावरणातील बदल नोंदवून अंदाज बांधला जातो. काही शेतकरी पक्ष्यांच्या हालचालींवरूनही पावसाचा अंदाज बांधताना दिसतात. त्यात कावळा वाळलेली काडी कसा उचलतो. त्याने तोंडात पकडलेली काडी कोणत्या दिशेने अधिक व कोणत्या दिशेने कमी याचाही अभ्यास करून अंदाज घेतला जातो. पक्षी घरटे कुठे बांधतात, किती उंचीवर बांधतात, याचाही अभ्यास करून पावसाचा काळ ठरवला जातो.

गत वर्षभरापासून भारतीय हवामान खात्याचे अंदाज पावसाच्या दृष्टीने निश्चितच तंतोतंत खरे ठरताना दिसत आहेत. वर्षभरात भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेले अंदाजपत्रक शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलेले आहे. याला शास्त्रीय आधार असला, तरी भारतीय शेतकऱ्यांचे पारंपरिक असलेले अनुभवसुद्धा काहीअंशी प्रेरणादायी किंवा मार्गदर्शक ठरत आहेत. हिंदी महासागरातील हवामानाच्या बदलावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग निश्चित होतो. तापमान अधिक वाढले की, पावसाची सुरुवात लवकर होण्यास मदत होते.

हिंदू संस्कृतीत नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व प्राचीन काळापासूनच आहे. धार्मिक ग्रंथातून मिळालेला अभ्यास वास्तव परिस्थितीत तपासून नऊ दिवसांतील ऊन-पावसाचा खेळ पावसासाठी महत्त्वाचा ठरतो. नवरात्रीत सुरुवातीला पावसाने हजेरी लावली व शेवटीसुद्धा हजेरी लावली. शेवटी हा अंदाज असला तरी काहीअंशी प्रेरक ठरतो.

- रमेश पराते

परंपरागत हवामान अभ्यासक, पालांदूर.