शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

दहावीचा निकाल ९९.३४ टक्के, पण आनंद हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST

भंडारा जिल्ह्यातून नऊ हजार ६८ मुले आणि आठ हजार ११ मुली परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी आठ हजार ९९५ ...

भंडारा जिल्ह्यातून नऊ हजार ६८ मुले आणि आठ हजार ११ मुली परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी आठ हजार ९९५ मुले आणि सात हजार ९७२ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.१९, तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.५१ टक्के आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र दिसून आले.

कोरोना संसर्गामुळे परीक्षेविना विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचा आनंद असला तरी निकालाच्या दिवशी गुरुवारी, मात्र शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ क्रॅश झाल्याचे दिसून आले. दुपारी १ वाजतापासून विद्यार्थी आणि पालक संकेतस्थळावर आपला रिझल्ट पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र प्रयत्न करूनही संकेतस्थळ उघडले जात नव्हते. सायंकाळपर्यंतही तीच स्थिती होती. आपण पास तर झालो, परंतु किती गुण मिळाले हे कळू शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकालाचा आनंद हिरावून घेतला. शाळानिहाय निकालही कळू शकला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक गुण घेणारा विद्यार्थी कोण याची माहिती मिळू शकली नाही. विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह अनेकांना संकेतस्थळ का उघडले जात नाही याची माहिती घेत होते. परंतु कुणाकडेही त्याचे योग्य उत्तर नव्हते.

बॉक्स

पाच हजार ९६ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत

उत्तीर्ण झालेल्या १६ हजार ९६७ विद्यार्थ्यांपैकी पाच हजार ९६ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, तर प्रथम श्रेणीत आठ हजार ४४४, तर द्वितीय श्रेणीत दोन हजार ८९८ आणि पास श्रेणीत ५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. प्रथम आणि प्रावीण्यश्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा मोठी आहे. उत्तीर्ण झालेल्या ५०० पुनर्परीक्षार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला नाही. प्रथम श्रेणीत सहा, द्वितीय श्रेणीत १५ आणि सर्वाधिक ४७९ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

बॉक्स

ना कौतुक, ना अभिनंदन

शैक्षणिक जीवनातील दहावीची परीक्षा महत्त्वाची माणली जाते. विद्यार्थ्यांसाठी ही पहिलीच बोर्डाची परीक्षा असते. वर्षभर अभ्यास केल्यानंतर निकालाच्या दिवशी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले जाते. नातेवाइकांसह शाळा आणि सामाजिक संस्था विद्यार्थ्यांच्या कौतुकाचे सोहळे घेतात. परंतु शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालानंतर ना कुठे कौतुक दिसले, ना अभिनंदनाचा वर्षाव. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाच आपल्याला किती गुण मिळाले हे आपल्याला उशिरापर्यंत कळतेच नव्हते.