शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा निकाल ९९.३४ टक्के, पण आनंद हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST

भंडारा जिल्ह्यातून नऊ हजार ६८ मुले आणि आठ हजार ११ मुली परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी आठ हजार ९९५ ...

भंडारा जिल्ह्यातून नऊ हजार ६८ मुले आणि आठ हजार ११ मुली परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी आठ हजार ९९५ मुले आणि सात हजार ९७२ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.१९, तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.५१ टक्के आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र दिसून आले.

कोरोना संसर्गामुळे परीक्षेविना विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचा आनंद असला तरी निकालाच्या दिवशी गुरुवारी, मात्र शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ क्रॅश झाल्याचे दिसून आले. दुपारी १ वाजतापासून विद्यार्थी आणि पालक संकेतस्थळावर आपला रिझल्ट पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र प्रयत्न करूनही संकेतस्थळ उघडले जात नव्हते. सायंकाळपर्यंतही तीच स्थिती होती. आपण पास तर झालो, परंतु किती गुण मिळाले हे कळू शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकालाचा आनंद हिरावून घेतला. शाळानिहाय निकालही कळू शकला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक गुण घेणारा विद्यार्थी कोण याची माहिती मिळू शकली नाही. विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह अनेकांना संकेतस्थळ का उघडले जात नाही याची माहिती घेत होते. परंतु कुणाकडेही त्याचे योग्य उत्तर नव्हते.

बॉक्स

पाच हजार ९६ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत

उत्तीर्ण झालेल्या १६ हजार ९६७ विद्यार्थ्यांपैकी पाच हजार ९६ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, तर प्रथम श्रेणीत आठ हजार ४४४, तर द्वितीय श्रेणीत दोन हजार ८९८ आणि पास श्रेणीत ५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. प्रथम आणि प्रावीण्यश्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा मोठी आहे. उत्तीर्ण झालेल्या ५०० पुनर्परीक्षार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला नाही. प्रथम श्रेणीत सहा, द्वितीय श्रेणीत १५ आणि सर्वाधिक ४७९ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

बॉक्स

ना कौतुक, ना अभिनंदन

शैक्षणिक जीवनातील दहावीची परीक्षा महत्त्वाची माणली जाते. विद्यार्थ्यांसाठी ही पहिलीच बोर्डाची परीक्षा असते. वर्षभर अभ्यास केल्यानंतर निकालाच्या दिवशी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले जाते. नातेवाइकांसह शाळा आणि सामाजिक संस्था विद्यार्थ्यांच्या कौतुकाचे सोहळे घेतात. परंतु शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालानंतर ना कुठे कौतुक दिसले, ना अभिनंदनाचा वर्षाव. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाच आपल्याला किती गुण मिळाले हे आपल्याला उशिरापर्यंत कळतेच नव्हते.