शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

आॅनलाईन बदल्यांमध्ये चुकीच्या पद्धतीचे शिक्षकांचे विस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:25 IST

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात व नुकत्याच झालेल्या आॅनलाईन बदल्यामधील चुकीच्या पद्धतीचे विस्थापित शिक्षकांवर झालेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (प्राथ) पाच्छापुरे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात व नुकत्याच झालेल्या आॅनलाईन बदल्यामधील चुकीच्या पद्धतीचे विस्थापित शिक्षकांवर झालेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (प्राथ) पाच्छापुरे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मागण्यांची पुर्तता १५ दिवसात न झाल्यास संघटनेद्वारे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.आॅनलाईन बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक व संवर्ग दोनमधील शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे व चुकीचे अंतराचा पुरावा देऊन बदली पोर्टलवर माहिती भरली. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना विस्थापित व्हावे लागले. चुकीची माहिती भरणाºयांची सक्षम संघटनेद्वारे चौकशी करून त्यांच्याविरूद्ध जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. अन्यायकारक पद्धतीने विस्थापित झालेल्या शिक्षकांना न्याय मिळविण्यासाठी जिल्ह्यातील रिक्त असलेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापक, विषय शिक्षकांचे निश्चित करून रिक्त जागा त्वरीत भरणे, ११७ आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या २०१६ मधील माहे मे २०१६ व जून २०१६ या दोन महिन्याचे थकित वेतन त्वरीत अदा करणे, वर्ग ६ ते ८ ला शिकविणाऱ्या विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लावणे, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रकरणास मुल्यमापन समितीद्वारा मंजुरी देणे, मोहाडी पंचायत समितीमधील कार्यरत कर्मचाऱ्यांचे जीपीएफ पावत्या उपलब्ध करून देणे, शालेय पोषण आहाराचे थकित अनुदान अविलंब मुख्याध्यापकाच्या खात्यावर जमा करणे, मंजूर वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढण्यासाठी तालुका स्तरावरून माहिती मागवून आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करून प्रकाशित करणे, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासाठी १५ दिवसाचा अवधी देण्यात आला असून त्यानंतर जिल्हा संघटना निर्णय घेण्यासाठी मोकळी राहील, असे सांगण्यात आले.यावेळी संजीव बावनकर, रमेश काटेखाये, शंकर नखाते, राधेश्याम आमकर, दिलीप बावनकर, विकास गायधने, बाबुराव गिऱ्हेपूंजे, उमेश गायधने, विवेक हजारे, नरेंद्र कोहाड, सुभाष खंडाईत, वनवास धनिस्कर, योगेश कुटे, चेतन बोरकर, राजकुमार चांदेवार, सुधीर वाघमारे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.