शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

चुकीची रक्त तपासणी रुग्णांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:57 IST

ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे महालेब्स अंतर्गत रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते, मात्र जो अहवाल देण्यात येतो तो पूर्णत: चुकीची मिळत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो.

ठळक मुद्देमोहाडी रुग्णालयातील प्रकार : रुग्णांना मनस्ताप

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे महालेब्स अंतर्गत रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते, मात्र जो अहवाल देण्यात येतो तो पूर्णत: चुकीची मिळत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. या चुकीच्या अहवालाने तर अनेकदा चांगल्या रुग्णांनाही भंडारा येथील सामान्य रुग्णालयात रेफर केल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्याने येथील जनतेत असंतोष आहे. चुकीच्या अहवालामुळे एखाद्या वेळी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नि:शुल्क प्रयोग शाळा व चाचण्या निदान योजना ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे सुरू आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची रक्त तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने पॅथालॅजिस्ट डॉ.हितेंद्र खांडेकर यांच्याकडे पाठविले जातात, मात्र त्यांच्याकडून आलेली रक्त तपासनीचा अहवाल पूर्णत: चुकीचा असतो. एखाद्या रुग्णांचा हिमोग्लोबिन बरोबर असतानाही कमी दाखविला जातो. 'प्लेटलेट' कधी जास्त, तर कधी कमी दाखविली जाते, यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर गोंधळतात, परंतु याचा सर्वाधिक मनस्ताप रुग्ण व त्यांच्या कुटुंबावर होतो. काही रुग्णांना येथे रक्ताच्या प्लेटलेट चुकीच्या दर्शविण्यात आल्याने त्यांना नागपूर येथे दाखल करण्याची वेळ आल्याची घटना घडल्या आहेत.मात्र याकडे जिल्हा चिकित्सकांचे लक्ष नाही. दोन दिवसांपूर्वी मोहाडी येथील रवींद्र शामराव पाटील यांच्या दोन वर्षाच्या मुलीला ताप येत असल्याने त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केली. रक्त तपासण्याचा जो अहवाल आला त्याने त्यांचे धाबेच दणाणले. त्यात हिमोग्लोबिन ७.६ ग्रॅम आणि प्लेटलेट केवळ ०. ५४ लक्ष दर्शविण्यात आले होते. याशिवाय रक्ताच्या इतर चाचण्या चुकीच्या होत्या. त्यांनी आपल्या दोन वर्षाच्या मुलीला भंडारा येथे नेले व पुन्हा डॉ. हितेंद्र खांडेकर यांच्या खाजगी लॅब मध्ये रक्त तपासणी केली असता हिमोग्लोबिन १०.५ ग्रॅम आणि प्लेटलेट ३ लक्ष ९ हजार असल्याचा अहवाल प्राप्त झाला. एकाच डॉक्टरकडून दोन वेगवेगळा अहवाल कसा देण्यात आला, हे विचार करण्याजोगे आहे, मात्र रवींद्र पाटील यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे.अव्यवस्थेकडे सर्वांचेच दुर्लक्षग्रामीण रुग्णालयात शिक्षित व उच्च शिक्षित अधिकारी-कर्मचारी तसेच धनदांडगे व्यक्ती सहसा उपचारासाठी जात नाही. शेतकरी, शेतमजूर, गरीब व मध्यमवर्गीय रुग्ण उपचारासाठी तेथे अधिक जातात. त्यामुळेच ग्रामीण रुग्णालयातील अशा अव्यवस्थेकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देतात, ना जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी लक्ष देतात. त्यामुळेच येथील अव्यवस्था व कामचुकारपणावर कुणाचेही अंकुश नाही. गरिबांच्या जीवाशी खुलेआम खेळ सुरू आहे. हा प्रकार केव्हापर्यंत सुरू राहणार, हे एक कोडे आहे. अशाच कारणामुळे मग एखादेवेळी रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक कायदा हातात घेतल्याचे अनेक उदाहरणे समोर आले आहेत.