शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

चुकीची रक्त तपासणी रुग्णांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:57 IST

ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे महालेब्स अंतर्गत रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते, मात्र जो अहवाल देण्यात येतो तो पूर्णत: चुकीची मिळत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो.

ठळक मुद्देमोहाडी रुग्णालयातील प्रकार : रुग्णांना मनस्ताप

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे महालेब्स अंतर्गत रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते, मात्र जो अहवाल देण्यात येतो तो पूर्णत: चुकीची मिळत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. या चुकीच्या अहवालाने तर अनेकदा चांगल्या रुग्णांनाही भंडारा येथील सामान्य रुग्णालयात रेफर केल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्याने येथील जनतेत असंतोष आहे. चुकीच्या अहवालामुळे एखाद्या वेळी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नि:शुल्क प्रयोग शाळा व चाचण्या निदान योजना ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे सुरू आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची रक्त तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने पॅथालॅजिस्ट डॉ.हितेंद्र खांडेकर यांच्याकडे पाठविले जातात, मात्र त्यांच्याकडून आलेली रक्त तपासनीचा अहवाल पूर्णत: चुकीचा असतो. एखाद्या रुग्णांचा हिमोग्लोबिन बरोबर असतानाही कमी दाखविला जातो. 'प्लेटलेट' कधी जास्त, तर कधी कमी दाखविली जाते, यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर गोंधळतात, परंतु याचा सर्वाधिक मनस्ताप रुग्ण व त्यांच्या कुटुंबावर होतो. काही रुग्णांना येथे रक्ताच्या प्लेटलेट चुकीच्या दर्शविण्यात आल्याने त्यांना नागपूर येथे दाखल करण्याची वेळ आल्याची घटना घडल्या आहेत.मात्र याकडे जिल्हा चिकित्सकांचे लक्ष नाही. दोन दिवसांपूर्वी मोहाडी येथील रवींद्र शामराव पाटील यांच्या दोन वर्षाच्या मुलीला ताप येत असल्याने त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केली. रक्त तपासण्याचा जो अहवाल आला त्याने त्यांचे धाबेच दणाणले. त्यात हिमोग्लोबिन ७.६ ग्रॅम आणि प्लेटलेट केवळ ०. ५४ लक्ष दर्शविण्यात आले होते. याशिवाय रक्ताच्या इतर चाचण्या चुकीच्या होत्या. त्यांनी आपल्या दोन वर्षाच्या मुलीला भंडारा येथे नेले व पुन्हा डॉ. हितेंद्र खांडेकर यांच्या खाजगी लॅब मध्ये रक्त तपासणी केली असता हिमोग्लोबिन १०.५ ग्रॅम आणि प्लेटलेट ३ लक्ष ९ हजार असल्याचा अहवाल प्राप्त झाला. एकाच डॉक्टरकडून दोन वेगवेगळा अहवाल कसा देण्यात आला, हे विचार करण्याजोगे आहे, मात्र रवींद्र पाटील यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे.अव्यवस्थेकडे सर्वांचेच दुर्लक्षग्रामीण रुग्णालयात शिक्षित व उच्च शिक्षित अधिकारी-कर्मचारी तसेच धनदांडगे व्यक्ती सहसा उपचारासाठी जात नाही. शेतकरी, शेतमजूर, गरीब व मध्यमवर्गीय रुग्ण उपचारासाठी तेथे अधिक जातात. त्यामुळेच ग्रामीण रुग्णालयातील अशा अव्यवस्थेकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देतात, ना जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी लक्ष देतात. त्यामुळेच येथील अव्यवस्था व कामचुकारपणावर कुणाचेही अंकुश नाही. गरिबांच्या जीवाशी खुलेआम खेळ सुरू आहे. हा प्रकार केव्हापर्यंत सुरू राहणार, हे एक कोडे आहे. अशाच कारणामुळे मग एखादेवेळी रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक कायदा हातात घेतल्याचे अनेक उदाहरणे समोर आले आहेत.