शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

चुकीची रक्त तपासणी रुग्णांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:57 IST

ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे महालेब्स अंतर्गत रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते, मात्र जो अहवाल देण्यात येतो तो पूर्णत: चुकीची मिळत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो.

ठळक मुद्देमोहाडी रुग्णालयातील प्रकार : रुग्णांना मनस्ताप

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे महालेब्स अंतर्गत रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते, मात्र जो अहवाल देण्यात येतो तो पूर्णत: चुकीची मिळत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. या चुकीच्या अहवालाने तर अनेकदा चांगल्या रुग्णांनाही भंडारा येथील सामान्य रुग्णालयात रेफर केल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्याने येथील जनतेत असंतोष आहे. चुकीच्या अहवालामुळे एखाद्या वेळी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नि:शुल्क प्रयोग शाळा व चाचण्या निदान योजना ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे सुरू आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची रक्त तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने पॅथालॅजिस्ट डॉ.हितेंद्र खांडेकर यांच्याकडे पाठविले जातात, मात्र त्यांच्याकडून आलेली रक्त तपासनीचा अहवाल पूर्णत: चुकीचा असतो. एखाद्या रुग्णांचा हिमोग्लोबिन बरोबर असतानाही कमी दाखविला जातो. 'प्लेटलेट' कधी जास्त, तर कधी कमी दाखविली जाते, यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर गोंधळतात, परंतु याचा सर्वाधिक मनस्ताप रुग्ण व त्यांच्या कुटुंबावर होतो. काही रुग्णांना येथे रक्ताच्या प्लेटलेट चुकीच्या दर्शविण्यात आल्याने त्यांना नागपूर येथे दाखल करण्याची वेळ आल्याची घटना घडल्या आहेत.मात्र याकडे जिल्हा चिकित्सकांचे लक्ष नाही. दोन दिवसांपूर्वी मोहाडी येथील रवींद्र शामराव पाटील यांच्या दोन वर्षाच्या मुलीला ताप येत असल्याने त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केली. रक्त तपासण्याचा जो अहवाल आला त्याने त्यांचे धाबेच दणाणले. त्यात हिमोग्लोबिन ७.६ ग्रॅम आणि प्लेटलेट केवळ ०. ५४ लक्ष दर्शविण्यात आले होते. याशिवाय रक्ताच्या इतर चाचण्या चुकीच्या होत्या. त्यांनी आपल्या दोन वर्षाच्या मुलीला भंडारा येथे नेले व पुन्हा डॉ. हितेंद्र खांडेकर यांच्या खाजगी लॅब मध्ये रक्त तपासणी केली असता हिमोग्लोबिन १०.५ ग्रॅम आणि प्लेटलेट ३ लक्ष ९ हजार असल्याचा अहवाल प्राप्त झाला. एकाच डॉक्टरकडून दोन वेगवेगळा अहवाल कसा देण्यात आला, हे विचार करण्याजोगे आहे, मात्र रवींद्र पाटील यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे.अव्यवस्थेकडे सर्वांचेच दुर्लक्षग्रामीण रुग्णालयात शिक्षित व उच्च शिक्षित अधिकारी-कर्मचारी तसेच धनदांडगे व्यक्ती सहसा उपचारासाठी जात नाही. शेतकरी, शेतमजूर, गरीब व मध्यमवर्गीय रुग्ण उपचारासाठी तेथे अधिक जातात. त्यामुळेच ग्रामीण रुग्णालयातील अशा अव्यवस्थेकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देतात, ना जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी लक्ष देतात. त्यामुळेच येथील अव्यवस्था व कामचुकारपणावर कुणाचेही अंकुश नाही. गरिबांच्या जीवाशी खुलेआम खेळ सुरू आहे. हा प्रकार केव्हापर्यंत सुरू राहणार, हे एक कोडे आहे. अशाच कारणामुळे मग एखादेवेळी रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक कायदा हातात घेतल्याचे अनेक उदाहरणे समोर आले आहेत.