शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही त्यांचे डोळे पाहणार जग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:28 IST

‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’, अशी म्हण आहे, परंतु ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ हा साक्षात प्रयत्न तुमसर येथील अनिल घनश्याम लांजेवार यांच्या मृत्यूनंतर खरा ठरला आहे.

ठळक मुद्देनेत्रदानाचा संकल्प : तुमसरातील लांजेवार कुटुंबीयांचा स्तुत्य निर्णय

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’, अशी म्हण आहे, परंतु ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ हा साक्षात प्रयत्न तुमसर येथील अनिल घनश्याम लांजेवार यांच्या मृत्यूनंतर खरा ठरला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तातडीने निर्णय घेऊन नेत्रदान करण्याचा संकल्प केला. रूग्णालय प्रशासनाने दखल घेऊन अवघ्या तीन तासात डोळे सुस्थितीत काढून नेत्रपेढीत रवाना केले. त्यामुळे मृत्युनंतरही त्यांचे डोळे पुन्हा जग पाहणार आहेत.तुमसर येथील माकडे नगरातील प्रगतशील शेतकरी अनिल घनश्याम लांजेवार (५८) यांना २० सप्टेंबरला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तुमसर येथील नेताजी सुभाषचंद्र उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना भंडारा येथे हलविण्यात आले.अनिल यांचे धाकटे भाऊ सुनिल लांजेवार यांनी त्यांना डॉ.कोचर यांचेकडे नेण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. नागपूरला नेताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा दुसरा धक्का बसला. भंडारा येथे एका खाजगी रूग्णालयात नेल्यावर डॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर तुमसर येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले.धाकटे भाऊ मुंबईत होते. त्यांनी पत्नी शोभा लांजेवार (माजी नगरसेविका) यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून भाऊचे नेत्रदान करावयाचे आहे. वहिनी गीता लांजेवार, मुलगी अनघा चोपकर यांना याबाबत सांगून नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्याचे सांगितले. शोभा लांजेवार यांनी नेत्रदानाची माहिती देताच गीता लांजेवार व त्यांची मुलगी अनघा यांनी लगेच तयारी दर्शविली.सुनील लांजेवार यांनी डॉ.सचिन बाळबुद्धे यांच्याशी संपर्क साधून नेत्रदानाबाबत त्यांना सांगितले. डॉ.बाळबुद्धे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रविशेखर धकाते यांना तुमसरातील नेत्रदानाची माहिती दिली. डॉ. धकाते यांनी भंडारा येथून नेत्रतज्ज्ञ डॉ.आगाशे व पथकाला तुमसर येथे रवाना केले. मृत्यूनंतर अवघ्या तीन तासात अनिल लांजेवार यांचे डोळे सुखरूप काढण्यात आले. वैद्यकीय नियमानुसार मृत्यूपश्चात सहा तासात डोळे काढावे लागतात. डोळे काढल्यानंतर ते भंडारा येथे नेण्यात आले. यात डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.अंत्यसंस्कारानंतर मानवाचे सर्वच अवयव नष्ट होतात. मानवी अवयव गरजूंना मिळणे गरजेचे आहे. एका मानवाचे अवयव दुसºयाच्या कामी आले पाहिजे. ही उदात्त भावना जागृत होण्याची गरज आहे. स्नेह नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून नेत्रदान, किडनीदान, देहदान, यकृतदान हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.- सुनील लांजेवार, अध्यक्ष स्नेह नागरी पतसंस्था तुमसर.