शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

मृत्यूनंतरही त्यांचे डोळे पाहणार जग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:28 IST

‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’, अशी म्हण आहे, परंतु ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ हा साक्षात प्रयत्न तुमसर येथील अनिल घनश्याम लांजेवार यांच्या मृत्यूनंतर खरा ठरला आहे.

ठळक मुद्देनेत्रदानाचा संकल्प : तुमसरातील लांजेवार कुटुंबीयांचा स्तुत्य निर्णय

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’, अशी म्हण आहे, परंतु ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ हा साक्षात प्रयत्न तुमसर येथील अनिल घनश्याम लांजेवार यांच्या मृत्यूनंतर खरा ठरला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तातडीने निर्णय घेऊन नेत्रदान करण्याचा संकल्प केला. रूग्णालय प्रशासनाने दखल घेऊन अवघ्या तीन तासात डोळे सुस्थितीत काढून नेत्रपेढीत रवाना केले. त्यामुळे मृत्युनंतरही त्यांचे डोळे पुन्हा जग पाहणार आहेत.तुमसर येथील माकडे नगरातील प्रगतशील शेतकरी अनिल घनश्याम लांजेवार (५८) यांना २० सप्टेंबरला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तुमसर येथील नेताजी सुभाषचंद्र उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना भंडारा येथे हलविण्यात आले.अनिल यांचे धाकटे भाऊ सुनिल लांजेवार यांनी त्यांना डॉ.कोचर यांचेकडे नेण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. नागपूरला नेताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा दुसरा धक्का बसला. भंडारा येथे एका खाजगी रूग्णालयात नेल्यावर डॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर तुमसर येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले.धाकटे भाऊ मुंबईत होते. त्यांनी पत्नी शोभा लांजेवार (माजी नगरसेविका) यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून भाऊचे नेत्रदान करावयाचे आहे. वहिनी गीता लांजेवार, मुलगी अनघा चोपकर यांना याबाबत सांगून नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्याचे सांगितले. शोभा लांजेवार यांनी नेत्रदानाची माहिती देताच गीता लांजेवार व त्यांची मुलगी अनघा यांनी लगेच तयारी दर्शविली.सुनील लांजेवार यांनी डॉ.सचिन बाळबुद्धे यांच्याशी संपर्क साधून नेत्रदानाबाबत त्यांना सांगितले. डॉ.बाळबुद्धे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रविशेखर धकाते यांना तुमसरातील नेत्रदानाची माहिती दिली. डॉ. धकाते यांनी भंडारा येथून नेत्रतज्ज्ञ डॉ.आगाशे व पथकाला तुमसर येथे रवाना केले. मृत्यूनंतर अवघ्या तीन तासात अनिल लांजेवार यांचे डोळे सुखरूप काढण्यात आले. वैद्यकीय नियमानुसार मृत्यूपश्चात सहा तासात डोळे काढावे लागतात. डोळे काढल्यानंतर ते भंडारा येथे नेण्यात आले. यात डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.अंत्यसंस्कारानंतर मानवाचे सर्वच अवयव नष्ट होतात. मानवी अवयव गरजूंना मिळणे गरजेचे आहे. एका मानवाचे अवयव दुसºयाच्या कामी आले पाहिजे. ही उदात्त भावना जागृत होण्याची गरज आहे. स्नेह नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून नेत्रदान, किडनीदान, देहदान, यकृतदान हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.- सुनील लांजेवार, अध्यक्ष स्नेह नागरी पतसंस्था तुमसर.