शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

बंद बिडी कारखान्यामुळे कामगार संकटात

By admin | Updated: May 1, 2016 00:19 IST

जिल्ह्यातील अनेक बिडी कारखाने महिनाभरापासून बंद असल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २२ हजार कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे.

भंडारा : जिल्ह्यातील अनेक बिडी कारखाने महिनाभरापासून बंद असल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २२ हजार कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे. बेरोजगारामुळे अनेकांनी रोजगारासाठी शहराकडे धाव घेतली आहे. राज्यातील बिडी उद्योग आणि सरकार यांच्यात बंडलावरील छाप किती आकाराचा असावा, यावरून संघर्ष चालू आहे, त्यातून महिनाभरापासून बिडी कारखाने बंद पडले आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील २२ हजार बिडी कामगार आणि संबंधित रोजंदारांवर झाला आहे. बिडी कामगारांची तर रोजीरोटीची पंचाईत झाली आहे. केंद्र सरकारने बिडी बंडलावर ८५ टक्के सचित्र वैज्ञानिक इशारा घालण्याचे बंधन १ एप्रिल २०१६ पासून लागू केले आहे. या जाचक अटी मान्य नसल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक बिडी कारखाने बंद आहेत. अशिक्षित आणि बेरोजगार महिला हा व्यवसाय गृहउद्योग म्हणून करतात, त्यांना रोजंदारीवर काम करावे लागते. एक महिला साधारण एक हजार बिड्या रोज बनवते. हा रोजगारच बंद झाल्याने त्याचे दैनंदिन उत्पन्न बुडाले आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी व तुमसर तालुक्यात अधिक प्रमाणात बिडी कामगार आहेत. त्याचा उदरनिर्वाह हा बिडी व्यवसायावर अवलंबून आहेत. बिडी उद्योग बंद झाल्यास बेरोजगारी वाढेल. बिडी कामगार व उद्योग वाचला पाहिजे म्हणून लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)मुलभूत हक्कापासून अनेक कामगार वंचितजिल्ह्यातील विविध लहान मोठ्या उद्योगात जवळपास ११ हजारांच्या घरात कामगार कामे करतात. परंतु शासनाच्या व व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे किमान वेतन, बोनस, घरभाडे भत्ता, अतिरिक्त कामाचा मोबदला, राष्ट्रीय सणाच्या सुट्टया, सुरक्षा व आरोग्यसंबधी मुलभूत हक्कापासून कामगारांना वंचीत ठेवल्या जात आहे. जिल्ह्यातील अनेक कारखान्यात कामगार धोकादायक कामे करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. यामुळे अनेकदा कामगारांचा बळी गेलेला आहे. तरीही आजही बहुतांश कामगार तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहे. याविषयी व्यवस्थापनाला विचारणा केली तर व्यवस्थापन त्या कामगाराला कामावरुन काढण्याची धमकी देतात. जिल्ह्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, उपसंचालक औद्योगिक आरोग्य व सुरक्षा विभागाचे कार्यालय भंडारा येथे आहेत. मात्र बोटावर मोजण्या इतक्याच कामगारांच्या समस्या सोडविण्यात त्यांना यश आले आहे. अनेक समस्या जैसे थे आहेत.कामगारांच्या आरोग्य व सुरक्षासाठी इएसआय राज्य विमा योजना लागू करण्यासाठी संघटना प्रयत्नरत आहे. जिल्ह्यातील औद्यागिक कारखान्यातील कामगरांवर अन्याय होत असल्यास संघटनेकडे तक्रार करावी. कामगरांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्न करण्यात येईल. यापूर्वी अनेक कामगारांना न्याय दिलेला आहे.- श्रीकांत पंचबुध्देअध्यक्ष, भंडारा जिल्हा इंजि. कामगार संघ