शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हिस रोडपूर्वी सुरू झाले उड्डाणपुलाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:31 IST

सर्व्हीस रोडचे काम पूर्ण न करता उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ करण्याचा अफलातून प्रकार राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी ते सौंदड दरम्यान दिसून येत आहे. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली असून साकोलीत तर वाहतुकीची कोंडी होत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्देअपघाताची भीती : साकोली शहरात वाहतुकीची कोंडी

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सर्व्हीस रोडचे काम पूर्ण न करता उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ करण्याचा अफलातून प्रकार राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी ते सौंदड दरम्यान दिसून येत आहे. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली असून साकोलीत तर वाहतुकीची कोंडी होत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर लाखनी ते सौंदड पर्यंत उड्डाणपुल तयार करण्यात येणार आहे. वाढते अपघात व वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपुल बांधले जाणार आहे. गत दोन महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. लाखनी आणि साकोली येथे राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध मोठाले खड्डे खोदून काम सुरु झाले आहे. यासाठी मोठाली यंत्रसामुग्रीही कामाला लावली आहे. या यंत्राच्या सहाय्याने काम सुरु आहे. चार पदरी महामार्ग आता यामुळे शहरात दुपदरी होणार आहे. काम सुरु असताना सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु येथे कोणत्याही उपाययोजना दिसत नाही. पिलरसाठी खोदलेल्या खड्ड्यालगत वाहतूक सुरु आहे. विशेष म्हणजे काम सुरु करण्यापूर्वी दोन्ही बाजूची वाहतूक सर्व्हीस रोडने करणे गरजेचे आहे. मात्र तसे येथे होत नाही. कधीकधी वाहतूक सर्व्हीस रोडने केली जाते. परंतु सर्व्हीस रोडवर वाहने, भाजीपाला दुकाने आणि इतर दुकाने गर्दी करून असतात. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते. एकंदरीत उड्डाणपुलाचे काम म्हणजे साकोलीवासीयांसाठी एकप्रकारे डोकेदुखीच झाली आहे. सर्व्हीस रोडने वाहतूक सुरु न केल्यास एखाद दिवशी भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.महसूल व पोलीस प्रशासन गप्पगत दोन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरु असून एकेरी वाहतूक सुरु आहे. यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. मात्र महसूल आणि पोलीस प्रशासन गप्प दिसत आहे. एखादा मोठा अपघात होऊन कुणाला प्राण गमवावे लागले तर जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.