शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

सर्व्हिस रोडपूर्वी सुरू झाले उड्डाणपुलाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:31 IST

सर्व्हीस रोडचे काम पूर्ण न करता उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ करण्याचा अफलातून प्रकार राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी ते सौंदड दरम्यान दिसून येत आहे. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली असून साकोलीत तर वाहतुकीची कोंडी होत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्देअपघाताची भीती : साकोली शहरात वाहतुकीची कोंडी

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सर्व्हीस रोडचे काम पूर्ण न करता उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ करण्याचा अफलातून प्रकार राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी ते सौंदड दरम्यान दिसून येत आहे. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली असून साकोलीत तर वाहतुकीची कोंडी होत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर लाखनी ते सौंदड पर्यंत उड्डाणपुल तयार करण्यात येणार आहे. वाढते अपघात व वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपुल बांधले जाणार आहे. गत दोन महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. लाखनी आणि साकोली येथे राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध मोठाले खड्डे खोदून काम सुरु झाले आहे. यासाठी मोठाली यंत्रसामुग्रीही कामाला लावली आहे. या यंत्राच्या सहाय्याने काम सुरु आहे. चार पदरी महामार्ग आता यामुळे शहरात दुपदरी होणार आहे. काम सुरु असताना सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु येथे कोणत्याही उपाययोजना दिसत नाही. पिलरसाठी खोदलेल्या खड्ड्यालगत वाहतूक सुरु आहे. विशेष म्हणजे काम सुरु करण्यापूर्वी दोन्ही बाजूची वाहतूक सर्व्हीस रोडने करणे गरजेचे आहे. मात्र तसे येथे होत नाही. कधीकधी वाहतूक सर्व्हीस रोडने केली जाते. परंतु सर्व्हीस रोडवर वाहने, भाजीपाला दुकाने आणि इतर दुकाने गर्दी करून असतात. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते. एकंदरीत उड्डाणपुलाचे काम म्हणजे साकोलीवासीयांसाठी एकप्रकारे डोकेदुखीच झाली आहे. सर्व्हीस रोडने वाहतूक सुरु न केल्यास एखाद दिवशी भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.महसूल व पोलीस प्रशासन गप्पगत दोन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरु असून एकेरी वाहतूक सुरु आहे. यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. मात्र महसूल आणि पोलीस प्रशासन गप्प दिसत आहे. एखादा मोठा अपघात होऊन कुणाला प्राण गमवावे लागले तर जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.