शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

532 ग्रामपंचायतींमध्ये सात हजार मजुरांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST

काम करणाऱ्या मजुरांचा हा आकडा अडीच लाखांचा असला तरी प्रत्यक्ष काम करणारे खरे कामगार मोजकेच आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना त्या ठिकाणी पैसे तत्काळ मिळत नाही. या ठिकाणची कामे अनेकांना हार्ड वाटतात. याशिवाय रोजमजुरीवर काम करण्यासाठी अनेकांची मानसिकता राहिलेली नाही. यामुळे या योजनेत काही तर लाभ मिळेल, म्हणून मोठ्या येणाऱ्या मजुरांची संख्या आपसुकच प्रमाणात नाव नोंदणी झाली.

ठळक मुद्दे१४०९ कामे सुरू : जिल्ह्यातील जॉबकार्डधारकांची संख्या वाढली, मजुरांना दिलासा

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्ह्यात रब्बी हंगामानंतर मजुरांना कामे मिळणे कठीण झाले असताना रोहयोची कामे वाढविणे आवश्यक आहे. तथापि, जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोची कामे केली जात असून, या कामांवर सात हजार १७६ मजूर कार्यरत आहेत. तसेच सध्या जिल्ह्यातील जॉबकार्डधारकांची संख्या वाढली आहे.हाताला काम नसेल तर शंभर दिवसाचा रोजगार पक्का म्हणून हमखास रोजगाराची गॅरंटी देण्यासाठी रोजगार हमी योजना पुढे आली. काम नसेल तर बेरोजगार भत्ता असे घोषवाक्य या योजनेत जोडण्यात आले. यामुळे लाखो नागरिकांनी आपली रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात नोंद केली. ही नोंद आता दोन लाख ३५ हजारांवर पोहोचली आहे. काम करणाऱ्या मजुरांचा हा आकडा अडीच लाखांचा असला तरी प्रत्यक्ष काम करणारे खरे कामगार मोजकेच आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना त्या ठिकाणी पैसे तत्काळ मिळत नाही. या ठिकाणची कामे अनेकांना हार्ड वाटतात. याशिवाय रोजमजुरीवर काम करण्यासाठी अनेकांची मानसिकता राहिलेली नाही. यामुळे या योजनेत काही तर लाभ मिळेल, म्हणून मोठ्या येणाऱ्या मजुरांची संख्या आपसुकच प्रमाणात नाव नोंदणी झाली. प्रत्यक्षात कामावर गेल्याशिवाय मजुरी मिळणार नाही हे कळाल्यानंतर या कामावर कामावर येणाऱ्या मजुरांची संख्या आपसुकच कमी झाली आहे. मजुरांना इतर ठिकाणी कामाच्या शोधात जायचे काम पडू नये, गावात किंवा परिसरातच त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत कामे दिला जातात. जिल्ह्यात रबी हंगामाती कामे संपली असताना रोजगाराची समस्या गंभीर बनत आहे. दरदिवशी विविध ठिकाणावरून शेकडो मजूर नागपूर, पुणे, मुंबई आदी महानगरांसह परराज्यात रोजगारासाठी स्थलंतर करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.राज्यात सध्या स्थितीत वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षा घेता जिल्हा प्रशासनाने मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोहयोची कामे वाढवितानाच त्यांना या कामाबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीसह यंत्रणेंकडून रोहयोची कामे सुरू आहे. यात ८८ कामे यंत्रणांची आहे.

पवनी तालुक्यात     सर्वात कमी कामगार पवनी तालुक्यात सर्वात कमी मजूर कामावर आहे. सन २०२०-२१ ची आकडेवारी लक्षात घेतल्यानंतर पवनी तालुका मजुरांमध्ये माघारलेला दिसतो. तालुकानिहाय आकडवारीनुसार भंडारा २६२४७, लाखांदूर ३४७८७, लाखनी ३५४२६, मोहाडी ४७५९, पवनी २९४११, साकोली ३६७८९, तुमसर ३४३११ मजुरांसाठी कामे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.  मात्र ज्या प्रमाणात नोंदणी झाली. त्या प्रमाणात आजपर्यंत कधीच मजूर उपलब्ध झाले नाही. १४०९ ग्रामपंचायतंर्गत कामे सुरूआहे. 

रोजगार हमी योजनेत प्रत्येकांच्या हाताला काम मिळत असले तरी रोजगार हमी योजनेतील कामे अतिशय कठीण असतात. त्याऐवजी शेतशिवारात राबणाऱ्या मजुरांना रोजगार हमी योजनेतून मजुरी मिळाली तर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि मजुरांनाही त्याचा फायदा मिळेल. मात्र तसे होत नाही. राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे - शरद भूते,  शेतकरी.

शेतीची कामे संपल्यानंतर आता रोजगाराची स्थिती गंभीर आहे. त्यात परिसरात रोहयोच्या कामांबाबत काही हालचाली दिसत नसल्याने मागणी करून फायदा होणार काय, असा विचार येतो. परिसरात रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी आहे. अनेकदा भर उन्हात रोहयोची कामे केली जातात. परिणामी मजुरांना त्रास होतो.- राजू सार्वे, बेरोजगार

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत