शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

532 ग्रामपंचायतींमध्ये सात हजार मजुरांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST

काम करणाऱ्या मजुरांचा हा आकडा अडीच लाखांचा असला तरी प्रत्यक्ष काम करणारे खरे कामगार मोजकेच आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना त्या ठिकाणी पैसे तत्काळ मिळत नाही. या ठिकाणची कामे अनेकांना हार्ड वाटतात. याशिवाय रोजमजुरीवर काम करण्यासाठी अनेकांची मानसिकता राहिलेली नाही. यामुळे या योजनेत काही तर लाभ मिळेल, म्हणून मोठ्या येणाऱ्या मजुरांची संख्या आपसुकच प्रमाणात नाव नोंदणी झाली.

ठळक मुद्दे१४०९ कामे सुरू : जिल्ह्यातील जॉबकार्डधारकांची संख्या वाढली, मजुरांना दिलासा

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्ह्यात रब्बी हंगामानंतर मजुरांना कामे मिळणे कठीण झाले असताना रोहयोची कामे वाढविणे आवश्यक आहे. तथापि, जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोची कामे केली जात असून, या कामांवर सात हजार १७६ मजूर कार्यरत आहेत. तसेच सध्या जिल्ह्यातील जॉबकार्डधारकांची संख्या वाढली आहे.हाताला काम नसेल तर शंभर दिवसाचा रोजगार पक्का म्हणून हमखास रोजगाराची गॅरंटी देण्यासाठी रोजगार हमी योजना पुढे आली. काम नसेल तर बेरोजगार भत्ता असे घोषवाक्य या योजनेत जोडण्यात आले. यामुळे लाखो नागरिकांनी आपली रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात नोंद केली. ही नोंद आता दोन लाख ३५ हजारांवर पोहोचली आहे. काम करणाऱ्या मजुरांचा हा आकडा अडीच लाखांचा असला तरी प्रत्यक्ष काम करणारे खरे कामगार मोजकेच आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना त्या ठिकाणी पैसे तत्काळ मिळत नाही. या ठिकाणची कामे अनेकांना हार्ड वाटतात. याशिवाय रोजमजुरीवर काम करण्यासाठी अनेकांची मानसिकता राहिलेली नाही. यामुळे या योजनेत काही तर लाभ मिळेल, म्हणून मोठ्या येणाऱ्या मजुरांची संख्या आपसुकच प्रमाणात नाव नोंदणी झाली. प्रत्यक्षात कामावर गेल्याशिवाय मजुरी मिळणार नाही हे कळाल्यानंतर या कामावर कामावर येणाऱ्या मजुरांची संख्या आपसुकच कमी झाली आहे. मजुरांना इतर ठिकाणी कामाच्या शोधात जायचे काम पडू नये, गावात किंवा परिसरातच त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत कामे दिला जातात. जिल्ह्यात रबी हंगामाती कामे संपली असताना रोजगाराची समस्या गंभीर बनत आहे. दरदिवशी विविध ठिकाणावरून शेकडो मजूर नागपूर, पुणे, मुंबई आदी महानगरांसह परराज्यात रोजगारासाठी स्थलंतर करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.राज्यात सध्या स्थितीत वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षा घेता जिल्हा प्रशासनाने मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोहयोची कामे वाढवितानाच त्यांना या कामाबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीसह यंत्रणेंकडून रोहयोची कामे सुरू आहे. यात ८८ कामे यंत्रणांची आहे.

पवनी तालुक्यात     सर्वात कमी कामगार पवनी तालुक्यात सर्वात कमी मजूर कामावर आहे. सन २०२०-२१ ची आकडेवारी लक्षात घेतल्यानंतर पवनी तालुका मजुरांमध्ये माघारलेला दिसतो. तालुकानिहाय आकडवारीनुसार भंडारा २६२४७, लाखांदूर ३४७८७, लाखनी ३५४२६, मोहाडी ४७५९, पवनी २९४११, साकोली ३६७८९, तुमसर ३४३११ मजुरांसाठी कामे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.  मात्र ज्या प्रमाणात नोंदणी झाली. त्या प्रमाणात आजपर्यंत कधीच मजूर उपलब्ध झाले नाही. १४०९ ग्रामपंचायतंर्गत कामे सुरूआहे. 

रोजगार हमी योजनेत प्रत्येकांच्या हाताला काम मिळत असले तरी रोजगार हमी योजनेतील कामे अतिशय कठीण असतात. त्याऐवजी शेतशिवारात राबणाऱ्या मजुरांना रोजगार हमी योजनेतून मजुरी मिळाली तर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि मजुरांनाही त्याचा फायदा मिळेल. मात्र तसे होत नाही. राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे - शरद भूते,  शेतकरी.

शेतीची कामे संपल्यानंतर आता रोजगाराची स्थिती गंभीर आहे. त्यात परिसरात रोहयोच्या कामांबाबत काही हालचाली दिसत नसल्याने मागणी करून फायदा होणार काय, असा विचार येतो. परिसरात रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी आहे. अनेकदा भर उन्हात रोहयोची कामे केली जातात. परिणामी मजुरांना त्रास होतो.- राजू सार्वे, बेरोजगार

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत