शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

उपसा सिंचनाची कामे पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:59 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित उपसासिंचन योजनांची कामे लवकरात पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

ठळक मुद्देजलसंपदा राज्यमंत्र्यांचे आश्वासन : भंडारा जिल्ह्यातील अपूर्ण कामांविषयी बैठक

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित उपसासिंचन योजनांची कामे लवकरात पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पुढाकाराने बुधवार दिनांक २० डिसेंबर रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.योजनेतील कामे अपूर्ण असून, निधी उपलब्ध केला जात नाही. त्यामुळे, या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी सिंचनाअभावी नापिकीचा सामना करावा लागतो. त्यातून शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले. अनेक गावांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. पुनर्वसित नवीन गावठाणांमध्ये नागरी सुविधांची कामे अपूर्ण आहेत. ती कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी मागणीही भोंडेकर यांनी या बैठकीत लावून धरली.जलसंपदा राज्यमंत्र्यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या योजनेतील कामांचा आढावा घेतला. प्रस्तावित उपसा सिंचन योजनांना मंजूरी प्रदान केली जाईल तसेच सुरू असलेल्या योजनांच्या कामांना गती दिली जाईल, असे आश्वासन देत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. नम े योजनांचा समावेश राष्ट्रीय प्रकल्पात करण्यात यावा, यादृष्टीने अहवाल तयार करून केंद्र शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही राज्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या बैठकीला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, गोसे उपसासिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर, गोसे पुनर्वसन विभगाच्या कार्यकारी अभियंता विजयाश्री बुराडे, पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, अनिल गायधने, राजू ब्राम्हणकर, यशवंत सोनकुसरे, प्रशांत भुते, मुन्ना तिघरे, विजय कुंभरे प्रामुख्याने उपस्थित होते.४५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २० टक्के कामेगोसे सिंचन प्रकल्पांतर्गत गोसे पुनर्वसन, गोसे धरण, डावा आणि उजवा कालवा या विभागाबरोबरच करचखेडा आणि नेरला उपसा सिंचन योजनेतील त्याचप्रमाणे हत्तीडोई, धारगाव, आकोट व सुरेवाडा या प्रस्तावित उपसासिंचन योजनांच्या कामांविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. या योजनांद्वारे सिंचन करावयाच्या अंदाजे ४५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ २० टक्के कामे झाली असून, उर्वरीत कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले.