शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

उपसा सिंचनाची कामे पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:59 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित उपसासिंचन योजनांची कामे लवकरात पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

ठळक मुद्देजलसंपदा राज्यमंत्र्यांचे आश्वासन : भंडारा जिल्ह्यातील अपूर्ण कामांविषयी बैठक

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित उपसासिंचन योजनांची कामे लवकरात पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पुढाकाराने बुधवार दिनांक २० डिसेंबर रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.योजनेतील कामे अपूर्ण असून, निधी उपलब्ध केला जात नाही. त्यामुळे, या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी सिंचनाअभावी नापिकीचा सामना करावा लागतो. त्यातून शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले. अनेक गावांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. पुनर्वसित नवीन गावठाणांमध्ये नागरी सुविधांची कामे अपूर्ण आहेत. ती कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी मागणीही भोंडेकर यांनी या बैठकीत लावून धरली.जलसंपदा राज्यमंत्र्यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या योजनेतील कामांचा आढावा घेतला. प्रस्तावित उपसा सिंचन योजनांना मंजूरी प्रदान केली जाईल तसेच सुरू असलेल्या योजनांच्या कामांना गती दिली जाईल, असे आश्वासन देत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. नम े योजनांचा समावेश राष्ट्रीय प्रकल्पात करण्यात यावा, यादृष्टीने अहवाल तयार करून केंद्र शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही राज्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या बैठकीला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, गोसे उपसासिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर, गोसे पुनर्वसन विभगाच्या कार्यकारी अभियंता विजयाश्री बुराडे, पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, अनिल गायधने, राजू ब्राम्हणकर, यशवंत सोनकुसरे, प्रशांत भुते, मुन्ना तिघरे, विजय कुंभरे प्रामुख्याने उपस्थित होते.४५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २० टक्के कामेगोसे सिंचन प्रकल्पांतर्गत गोसे पुनर्वसन, गोसे धरण, डावा आणि उजवा कालवा या विभागाबरोबरच करचखेडा आणि नेरला उपसा सिंचन योजनेतील त्याचप्रमाणे हत्तीडोई, धारगाव, आकोट व सुरेवाडा या प्रस्तावित उपसासिंचन योजनांच्या कामांविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. या योजनांद्वारे सिंचन करावयाच्या अंदाजे ४५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ २० टक्के कामे झाली असून, उर्वरीत कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले.