शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

उड्डाणपुलाचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 00:41 IST

तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे उड्डाणपूलाचे काम कासवगतीने सुरु आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित रेल्वे विभागाने येथे अजूनपर्यंत निविदा काढली नाही.

वाहतुकीची कोंडी : दिवसभर उडतो धुराळा, श्वसनाचा त्रासतुमसर : तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे उड्डाणपूलाचे काम कासवगतीने सुरु आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित रेल्वे विभागाने येथे अजूनपर्यंत निविदा काढली नाही. राज्य शसनाचा संबंधित विभाग मागील दीड वर्षापासून कामे करीत आहे. कामाची अशीच गती राहिली तर किमान चार वर्षे या उड्डाणपुल पूर्णत्वाला लागतील. सध्या येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते.तुमसर रोड येथे मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाला मंजूरी प्राप्त झाली. रेल्वे तथा राज्य सरकार संयुक्तरित्या उडाणपूलाला निधी उपलब्ध करुन उडाणपूल पुर्णत्वाचा करार झाला. या रेल्वे फाटकावर प्रचंड वाहतूकीची कोंडी होत असल्याने केंद्र तथा राज्य शासनाने येथे उडाणपूल मंजूर केला होता.सन २०१४ मध्ये उडाणपूलाचे भूमिपूजन करण्यात आले. तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी उडाणपुलांचे भूमिपूजन केले होते. उडाणपूलाची एकूण किंमत ४३ कोटी इतकी आहे. यात २६ कोटी राज्य शासन खर्च करणार असून १४ कोटी रेल्वे विभाग खर्च करणार आहे. राज्य शासनाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. दीड वर्षापासून येथे कामे सुरु आहेत. आतापर्यंत अंडरपास (भूयारी रस्ता) तयार झाला आहे. बायपास रस्ता एका बाजूचा झाला असून दुसऱ्या बाजूचा रस्ता येथे तयार केला जात आहे.दगड रोवणीचे (पिलर फिक्सींग) कामे तुमसर-रामटेक रस्त्यावर सुरु आहे. जागतिक बँकेचे अर्थसहाय्य या उड्डाणपुलाला प्राप्त झाले आहे. अप्रीय रस्ता (तुमसर-रामटेक मार्ग) एका महिन्यात पूर्णत्वास येणार आहे. गोंदिया मार्गावरील देव्हाडी शिवारातील 'अ‍ॅप्रोच' रस्त्याचे कामे सुरु झाली आहेत. रेल्वे ट्रॅकवरील सिमेंट पिल्लर उभारणी व त्यावरील स्पॅनची निविदा अजूनपर्यंत रेल्वेने काढली नाही, अशी माहिती आहे. बायपास रस्ता मुरुम, गिट्टी टाकून तयार करण्यात आला. वाहतूकीमुळे प्रचंड धुराळा येथे दिवसभर उडत असतो. आजूबाजूची घरे लालसर झाली आहेत. हवेतील कणांमुळे प्रदूषणाची समस्या येथे वाढली आहे. किमान रस्त्यावर सतत पाणी घालणे गरजेचे आहे.तुमसर-रामटेककडे जाणाऱ्या वळणावर खोल खड्डा पडला आहे. येथे लहान चारचाकी वाहने अडून पडतात. रात्री अंधारात हा खड्डा दिसत नाही. येथे अपघाताची नेहमीच शक्यता राहते आहे. अपघात येथे घडले आहेत. अप्रिय रस्त्यावर वीज कारखान्यातील 'पोन्टी' राख घालण्यात येत आहे. हवेमुळे ही राख उडून येथून प्रवास करणाऱ्यांच्या नाका-तोंडात जाते. गावातील नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने येथे दखल घेणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनानेही येथे दखल घेण्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधींनी येथे निधी उपलब्धतेकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)