शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उड्डाणपुलाचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 00:41 IST

तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे उड्डाणपूलाचे काम कासवगतीने सुरु आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित रेल्वे विभागाने येथे अजूनपर्यंत निविदा काढली नाही.

वाहतुकीची कोंडी : दिवसभर उडतो धुराळा, श्वसनाचा त्रासतुमसर : तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे उड्डाणपूलाचे काम कासवगतीने सुरु आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित रेल्वे विभागाने येथे अजूनपर्यंत निविदा काढली नाही. राज्य शसनाचा संबंधित विभाग मागील दीड वर्षापासून कामे करीत आहे. कामाची अशीच गती राहिली तर किमान चार वर्षे या उड्डाणपुल पूर्णत्वाला लागतील. सध्या येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते.तुमसर रोड येथे मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाला मंजूरी प्राप्त झाली. रेल्वे तथा राज्य सरकार संयुक्तरित्या उडाणपूलाला निधी उपलब्ध करुन उडाणपूल पुर्णत्वाचा करार झाला. या रेल्वे फाटकावर प्रचंड वाहतूकीची कोंडी होत असल्याने केंद्र तथा राज्य शासनाने येथे उडाणपूल मंजूर केला होता.सन २०१४ मध्ये उडाणपूलाचे भूमिपूजन करण्यात आले. तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी उडाणपुलांचे भूमिपूजन केले होते. उडाणपूलाची एकूण किंमत ४३ कोटी इतकी आहे. यात २६ कोटी राज्य शासन खर्च करणार असून १४ कोटी रेल्वे विभाग खर्च करणार आहे. राज्य शासनाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. दीड वर्षापासून येथे कामे सुरु आहेत. आतापर्यंत अंडरपास (भूयारी रस्ता) तयार झाला आहे. बायपास रस्ता एका बाजूचा झाला असून दुसऱ्या बाजूचा रस्ता येथे तयार केला जात आहे.दगड रोवणीचे (पिलर फिक्सींग) कामे तुमसर-रामटेक रस्त्यावर सुरु आहे. जागतिक बँकेचे अर्थसहाय्य या उड्डाणपुलाला प्राप्त झाले आहे. अप्रीय रस्ता (तुमसर-रामटेक मार्ग) एका महिन्यात पूर्णत्वास येणार आहे. गोंदिया मार्गावरील देव्हाडी शिवारातील 'अ‍ॅप्रोच' रस्त्याचे कामे सुरु झाली आहेत. रेल्वे ट्रॅकवरील सिमेंट पिल्लर उभारणी व त्यावरील स्पॅनची निविदा अजूनपर्यंत रेल्वेने काढली नाही, अशी माहिती आहे. बायपास रस्ता मुरुम, गिट्टी टाकून तयार करण्यात आला. वाहतूकीमुळे प्रचंड धुराळा येथे दिवसभर उडत असतो. आजूबाजूची घरे लालसर झाली आहेत. हवेतील कणांमुळे प्रदूषणाची समस्या येथे वाढली आहे. किमान रस्त्यावर सतत पाणी घालणे गरजेचे आहे.तुमसर-रामटेककडे जाणाऱ्या वळणावर खोल खड्डा पडला आहे. येथे लहान चारचाकी वाहने अडून पडतात. रात्री अंधारात हा खड्डा दिसत नाही. येथे अपघाताची नेहमीच शक्यता राहते आहे. अपघात येथे घडले आहेत. अप्रिय रस्त्यावर वीज कारखान्यातील 'पोन्टी' राख घालण्यात येत आहे. हवेमुळे ही राख उडून येथून प्रवास करणाऱ्यांच्या नाका-तोंडात जाते. गावातील नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने येथे दखल घेणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनानेही येथे दखल घेण्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधींनी येथे निधी उपलब्धतेकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)