शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

देव्हाडी उड्डाणपुलाचे काम संथगतीने

By admin | Updated: May 15, 2017 00:35 IST

मागील अडीच वर्र्षापासून देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु आहे. एप्रिल महिन्यात रेल्वे बांधकामाच्या निविदा काढणार होते, ...

रेल्वेकडून अद्याप निविदा नाही : बायपास रस्ता धोकादायक, निधीची प्रतीक्षालोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मागील अडीच वर्र्षापासून देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु आहे. एप्रिल महिन्यात रेल्वे बांधकामाच्या निविदा काढणार होते, परंतु अद्याप त्यांना मुहुर्त सापडला नाही. अपघाताला आमंत्रण देणारा हा उड्डाणपुल ठरत आहे. शासनाचे काम निधीअभावी कासवगतीने सुरु आहे. उड्डाणपुलावर प्रभूकृपा होईल काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.दक्षिण - पूर्व रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर उड्डाणपुल प्रस्तावित करण्यात आला आहे. रेल्वे तथा राज्य सरकार येथे संयुक्तरित्या उड्डाणपुल तयार करीत आहे. रेल्वे ट्रॅकवरील ७० मिटरचे बांधकाम रेल्वे प्रशासन करणार असून आतापर्यंत कामाच्या निविदा रेल्वेने काढल्या नाहीत. रेल्वे प्रशासन एप्रिल महिन्यात निविदा काढणार होती. निविदा न काढल्याने उड्डाणपुलाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.तुमसर - रामटेक - गोंदिया राज्य मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता येथे उड्डाणपुलाला मंजूरी प्रदान करण्यात आली होती. सध्या राज्य शासनाचे बांधकाम खाते एप्रोच (पोहच) रस्ता तयार करीत आहे. तुमसर मार्गावरील भरावचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तर गोंदिया मार्गावर भरावची कामे सुरु आहेत. परंतु कामाचा वेग अतिशय मंद आहे. मागील अडीच वर्षापासून ही कामे सुरु आहेत. निधीअभावी येथे कामे संथगतीने सुरु असल्याची माहिती आहे. रेल्वेची निविदा केव्हा निघणार याविषयी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सांगायला तयार नाही. रेल्वेच्या निविदेकरिता ‘प्रभू’ कृपेची प्रतीक्षा करावी लागत आहे. नागपूर येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आले होते. तेव्हा उड्डाणपुलाबाबत आशा होती. परंतु याबाबत समस्या कुणीच मांडली नसल्याची माहिती आहे. रेल्वेचा अद्याप ठावठिकाणा नसल्याने राज्य शासनाचे कामे कासवगतीने सुरु आहेत. वर्दळीचा राज्य मार्ग असल्याने येथे दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होते. एप्रोच रस्त्याचे काम सुरु असल्याने रस्ता निमूळता आहे. निमूळत्या रस्त्यावर वळणमार्ग आहे. बायपास रस्त्यावर खड्डे पडणे सुरु झाले आहे. त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. रात्री येथे पथदिव्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी केंद्र तथा राज्य शासनाकडे नियमित पाठपुरावा करण्याची गरज आहे. तिरोडा येथील अदानी वीज कारखान्यातील अ‍ॅश एप्रोच रस्त्यावर भराव म्हणून घालण्यात येत आहे. वादळी वाऱ्यात ही अ‍ॅश येथे वाऱ्यासोबत हवेत पसरत असून डोळे व श्वसनाचे आजार येथे बळावित आहेत. उड्डाणपुल कामाची गती येथे वाढविण्याची गरज आहे. अशीच कामाची गती राहिल्यास किमान चार वर्ष लागण्याची शक्यता आहे. देव्हाडी - गोंदिया रस्त्यावर काही ठिकाणी विजेच्या खांबामुळे धोक्याची शक्यता वर्तविण्यात येते. बायपास रस्त्यावर बारीक गिट्टीची चुरी टाकण्यात आली. यावरून दुचाकी घसरल्याच्या घटना दररोज घडत आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.