शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

कोरोनाकाळातील कृषी विभागाचे कार्य उल्लेखनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:40 IST

कोरोनाकाळातील खरे कोरोनायोद्धे आहेत, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन ...

कोरोनाकाळातील खरे कोरोनायोद्धे आहेत, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम यांनी केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा अंतर्गत ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान भंडारा तालुका कृषी कार्यालयाच्या परिसरात आयोजित रानभाजी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, तालुकाध्यक्ष प्रसन्न चकोले, उपसंचालक अरुण बलसाने, भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, साकोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, मंडळ कृषी अधिकारी होमराज धांडे, विजय हुमने, पर्यवेक्षक आनंद मोहतुरे, भंडारा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, उमेद व्यवस्थापक प्रिया सुखदेवे, शेतकरी भदू कायते, संजय एकापुरे, तानाजी गायधने, डुबेदास रामटेके यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कोरोनाकाळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लाखणीचे तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, उत्कृष्ट फळबाग लागवडीसाठी कृषी सहाय्यक गोपाल मेश्राम, पहेल्याचे पर्यवेक्षक होमराज धांडे, एकोडीचे कृषी सहाय्यक संतोष नागलवाडे, किन्हीचे के. एच. परशुरामकर, लाखांदूरचे वि. भा. शिवणकर, भिलेवाडाचे कृषी सहाय्यक गिरीश रणदिवे, गुंथाराच्या मीनाक्षी लांडगे यांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी शेतकऱ्यांना रानभाज्यासाठी चांगले मार्केट असून या संधीचे सोने करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी रानभाज्यांची पाहणी करून योग्य व्यवस्थापनाविषयी कृषी विभागाचे कौतुक केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी कोरोना काळातील कर्तव्य निभावतानाचे स्वतःचे, कर्मचाऱ्यांना आलेल्या अडचणींचे अनुभव कथन केले. त्यातही उत्कृष्ट केल्यामुळेच जिल्ह्यात भाजीपाला, फळे योग्य पद्धतीने पुरवठा केल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी ज्या-ज्या ठिकाणी भाजीपाल्याची गरज होती त्या-त्या ठिकाणी स्वतः व कृषी सहाय्यकांना भाजी पोहोचवितानाचे अनुभव कथन केले. संचालन कृषी पर्यवेक्षक आनंद मोहतुरे यांनी केले तर आभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी मानले.