शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कोरोनाकाळातील कृषी विभागाचे कार्य उल्लेखनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:40 IST

कोरोनाकाळातील खरे कोरोनायोद्धे आहेत, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन ...

कोरोनाकाळातील खरे कोरोनायोद्धे आहेत, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम यांनी केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा अंतर्गत ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान भंडारा तालुका कृषी कार्यालयाच्या परिसरात आयोजित रानभाजी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, तालुकाध्यक्ष प्रसन्न चकोले, उपसंचालक अरुण बलसाने, भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, साकोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, मंडळ कृषी अधिकारी होमराज धांडे, विजय हुमने, पर्यवेक्षक आनंद मोहतुरे, भंडारा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, उमेद व्यवस्थापक प्रिया सुखदेवे, शेतकरी भदू कायते, संजय एकापुरे, तानाजी गायधने, डुबेदास रामटेके यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कोरोनाकाळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लाखणीचे तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, उत्कृष्ट फळबाग लागवडीसाठी कृषी सहाय्यक गोपाल मेश्राम, पहेल्याचे पर्यवेक्षक होमराज धांडे, एकोडीचे कृषी सहाय्यक संतोष नागलवाडे, किन्हीचे के. एच. परशुरामकर, लाखांदूरचे वि. भा. शिवणकर, भिलेवाडाचे कृषी सहाय्यक गिरीश रणदिवे, गुंथाराच्या मीनाक्षी लांडगे यांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी शेतकऱ्यांना रानभाज्यासाठी चांगले मार्केट असून या संधीचे सोने करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी रानभाज्यांची पाहणी करून योग्य व्यवस्थापनाविषयी कृषी विभागाचे कौतुक केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी कोरोना काळातील कर्तव्य निभावतानाचे स्वतःचे, कर्मचाऱ्यांना आलेल्या अडचणींचे अनुभव कथन केले. त्यातही उत्कृष्ट केल्यामुळेच जिल्ह्यात भाजीपाला, फळे योग्य पद्धतीने पुरवठा केल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी ज्या-ज्या ठिकाणी भाजीपाल्याची गरज होती त्या-त्या ठिकाणी स्वतः व कृषी सहाय्यकांना भाजी पोहोचवितानाचे अनुभव कथन केले. संचालन कृषी पर्यवेक्षक आनंद मोहतुरे यांनी केले तर आभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी मानले.