शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

कोरोनाकाळातील कृषी विभागाचे कार्य उल्लेखनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:40 IST

कोरोनाकाळातील खरे कोरोनायोद्धे आहेत, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन ...

कोरोनाकाळातील खरे कोरोनायोद्धे आहेत, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम यांनी केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा अंतर्गत ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान भंडारा तालुका कृषी कार्यालयाच्या परिसरात आयोजित रानभाजी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, तालुकाध्यक्ष प्रसन्न चकोले, उपसंचालक अरुण बलसाने, भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, साकोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, मंडळ कृषी अधिकारी होमराज धांडे, विजय हुमने, पर्यवेक्षक आनंद मोहतुरे, भंडारा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, उमेद व्यवस्थापक प्रिया सुखदेवे, शेतकरी भदू कायते, संजय एकापुरे, तानाजी गायधने, डुबेदास रामटेके यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कोरोनाकाळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लाखणीचे तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, उत्कृष्ट फळबाग लागवडीसाठी कृषी सहाय्यक गोपाल मेश्राम, पहेल्याचे पर्यवेक्षक होमराज धांडे, एकोडीचे कृषी सहाय्यक संतोष नागलवाडे, किन्हीचे के. एच. परशुरामकर, लाखांदूरचे वि. भा. शिवणकर, भिलेवाडाचे कृषी सहाय्यक गिरीश रणदिवे, गुंथाराच्या मीनाक्षी लांडगे यांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी शेतकऱ्यांना रानभाज्यासाठी चांगले मार्केट असून या संधीचे सोने करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी रानभाज्यांची पाहणी करून योग्य व्यवस्थापनाविषयी कृषी विभागाचे कौतुक केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी कोरोना काळातील कर्तव्य निभावतानाचे स्वतःचे, कर्मचाऱ्यांना आलेल्या अडचणींचे अनुभव कथन केले. त्यातही उत्कृष्ट केल्यामुळेच जिल्ह्यात भाजीपाला, फळे योग्य पद्धतीने पुरवठा केल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी ज्या-ज्या ठिकाणी भाजीपाल्याची गरज होती त्या-त्या ठिकाणी स्वतः व कृषी सहाय्यकांना भाजी पोहोचवितानाचे अनुभव कथन केले. संचालन कृषी पर्यवेक्षक आनंद मोहतुरे यांनी केले तर आभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी मानले.