शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

१५ दिवसात सुरू होणार ‘भेल’चे काम

By admin | Updated: May 30, 2015 00:55 IST

तत्कालीन संपुआ सरकारने कॅबिनेटची मंजुरी न घेता केवळ भूमिपूजन करुन ठेवलेल्या ‘भेल’ प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली.

कृपाल तुमाने यांची माहिती : २,७०० कोटींच्या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी भंडारा : तत्कालीन संपुआ सरकारने कॅबिनेटची मंजुरी न घेता केवळ भूमिपूजन करुन ठेवलेल्या ‘भेल’ प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला येत्या १५ दिवसात प्रारंभ होणार असून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हे प्रकल्पस्थळी येणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी शुक्रवारला आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी ते म्हणाले, केंद्रातील काही मंत्र्यांनी प्रकल्पाला विरोध केल्यामुळे हा प्रकल्प सुरू करण्यासाठी काही अडचणी आल्या होत्या. त्यामुळे या प्रकल्पाविषयी संभ्रम निर्माण झाला होता. वीज निर्मितीसाठी कोळशाची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. त्यासाठी अन्य देशातून कोळसा आयात करावा लागत आहे. सद्यस्थितीत सौर ऊर्जेला भरपूर वाव असल्यामुळे केंद्र सरकारने सौर ऊर्जेवर उपकरणे तयार करण्यावर भर दिला आहे. आता ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत येणारा हा देशातील कारखाना ठरणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी २,७०० कोटी रुपये मंजूर करुन या प्रकल्पातील अडचणी दूर केल्या आहेत. एक वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून यात केंद्राचा ७५ टक्के तर राज्याचा २५ टक्के सहभाग राहणार आहे. या प्रकल्पात सौर ऊर्जेचे टर्बाईन, सोलर प्लेट ही उपकरणे तयार करण्यात येतील. हे काम २०१५ च्या पर्यंत पूर्ण करुन २०१६ च्या प्रारंभी उत्पादन सुरू होईल. या प्रकल्पात दोन हजार लोकांना प्रत्यक्ष तर पाच हजार लोकांना अप्रत्यक्ष असे सात हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, राजेंद्र पटले, अजय तुमसरे, सुनिल कुरंजेकर, हेमंत बांडेबुचे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)‘लोकमत’चे दिले उदाहरणसौर ऊर्जा ही विजेसाठी सर्वश्रेष्ठ पर्याय असल्याचे ‘लोकमत’ने सिद्ध करुन दाखविले आहे. लोकमतचे उदाहरण देत खा.तुमाने म्हणाले, वृत्तपत्र क्षेत्रात अव्वलस्थानी असलेला ‘लोकमत’ समूह सौर ऊर्जेवर वृत्तपत्र प्रकाशित करीत आहे. २० अश्वशक्तीहून अधिक क्षमतेच्या मशीन्स सौर ऊर्जेवर सुरु राहतात. त्यामुळे सौर ऊर्जेला भविष्यात मोठी मागणी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिवसेना स्वतंत्र लढणार यावेळी खा.तुमाने म्हणाले, शिवसेना जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे. त्यासाठी आम्ही निवडणूक समिती गठीत केली असून अधिकाधिक जागा जिंकून भंडारा जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे लक्ष्य आहे.