शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

महिलांची मते ठरणार निर्णायक

By admin | Updated: September 29, 2014 23:00 IST

एक महिला शिकली तर ती कुटुंबाचा उद्धार करते. असे म्हटले जाते. त्यामुळे महिलांनी श्किणं, सजग होणे ही काळाची गरज आहे. तरच समाज पुढे जाऊ श्केल आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावर

भंडारा : एक महिला शिकली तर ती कुटुंबाचा उद्धार करते. असे म्हटले जाते. त्यामुळे महिलांनी श्किणं, सजग होणे ही काळाची गरज आहे. तरच समाज पुढे जाऊ श्केल आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावर महिलांनी त्यांच्यावरील ही समाज सुधारण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.विधानसभा निवडणुकांचे पडघम सर्वत्र वाजू लागले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या पक्षांची असलेली युती आणि आघाडी तुटली आहे. इतकेच नव्हे तर निवडणुका तोंडावर असताना केले जाणारे पक्षांतर याबबत सर्वत्र चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. चुल व मुल या संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या महिलामध्ये याविषयी चर्चा रंगत आहेत. महिलांमध्ये हळूहळू राजकारणाच्या चर्चा रंगत आहेत आणि विशेष करून त्यांनाही राजकारण हे त्यंचे माध्यम वाटू लागले आहे, हे महत्वाचे आहे. विविध पक्षांनी व नेते मंडळींनी ऐन निवडणुकीच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयाचा जनसामान्यांवर काय परिणाम होईल? याचा विचारच केलेला दिसत नाही. परंतु आधुनिक काळातील महिला भगिनी हा विचार करू लागल्या आहेत. भंडारा जिल्ह्याच्या मतदार यादीत ९,१२,२०८ मतदारांची नोंद आहे. पुरुष मतदारांची संख्या ४,६४९८६ आहेत तर ४,४७,११९ महिला मतदार आहेत. सहाजिकच पुरुष मतदारापेक्षा महिला मतदारांची संख्या कमी आहे. तरीही येत्या निवडणुकीत महिला वर्गाची मते खऱ्या अर्थाने निर्णायक ठरतील. यात वाद नाही. स्थानिक स्वराज्य संस्था असो, पंचायत समिती असो वा जिल्हा परिषद, प्रत्येक ठिकाणी महिला भगिनींनी जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत. पक्षामुळे असो वा आरक्षणामुळे अथवा अचानक मिळालेली संधी परंतु स्वत:चे घर सांभाळून अधिकची जबाबदारी त्या पेलत आहेत. राजकारणामध्ये महिलावर्गाची संख्या हाताच्या बेटावर मोजता येईल इतकी आहे. नेतृत्वासाठी पुढे आलेल्या महिला कमी असल्या तरी त्यांना राजकारण कळत आहे. राजकारणासाठी राजकारण की स्वार्थासाठी राजकारण हेही उमजू लागले आहे. इतकेच नव्हे तर आपापसात त्या चर्चाही करीत आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महिला वर्गाची मते निश्चितच महत्वपूर्ण ठरणार आहेत. गृहिणी महिला देखील प्रिंट किंवा इलेटॅनिक्स माध्यमांद्वारे घडामोडीकडे लक्ष ठेवून आहेत. पक्षनिष्ठा म्हणून आजही गावातील, शहरातील कुटुंब पक्षाला पाठींबा देतात. पक्षाकडून मग कोणताही उमेदवार दिला जातो त्याला डोळे झाकून पाठिंबा देतात असे असले तरी सद्यस्थितीत भेडसावणाऱ्या समस्यांवर महिला वर्ग तिखट प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. गगनाला भिडणारी महागाई असो, महिला सुरक्षा असो त्याचप्रमाणे गावातील, शहरातील विकासकामे असोत वा रस्ते, पाणी आदी प्रश्नांवर त्या चर्चाची विनीमय करीत आहेत. सतत भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याऐवजी केवळ आपल्यापुरता सिमीत विचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींपेक्षा सर्वसामान्य उमेदवार बरा अशी प्रतिक्रिया ऐकू येऊ लागली आहे. स्वत:पेक्षा गावच्या किंवा रत्नागिरी शहराचा विकास त्यांना कळू लागला आहे. जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी अर्थात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता महिलावर्ग एकजुटीने बाहेर पडल्या तर फार मोठा बदल घडवू शकतात. इतकेच नव्हे तर मतदानाकरिता बाहेर पडण्याचे टाळले तरीही बदल संभवतो. एकूणच दोन्ही निर्णय महिलांचे आहेत. जे महत्वपूर्ण आहेत. पुरुषप्रधान संस्कृती असली तरी महिला आता स्वत:च्या मनाने मतदान करू लागल्या आहेत. भारतीय घटनेने दिलेल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या उत्स्फूर्तरित्या बाहेर पडू लागल्या आहेत. शिवाय समाजातील घडामोडी व राजकारणाचा अभ्यास करू लागल्याने योग्य काय? अयोग्य काय याबाबत सजग झाल्या आहेत. विकासकामे, समस्यांना प्राधान्य देत मतदान करण्यात आले तर निश्चितच चित्र पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)