शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

सायबर गुन्ह्यांसंदर्भात महिलांनी सतर्क रहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

जिल्हा माहिती कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सेफ वूमन व महिला सुरक्षा’ या विषयावर येथील सामाजिक न्याय भवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माहिती कार्यालयाचे सुनीलदत्त जांभुळे, रंजना खोब्रागडे, अरुणा बांते, पडोळे उपस्थित होते.

ठळक मुद्देमृणालिनी वंजारी : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘सायबर सेफ वूमन व महिला सुरक्षा’ कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : डिजिटल युगात इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत. विशेषत: महिला व बालकांविरूद्धच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. इंटरनेटच्या मदतीने महिलांचे लैगिंक शोषन, फसवणूक आदी गुन्हे घडत आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यासंदर्भात महिलांनी अधिक सतर्क व जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. अशी फसवणूक होत असल्यास तात्काळ पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक मृणालिनी वंजारी यांनी येथे केले.जिल्हा माहिती कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सेफ वूमन व महिला सुरक्षा’ या विषयावर येथील सामाजिक न्याय भवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माहिती कार्यालयाचे सुनीलदत्त जांभुळे, रंजना खोब्रागडे, अरुणा बांते, पडोळे उपस्थित होते. मृणालिनी वंजारी म्हणाल्या, हैदराबाद प्रकरण तसेच निर्भया हत्याकांडासारखे गुन्हे समाजात होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. इंटरनेटचा सतत वापर केल्याने मुलांमध्ये हिंसक भावना निर्माण होत असून मुलांना अशा विकृत मानसिकतेपासून पालकांनी परावृत्त करावे तरच अशा घटना घडणार नाही. समाजाची मुली व महिलांकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. योग्य व्यासपीठ न मिळाल्याने ग्रामीण भागातील मुली मागे राहतात. अशा मुलींना सायबर गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते.पालकांनी मुला-मुलींमध्ये भेदभाव करू नये, महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदीप काठोळे यांनी महिलांनी कुटुंबात चांगले संस्कार करण्याचे आवाहन केले. आभार रंजना खोब्रागडे यांनी मानले.पतीला परमेश्वर न समजता बेस्ट फ्रेंड समजाआजच्या परिस्थितीत महिलांनी पती परमेश्वर न समजता बेस्ट फ्रेंड समजावे. त्यामुळे त्यांच्यात असलेले गैरसमज दूर होईल. कुटुंबात पुरूष, महिला समानतेचे संस्कार रूजवावे, महिलांनी स्वयंसंरक्षणासाठी महिलांनी अभ्यास करावा. अत्याचार प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, निर्भिडपणा शासन अलर्ट आहे. तसेच खोटी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल होवू शकतो. कायद्याचा गैरवापर टाळा, असे मृणालिनी वंजारी यांनी सांगितले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम