शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिखली येथे चार महिन्यांपासून महिलांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:36 IST

चिखलीत चार महिन्यांपूर्वी दररोज नियमित पाणीपुरवठा होत होता. मात्र, त्यानंतर गावातील बोअरचे पाणी अचानक कमी झाल्यापासून गावात पाणी टंचाई ...

चिखलीत चार महिन्यांपूर्वी दररोज नियमित पाणीपुरवठा होत होता. मात्र, त्यानंतर गावातील बोअरचे पाणी अचानक कमी झाल्यापासून गावात पाणी टंचाई सुरू आहे. मात्र, चार महिन्यांचा कालावधी लोटूनही ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी समस्येकडे लक्ष दिलेले नाही. ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे अद्याप पाणीटंचाईची समस्या सुटू शकलेली नाही. त्यामुळे गावातील निखिल वाघमारे, लीलाधर हटवार, कृष्णा वाघमारे, रोहित चरडे, वैभव गायधने, श्रीकांत कुंभलकर, तापेश्वर वाघमारे, वैभव मेहर, पंकज गंगारे, भारत वाढवे या तरुणांसह गावातील महिलांना दूर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना धूळखात पडली आहे, तर दुसरीकडे ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासनाचे अधिकारीही याकडे डोळेझाक करीत आहेत. पिण्याचे पाणी कोठून आणावे, असा प्रश्न महिलांसमोर कायम आहे. चिखली गावात काही दिवसांपूर्वी कंटेन्मेंट करण्यात आले होते. मात्र, त्याही परिस्थितीत गावकऱ्यांना पाण्याची समस्या भेडसावत होतीच. तरीही ग्रामपंचायतीने कोणताही मार्ग काढलेला नाही. लोकांचा जीव गेल्यावर पाण्याची सोय करणार काय, असा आरोप चिखली येथील युवा कार्यकर्ता आकाश वाघमारे यांनी केला आहे. पिण्याचे पाणीच जर गावकऱ्यांना मिळत नसेल तर बाकी सुविधा कशा मिळणार, असाही आरोप होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा नियमित करावा व गावकऱ्यांची पाणी समस्येतून सुटका करावी, अशी मागणी केली आहे.

बॉक्स

कोरोना वाढण्याची भीती

चिखली हे गाव भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. गाव लहान असले तरी येथील शेतकऱ्यांनी उपक्रमशील, नाविन्यपूर्ण प्रयोग राबविल्याने राज्य व जिल्हास्तरावर चिखली गावाचा नावलौकिक झाला आहे. गावची अध्यात्मिक परंपरा ही मोठी आहे. सुशिक्षितवर्गाचेही प्रमाण जास्त असल्याने अनेकांना नोकरी निमित्ताने वेळेत जाण्यासाठी पाणी समस्या अडसर ठरत आहे. एकाच ठिकाणी पाण्यासाठी गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याचीही भीती आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणी समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी बीडीओ नूतन सावंत यांच्याकडे केली आहे.

मात्र, येथील ग्रामपंचायत प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

कोट

गावात गेल्या चार महिन्यांपासून पाणीच येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अनेकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. यामुळे अनेक महिला संतप्त झाल्या आहेत. पाणी समस्या तत्काळ सोडवण्याची आमची मागणी आहे.

आकाश वाघमारे,

युवा कार्यकर्ता, चिखली