शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

चिखली येथे चार महिन्यांपासून महिलांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:36 IST

चिखलीत चार महिन्यांपूर्वी दररोज नियमित पाणीपुरवठा होत होता. मात्र, त्यानंतर गावातील बोअरचे पाणी अचानक कमी झाल्यापासून गावात पाणी टंचाई ...

चिखलीत चार महिन्यांपूर्वी दररोज नियमित पाणीपुरवठा होत होता. मात्र, त्यानंतर गावातील बोअरचे पाणी अचानक कमी झाल्यापासून गावात पाणी टंचाई सुरू आहे. मात्र, चार महिन्यांचा कालावधी लोटूनही ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी समस्येकडे लक्ष दिलेले नाही. ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे अद्याप पाणीटंचाईची समस्या सुटू शकलेली नाही. त्यामुळे गावातील निखिल वाघमारे, लीलाधर हटवार, कृष्णा वाघमारे, रोहित चरडे, वैभव गायधने, श्रीकांत कुंभलकर, तापेश्वर वाघमारे, वैभव मेहर, पंकज गंगारे, भारत वाढवे या तरुणांसह गावातील महिलांना दूर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना धूळखात पडली आहे, तर दुसरीकडे ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासनाचे अधिकारीही याकडे डोळेझाक करीत आहेत. पिण्याचे पाणी कोठून आणावे, असा प्रश्न महिलांसमोर कायम आहे. चिखली गावात काही दिवसांपूर्वी कंटेन्मेंट करण्यात आले होते. मात्र, त्याही परिस्थितीत गावकऱ्यांना पाण्याची समस्या भेडसावत होतीच. तरीही ग्रामपंचायतीने कोणताही मार्ग काढलेला नाही. लोकांचा जीव गेल्यावर पाण्याची सोय करणार काय, असा आरोप चिखली येथील युवा कार्यकर्ता आकाश वाघमारे यांनी केला आहे. पिण्याचे पाणीच जर गावकऱ्यांना मिळत नसेल तर बाकी सुविधा कशा मिळणार, असाही आरोप होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा नियमित करावा व गावकऱ्यांची पाणी समस्येतून सुटका करावी, अशी मागणी केली आहे.

बॉक्स

कोरोना वाढण्याची भीती

चिखली हे गाव भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. गाव लहान असले तरी येथील शेतकऱ्यांनी उपक्रमशील, नाविन्यपूर्ण प्रयोग राबविल्याने राज्य व जिल्हास्तरावर चिखली गावाचा नावलौकिक झाला आहे. गावची अध्यात्मिक परंपरा ही मोठी आहे. सुशिक्षितवर्गाचेही प्रमाण जास्त असल्याने अनेकांना नोकरी निमित्ताने वेळेत जाण्यासाठी पाणी समस्या अडसर ठरत आहे. एकाच ठिकाणी पाण्यासाठी गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याचीही भीती आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणी समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी बीडीओ नूतन सावंत यांच्याकडे केली आहे.

मात्र, येथील ग्रामपंचायत प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

कोट

गावात गेल्या चार महिन्यांपासून पाणीच येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अनेकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. यामुळे अनेक महिला संतप्त झाल्या आहेत. पाणी समस्या तत्काळ सोडवण्याची आमची मागणी आहे.

आकाश वाघमारे,

युवा कार्यकर्ता, चिखली