भंडारा
: शिवसेना हा असा पक्ष आहे, जो महिलांना सुरक्षितता देते. अन्यायासाठी लढण्याची ताकद देते. अन्याय करणार्याला धडा शिकविते. त्यामुळे महिलांनो, आपल्या हक्कासाठी आक्रमक व्हा, असे आवाहन शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोर्हे यांनी केले.भंडारा
जिल्हा शिवसेनेच्यावतीने बुधवारला आयोजित महिला मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार नरेंद्र भोंडेकर होते. मंचावर डॉ.अश्विनी भोंडेकर, रजनी मोटघरे, मंगला कोल्हे उपस्थित होते. यावेळी आ.गोर्हे म्हणाल्या, महिलांना सुरक्षितता देण्यात राज्यातील आघाडी सरकार सपेशल अपयशी ठरले आहे. मुरमाडीतील तीन सख्य्ख्या बहिणींच्या खून प्रकरणातील सत्य राज्य शासनाला उघडकीस आणता आले नाही. राज्यात गुन्हेगारीच्या घटना कमी असल्याचे राज्य शासनाला भासवायचे होते. त्यामुळे हे प्रकरण जाणीवपूर्वक दडपण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.आता
केंद्रात रालोआचे सरकार आले आहे. यात महिला मतदारांचा सिंहाचा वाटा आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यास या प्रकरणाचा शोध घेऊन आरोपींना पकडण्यात येईल, असा विश्वास देऊन राज्य राज्य आघाडी सरकारमुक्त करा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी भंडारा जिल्ह्यातील महिला बचतगटाला सशक्त करण्यासाठी आमदार निधीतून १५ लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. यावेळी
आ.नरेंद्र भोंडेकर म्हणाले, महिलांची ताकद काय असते हे लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले. राज्य सरकार सुडबुद्धीचे राजकारण करीत असून महिलांच्या सुरक्षेसाठी कुठलेही पाऊल उचलले नाही. अशा सरकारला हाकलून लावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक रजनी मोटघरे यांनी केले. संचालन मंगला कोल्हे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.अश्विनी भोंडेकर यांनी केले. मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. (जिल्हा प्रतिनिधी)