त्रिमूर्ती चौकात धरणे : तंटामुक्त गाव संघटनेचा पुढाकारभंडारा : जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीला घेऊन महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती संघटनेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यात जिल्हाभरातून आलेल्या महिलांनी जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा एल्गार केला.संघटनेचे जिल्हाध्यक्ष सैय्यद जाफरी यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन पुकारण्यात आले होते. भंडारा जिल्हा दारू मुक्त व्हावा याकरिता संघटनेच्या वतीने शासनाला वेळोवेळी निवेदन सादर करण्यात आले. परंतु या निवेदनाला शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेतर्फे एक दिवसीय धरणा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्हा दारूमुक्त करावा, अशा मागणीला घेऊन महिलांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.भंडारा जिल्ह्यात दारूबंदी करा या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. यावेळी संघटनेचे सैयद जाफरी, जिल्हा सचिव देवाजी वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ बडवाईक, मनोहर चामट, यामिनी बांडेबुचे, भगवती निमजे, जिल्हा सल्लागार अचल मेश्राम, अर्चना जांभुळकर, हिवराज उके, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, धनंजय मुलकलवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दारूबंदीसाठी महिला एकवटल्या
By admin | Updated: May 18, 2016 00:26 IST