शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : गरोदर महिला व नवजात शिशु यांच्या सुरक्षेसाठी व मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. तरीही माता मृत्यू व नवजात बालमृत्युच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे शासनाचा या योजनेवरचा कोट्यवधीचा निधी खरोखरच खर्च होत आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. साकोली ...

ठळक मुद्देबाळ सुखरूप : साकोली येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : गरोदर महिला व नवजात शिशु यांच्या सुरक्षेसाठी व मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. तरीही माता मृत्यू व नवजात बालमृत्युच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे शासनाचा या योजनेवरचा कोट्यवधीचा निधी खरोखरच खर्च होत आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. साकोली येथे अशीच घटना नुकतीच उघडकीला आली आहे. बाळंतपणानंतर अवघ्या पाच-सहा तासातच महिलेचा मृत्यू झाला. बाळ सुखरूप असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.सुषमा दिगांबर मेश्राम (२८) रा.सेंदुरवाफा असे मृत महिलेचे नाव आहे. सुषमाचा दिगांबर मेश्राम यांच्याी मागीलवर्षी विवाह झाला. सुषमा ही पहिल्यांदाच गर्भवती होती. ती विर्शी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रातून व खाजगी रूग्णालयातून औषधोपचार घेत होती. चार जुलैला सुषमाच्या गर्भाशयातील पाणी कमी झाल्यामुळे तिला साकोली येथील एका खाजगी रूग्णालयात दाखविण्यात आले. मात्र त्यावेळी प्रसुती वेदना वाढल्यामुळे तिची शस्त्रक्रियेने (सिझेरियन) प्रसुती करण्यात आली.प्रसुतीनंतर अवघ्या तीन तासातच सुषमाची प्रकृती बिघडली. तिच्या छातीमध्ये अचानक त्रास सुरू झाला. त्यामुळे सुषमाला तातडीने नागपूर येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान तिथे सुषमाचा मृत्यू झाला.यासंदर्भात सुषमाचे पती दिगांबर मेश्राम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, प्रसुतीपूर्वी सुषमाच्या प्लेटलेट (लाल पेशी) १.५० लाख एवढ्या होत्या. प्रसुतीनंतर त्या ७० हजारावर आल्या. त्यानंतर नागपूर येथे प्लेटलेट चढविण्यात आले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही व या प्रकरणात आपला कुणावरही आक्षेप नाही, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मातृत्व हिरावलेसुषमाने एका गोंडस बाळाला जन्म दिला व काही तासातच तिने या जगाचा निरोप घेतला. सुषमाच्या अकाली जाण्याने बाळाचे मात्र मातृत्व हिरावले आहे.आरोग्य विभागाचे दुर्लक्षशासन गर्भवती महिला व नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करते. नऊ महिने गर्भवती महिलांवर आरोग्य केंद्रात औषधोपचार करतात मात्र ऐन प्रसुतीच्या वेळी शासकीय रुग्णालयात योग्य उपचार होत नाही त्यामुळे बऱ्याच महिला प्रसूतीसाठी खाजगी रुग्णालयाची वाट बघतात.