शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : गरोदर महिला व नवजात शिशु यांच्या सुरक्षेसाठी व मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. तरीही माता मृत्यू व नवजात बालमृत्युच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे शासनाचा या योजनेवरचा कोट्यवधीचा निधी खरोखरच खर्च होत आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. साकोली ...

ठळक मुद्देबाळ सुखरूप : साकोली येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : गरोदर महिला व नवजात शिशु यांच्या सुरक्षेसाठी व मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. तरीही माता मृत्यू व नवजात बालमृत्युच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे शासनाचा या योजनेवरचा कोट्यवधीचा निधी खरोखरच खर्च होत आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. साकोली येथे अशीच घटना नुकतीच उघडकीला आली आहे. बाळंतपणानंतर अवघ्या पाच-सहा तासातच महिलेचा मृत्यू झाला. बाळ सुखरूप असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.सुषमा दिगांबर मेश्राम (२८) रा.सेंदुरवाफा असे मृत महिलेचे नाव आहे. सुषमाचा दिगांबर मेश्राम यांच्याी मागीलवर्षी विवाह झाला. सुषमा ही पहिल्यांदाच गर्भवती होती. ती विर्शी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रातून व खाजगी रूग्णालयातून औषधोपचार घेत होती. चार जुलैला सुषमाच्या गर्भाशयातील पाणी कमी झाल्यामुळे तिला साकोली येथील एका खाजगी रूग्णालयात दाखविण्यात आले. मात्र त्यावेळी प्रसुती वेदना वाढल्यामुळे तिची शस्त्रक्रियेने (सिझेरियन) प्रसुती करण्यात आली.प्रसुतीनंतर अवघ्या तीन तासातच सुषमाची प्रकृती बिघडली. तिच्या छातीमध्ये अचानक त्रास सुरू झाला. त्यामुळे सुषमाला तातडीने नागपूर येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान तिथे सुषमाचा मृत्यू झाला.यासंदर्भात सुषमाचे पती दिगांबर मेश्राम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, प्रसुतीपूर्वी सुषमाच्या प्लेटलेट (लाल पेशी) १.५० लाख एवढ्या होत्या. प्रसुतीनंतर त्या ७० हजारावर आल्या. त्यानंतर नागपूर येथे प्लेटलेट चढविण्यात आले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही व या प्रकरणात आपला कुणावरही आक्षेप नाही, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मातृत्व हिरावलेसुषमाने एका गोंडस बाळाला जन्म दिला व काही तासातच तिने या जगाचा निरोप घेतला. सुषमाच्या अकाली जाण्याने बाळाचे मात्र मातृत्व हिरावले आहे.आरोग्य विभागाचे दुर्लक्षशासन गर्भवती महिला व नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करते. नऊ महिने गर्भवती महिलांवर आरोग्य केंद्रात औषधोपचार करतात मात्र ऐन प्रसुतीच्या वेळी शासकीय रुग्णालयात योग्य उपचार होत नाही त्यामुळे बऱ्याच महिला प्रसूतीसाठी खाजगी रुग्णालयाची वाट बघतात.