शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : गरोदर महिला व नवजात शिशु यांच्या सुरक्षेसाठी व मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. तरीही माता मृत्यू व नवजात बालमृत्युच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे शासनाचा या योजनेवरचा कोट्यवधीचा निधी खरोखरच खर्च होत आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. साकोली ...

ठळक मुद्देबाळ सुखरूप : साकोली येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : गरोदर महिला व नवजात शिशु यांच्या सुरक्षेसाठी व मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. तरीही माता मृत्यू व नवजात बालमृत्युच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे शासनाचा या योजनेवरचा कोट्यवधीचा निधी खरोखरच खर्च होत आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. साकोली येथे अशीच घटना नुकतीच उघडकीला आली आहे. बाळंतपणानंतर अवघ्या पाच-सहा तासातच महिलेचा मृत्यू झाला. बाळ सुखरूप असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.सुषमा दिगांबर मेश्राम (२८) रा.सेंदुरवाफा असे मृत महिलेचे नाव आहे. सुषमाचा दिगांबर मेश्राम यांच्याी मागीलवर्षी विवाह झाला. सुषमा ही पहिल्यांदाच गर्भवती होती. ती विर्शी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रातून व खाजगी रूग्णालयातून औषधोपचार घेत होती. चार जुलैला सुषमाच्या गर्भाशयातील पाणी कमी झाल्यामुळे तिला साकोली येथील एका खाजगी रूग्णालयात दाखविण्यात आले. मात्र त्यावेळी प्रसुती वेदना वाढल्यामुळे तिची शस्त्रक्रियेने (सिझेरियन) प्रसुती करण्यात आली.प्रसुतीनंतर अवघ्या तीन तासातच सुषमाची प्रकृती बिघडली. तिच्या छातीमध्ये अचानक त्रास सुरू झाला. त्यामुळे सुषमाला तातडीने नागपूर येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान तिथे सुषमाचा मृत्यू झाला.यासंदर्भात सुषमाचे पती दिगांबर मेश्राम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, प्रसुतीपूर्वी सुषमाच्या प्लेटलेट (लाल पेशी) १.५० लाख एवढ्या होत्या. प्रसुतीनंतर त्या ७० हजारावर आल्या. त्यानंतर नागपूर येथे प्लेटलेट चढविण्यात आले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही व या प्रकरणात आपला कुणावरही आक्षेप नाही, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मातृत्व हिरावलेसुषमाने एका गोंडस बाळाला जन्म दिला व काही तासातच तिने या जगाचा निरोप घेतला. सुषमाच्या अकाली जाण्याने बाळाचे मात्र मातृत्व हिरावले आहे.आरोग्य विभागाचे दुर्लक्षशासन गर्भवती महिला व नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करते. नऊ महिने गर्भवती महिलांवर आरोग्य केंद्रात औषधोपचार करतात मात्र ऐन प्रसुतीच्या वेळी शासकीय रुग्णालयात योग्य उपचार होत नाही त्यामुळे बऱ्याच महिला प्रसूतीसाठी खाजगी रुग्णालयाची वाट बघतात.