शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शौचालये वापराविना

By admin | Updated: December 29, 2014 23:38 IST

दुर्गम भागातील गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या. या योजनेच्या माध्यमातून शौचालय बांधकामासाठी अनुदानही देण्यात आले.

भंडारा : दुर्गम भागातील गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या. या योजनेच्या माध्यमातून शौचालय बांधकामासाठी अनुदानही देण्यात आले. मात्र उघड्यावर शौचास बसण्याच्या नागरिकांच्या सवयीमुळे अनुदानातून बांधण्यात आलेली शौचालये वापराविनाच उभी आहेत. स्वच्छतेबाबत शासकीय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी नंतरही ‘स्थिती जैसे थे’ असल्याचे दिसून येते. सकाळच्या सुमारास गावाबाहेरच्या रस्त्याने फेरफटका मारला असता ही बाब प्रकर्षाने जाणवते. शासनाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा म्हणून नागरिकांसाठी प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु केली. एवढेच नव्हे तर अनुदानात वेळोवेळी वाढही करण्यात आली. त्यामुळे गावागावांत शौचालयाची संख्या वाढली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक कुटुंबियाकडून शौचालयाचा वापर नाममात्र होत असल्याचे दिसते. आजही ग्रामीण भागात ६० ते ७० टक्केपेक्षा जास्त कुटुंब उघड्यावरच शौचविधी करतात, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले जात आहे. ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने २००४ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले. योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात आली. योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर केंद्र शासनाने सन २००५ पासून संपूर्ण देशात निर्मल ग्राम योजना सुरु केली. २००५ मध्ये शौचालय बांधणाऱ्या कुटुंबाला ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येऊ लागले. निर्मल ग्राम अभियानाची व्याप्ती सन २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधकामासाठी शासनाकडून प्रोत्साहित करण्यात आले. सन २००८ मध्ये जिल्ह्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शौचालय बांधण्यात आले. परिणामी जिल्ह्यातील काही गावे हागणदारीमुक्तदेखील झाली. परंतु ग्रामीण भागामध्ये शौचालयाचा वापर पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे जिल्ह्यातील अनेक गावांच्या स्थितीवरुन दिसते. घरी शौचालय असताना बहुतांश नागरिक उघड्यावरच शौचविधी करीत असल्याने जिल्ह्याची परिस्थिती पाहिजे त्या प्रमाणात बदलली नाही. यामुळे आजही जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीत हागणदारी सुरु आहे.राज्य शासनातर्फे घरकूल योजना सुरु आहे. त्यामध्ये प्रत्येक घरकुलामध्ये शौचालय बांधणे बंधनकारक आहे. तेव्हाच या घरकुल धारकाला अनुदानाचा शेवटचा टप्पा मिळतो. मात्र अनेक लाभधारक शौचालय अनुदान घेऊन मोकळे झाले आहेत.वैयक्तिक शौचालय बांधणाऱ्या व्यक्तीला शासनाच्या योजनेतून १० हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. शौचालय बांधणे प्रत्येक कुटुंबाला सक्ती केली आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबाला शासनाच्या योजना अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र देण्यास मनाई केली असल्याने नागरिक शौचालय बांधकामावर भर देत आहेत. शासनाच्या या निणर्याचा सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)