शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

खतांची दरवाढ त्वरित मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST

खतांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १०:२६:२६ खतांचा दर ११७५ रुपयांवरून १७७५ रुपये झाला आहे. तसेच २०:२०:०:१३ ...

खतांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १०:२६:२६ खतांचा दर ११७५ रुपयांवरून १७७५ रुपये झाला आहे. तसेच २०:२०:०:१३ चा दर ९७५ रुपयांवरून १३५० रु. व १२:३२:१६चा दर ११८५ वरून १८०० रु. झाला आहे.

यामुळे आता एवढे महागडे खत कसे विकत घ्यायचे व पेरणी कशी करायची, असा प्रश्न देशभरातील शेतकऱ्यांना पडला आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ करण्यास मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केलेले असतानाही खत कंपन्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे. अगोदरच वाढलेली महागाई, कोरोनाचे संकट व लाॅकडाऊनमुळे शेतमालाची विक्री व्यवस्था कोलमडून पडलेली असल्याने शेतकरी परेशान आहे.

अशा परिस्थितीत हा खतांच्या दरवाढीचा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असाच आहे.

केंद्र सरकारने खतांवरील अनुदानात वाढ करून खतदर नियंत्रणात ठेवणे गरजेचे होते. परंतु, केंद्र सरकारने मागच्या वर्षीचेच अनुदान कायम ठेवून खतांच्या दरवाढीला एक प्रकारे हातभार लावण्याचेच काम केले आहे.

केंद्र सरकारला खरोखरच शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर त्वरित खतांची दरवाढ रद्द करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, हेमंत लिल्हारे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, तालुकाध्यक्ष सुरेश ठाकरे, शहराध्यक्ष राजेश नागोसे, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे, लिल्हारे यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

केंद्राने पाठ थोपटून घेऊ नये

एका बाजूला खतांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढवून केंद्र सरकार शेतकऱ्यांची लूट करत आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १९ हजार कोटींचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून केंद्र सरकार पाट थोपटून घेत आहे. परंतु, सद्य:परिस्थितीत शेतकऱ्यांना पीएम-किसान निधीचे पैसे पेरणीच्या कामाला तेवढे उपयोगी पडणार नाहीत.