शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकासासाठी ‘टिम भंडारा’ म्हणून काम करु

By admin | Updated: April 2, 2017 00:23 IST

शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना व कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यासाठी तसेच जिल्ह्यातील सामान्य माणसाचा विकास व्हावा यासाठी टिम भंडारा म्हणून काम करु या, ...

जिल्हाधिकारी सुहास दिवसे : डॉ. अभिजीत चौधरी यांना निरोप, नवीन जिल्हाधिकारी रुजूभंडारा : शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना व कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यासाठी तसेच जिल्ह्यातील सामान्य माणसाचा विकास व्हावा यासाठी टिम भंडारा म्हणून काम करु या, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासक म्हणून उत्तम काम केले असून त्यांचे नाविण्यपूर्ण उपक्रम या पुढेही सुरु राहतील, अशी ग्वाही सुहास दिवसे यांनी दिली. सुहास दिवसे यांनी आज जिल्हाधिकारी भंडारा म्हणून कार्यभार स्विकारला.डॉ. अभिजीत चौधरी यांना निरोप व सुहास दिवसे यांच्या स्वागताचा कार्यक्रम महसूल कर्मचारी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीप डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर उपस्थित होते. यावेळी सुहास दिवसे म्हणाले की, विदर्भात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र वैदर्भिय माणसं प्रेमळ असल्याचा आपला अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख असला तरी आपण सर्वांच्या सहकार्याने व सर्वांना सोबत घेवून भंडारा जिल्हयाच्या विकासाला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. निरोपाला उत्तर देतांना डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून पहिलीच पदस्थापना असली तरी जिल्ह्याच्या विकासासाठी व शासनाच्या महत्वाकांक्षी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी मोलाची साथ दिली. डॉ. चौधरी यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याने आपल्या कामाची छाप जिल्ह्यावर सोडली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे म्हणाले की, जिल्हा परिषदेला त्यांचे नेहमी सहकार्य लाभले. शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरण यासाठी डॉ. चौधरी यांनी जिल्हा परिषदेला मार्गदर्शन व सूचना तसेच मदत केली आहे. नवोदय विद्यालयासाठी जागा, महसूल कर्मचाऱ्यांची कालबध्द पदोन्नती, झुडपी जंगल, वन पट्टे, शंभर टक्के वसुली, वैनगंगेवरील जुन्या पुलावरील वाहतुकीस बंदी, शंभर टक्के वसुली, गोसेखुर्द पुनर्वसन सुविधा, कर्मचाऱ्यांसाठी वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आदि कामे अभिजीत चौधरी यांनी यशस्वीपणे केल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात सांगितले. उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, तहसिलदार वरुणकुमार सहारे, धनंजय देशमुख, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किशोर राऊत यांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन अभिषेक नामदेव यांनी केले तर उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार विनोद थोरवे यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)