शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

नवीन गावठाणात भूखंड मिळणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार येथील जुन्या गावठाणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात येणार होते, मात्र ...

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार येथील जुन्या गावठाणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात येणार होते, मात्र अजूनपर्यंत या प्रकल्पग्रस्तांना भूखंड न मिळाल्याने आमची मागणी पूर्ण होणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना प्रकल्पग्रस्तांनी स्वाक्षरीनिशी दिले आहे.

माहितीनुसार, भंडारा तालुक्यातील पिंडकेपार येथील गोसेखुर्द प्रकल्पामध्ये बाधित शेतकरी यांची घरे व शेतजमिनी शासनाने प्रकल्पासाठी संपादित केल्य आहेत. यात १४० पैकी ९६ लाभार्थींना २०१५ मध्ये भूखंड व शेतजमिनीचा मोबदला दिला आहे.

तसेच शेतकऱ्यांना घरे व शेतजमिनीचा मोबदला नवीन गावठाण बेला येथे घेण्यात आला, परंतु गावठाणातील अन्य शेतकरी काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात आले नाही. त्यांना दुकानदारापासून वंचित ठेवण्यात आले. यादीतील सर्व शेतकरी हे जन्मापासूनच मौदा पिंडकेपार येथील वास्तव्यात आहेत. त्यांचे वारसदार आजही पिंडकेपार येथील रहिवासी असून, मालमत्तेवरील कराचा भरणासुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाला करीत आहेत. परिणामी नोकरीनिमित्ताने बाहेरगावी गेले असल्यास त्यांचा मूळ गावातील संबंध तुटतो काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

मात्र प्रशासनाने ही बाब गृहीत धरली नाही. परिणामी ही खेदजनक बाब असल्याचेही प्रकल्पग्रस्तांनी म्हटले आहे. निवेदनात स्वाक्षरी केलेल्या सर्वच लाभार्थींचे पिंडकेपार येथील राशन कार्डावर नाव आहे.

मग प्रशासनाला वंचित कुटुंबांना बेला येथील नवीन गावठाणात भूखंड देण्यात काय अडचण आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. राजकीय अंतर्गत गटबाजीमुळे ग्रामसेवक व तलाठी यांनी हेतुपुरस्पर लाभार्थींना वगळले असावे, असा सवालही उपस्थित केला. संबंधित लाभार्थींना नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर बाळकृष्ण बंजारी, देवराव साठवणे, हिरामण दिवटे, बळीराम साठवणे, विजय मडावी, सेवकराम साठवणे, सुनील साठवणे, दिलीप साठवणे, सिंधूताई साकुरे, हरिदास बंजारी, मधू साठवणे, रूपचंद साठवणे, कुंडलिक वंजारी, श्रावण साठवणे, त्रिशुला रामटेके आदींच्या सह्या आहेत.

बॉक्स

गणेशपूर ते पिंडकेपारपर्यंत रस्त्याने पथदिव्यांची सोय नाही. पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.