शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

नवीन गावठाणात भूखंड मिळणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार येथील जुन्या गावठाणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात येणार होते, मात्र ...

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार येथील जुन्या गावठाणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात येणार होते, मात्र अजूनपर्यंत या प्रकल्पग्रस्तांना भूखंड न मिळाल्याने आमची मागणी पूर्ण होणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना प्रकल्पग्रस्तांनी स्वाक्षरीनिशी दिले आहे.

माहितीनुसार, भंडारा तालुक्यातील पिंडकेपार येथील गोसेखुर्द प्रकल्पामध्ये बाधित शेतकरी यांची घरे व शेतजमिनी शासनाने प्रकल्पासाठी संपादित केल्य आहेत. यात १४० पैकी ९६ लाभार्थींना २०१५ मध्ये भूखंड व शेतजमिनीचा मोबदला दिला आहे.

तसेच शेतकऱ्यांना घरे व शेतजमिनीचा मोबदला नवीन गावठाण बेला येथे घेण्यात आला, परंतु गावठाणातील अन्य शेतकरी काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात आले नाही. त्यांना दुकानदारापासून वंचित ठेवण्यात आले. यादीतील सर्व शेतकरी हे जन्मापासूनच मौदा पिंडकेपार येथील वास्तव्यात आहेत. त्यांचे वारसदार आजही पिंडकेपार येथील रहिवासी असून, मालमत्तेवरील कराचा भरणासुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाला करीत आहेत. परिणामी नोकरीनिमित्ताने बाहेरगावी गेले असल्यास त्यांचा मूळ गावातील संबंध तुटतो काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

मात्र प्रशासनाने ही बाब गृहीत धरली नाही. परिणामी ही खेदजनक बाब असल्याचेही प्रकल्पग्रस्तांनी म्हटले आहे. निवेदनात स्वाक्षरी केलेल्या सर्वच लाभार्थींचे पिंडकेपार येथील राशन कार्डावर नाव आहे.

मग प्रशासनाला वंचित कुटुंबांना बेला येथील नवीन गावठाणात भूखंड देण्यात काय अडचण आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. राजकीय अंतर्गत गटबाजीमुळे ग्रामसेवक व तलाठी यांनी हेतुपुरस्पर लाभार्थींना वगळले असावे, असा सवालही उपस्थित केला. संबंधित लाभार्थींना नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर बाळकृष्ण बंजारी, देवराव साठवणे, हिरामण दिवटे, बळीराम साठवणे, विजय मडावी, सेवकराम साठवणे, सुनील साठवणे, दिलीप साठवणे, सिंधूताई साकुरे, हरिदास बंजारी, मधू साठवणे, रूपचंद साठवणे, कुंडलिक वंजारी, श्रावण साठवणे, त्रिशुला रामटेके आदींच्या सह्या आहेत.

बॉक्स

गणेशपूर ते पिंडकेपारपर्यंत रस्त्याने पथदिव्यांची सोय नाही. पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.