शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

नवीन गावठाणात भूखंड मिळणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार येथील जुन्या गावठाणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात येणार होते, मात्र ...

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार येथील जुन्या गावठाणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात येणार होते, मात्र अजूनपर्यंत या प्रकल्पग्रस्तांना भूखंड न मिळाल्याने आमची मागणी पूर्ण होणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना प्रकल्पग्रस्तांनी स्वाक्षरीनिशी दिले आहे.

माहितीनुसार, भंडारा तालुक्यातील पिंडकेपार येथील गोसेखुर्द प्रकल्पामध्ये बाधित शेतकरी यांची घरे व शेतजमिनी शासनाने प्रकल्पासाठी संपादित केल्य आहेत. यात १४० पैकी ९६ लाभार्थींना २०१५ मध्ये भूखंड व शेतजमिनीचा मोबदला दिला आहे.

तसेच शेतकऱ्यांना घरे व शेतजमिनीचा मोबदला नवीन गावठाण बेला येथे घेण्यात आला, परंतु गावठाणातील अन्य शेतकरी काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात आले नाही. त्यांना दुकानदारापासून वंचित ठेवण्यात आले. यादीतील सर्व शेतकरी हे जन्मापासूनच मौदा पिंडकेपार येथील वास्तव्यात आहेत. त्यांचे वारसदार आजही पिंडकेपार येथील रहिवासी असून, मालमत्तेवरील कराचा भरणासुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाला करीत आहेत. परिणामी नोकरीनिमित्ताने बाहेरगावी गेले असल्यास त्यांचा मूळ गावातील संबंध तुटतो काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

मात्र प्रशासनाने ही बाब गृहीत धरली नाही. परिणामी ही खेदजनक बाब असल्याचेही प्रकल्पग्रस्तांनी म्हटले आहे. निवेदनात स्वाक्षरी केलेल्या सर्वच लाभार्थींचे पिंडकेपार येथील राशन कार्डावर नाव आहे.

मग प्रशासनाला वंचित कुटुंबांना बेला येथील नवीन गावठाणात भूखंड देण्यात काय अडचण आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. राजकीय अंतर्गत गटबाजीमुळे ग्रामसेवक व तलाठी यांनी हेतुपुरस्पर लाभार्थींना वगळले असावे, असा सवालही उपस्थित केला. संबंधित लाभार्थींना नवीन गावठाण बेला येथे भूखंड देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर बाळकृष्ण बंजारी, देवराव साठवणे, हिरामण दिवटे, बळीराम साठवणे, विजय मडावी, सेवकराम साठवणे, सुनील साठवणे, दिलीप साठवणे, सिंधूताई साकुरे, हरिदास बंजारी, मधू साठवणे, रूपचंद साठवणे, कुंडलिक वंजारी, श्रावण साठवणे, त्रिशुला रामटेके आदींच्या सह्या आहेत.

बॉक्स

गणेशपूर ते पिंडकेपारपर्यंत रस्त्याने पथदिव्यांची सोय नाही. पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.